शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
2
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
3
IPL 2025 : शाहरुख खान काठावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
4
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
5
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
6
झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप
7
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
8
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
10
Vaishnavi Hagawane case: अखेर निलेश चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल; बाळाला घ्यायला गेल्यानंतर दिली होती धमकी 
11
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
12
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
13
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
14
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
15
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
16
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
17
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
18
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
19
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
20
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न

गडगा प्रकल्पासाठी रेतीघाट आरक्षित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:23 IST

घरकुलधारकांसाठी वेगळा न्याय, रेतीची प्रतीक्षा करणाऱ्यांविषयी सापत्नभाव धारणी : मेळघाटातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या गडगा मध्यम प्रकल्पातील कामासाठी ...

घरकुलधारकांसाठी वेगळा न्याय, रेतीची प्रतीक्षा करणाऱ्यांविषयी सापत्नभाव

धारणी : मेळघाटातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या गडगा मध्यम प्रकल्पातील कामासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यकारी अभियंता यांच्या नावावर रत्नापूर येथील रेतीघाट आरक्षित केल्याची माहिती आहे. एकीकडे मेळघाटात काम करणाऱ्या कंत्राटदार आणि घरकुलासाठी वणवण भटकणाऱ्या लाभार्थ्यांना रेतीचा एक घमेलेसुद्धा मिळत नसताना दुसरीकडे मोठ्या प्रकल्पाच्या विकासासाठी हजारो ब्रास रेतीसाठा चक्क आरक्षित केला जात असल्यामुळे हा स्थानिक लोकांवर अन्याय नाही का, असा सूर उमटत आहे.

धारणीपासून १५ किलोमीटर अंतरावरील बिजुधावडी आणि मानसूधावडी या गावादरम्यान गडगा मध्यम प्रकल्पाचे काम सुरू आहे. चार वर्षांपासून हा प्रकल्प सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या प्रकल्पाचे वाढीव अंदाजपत्रक हे सर्वाधिक चर्चेत आलेला आहे. सध्या मेळघाटासह अमरावती जिल्ह्यातील कोणत्याही रेतीघाटांचा जाहीर लिलाव झाला नसल्यामुळे सर्व बांधकाम पूर्णपणे ठप्प पडले आहे. अशातच गडगा मध्यम प्रकल्पासाठी धारणी तालुक्यातील तापी नदीवरील रत्नापूर घाट, गडगा मध्यम प्रकल्पासाठी आरक्षित करण्यात आल्यामुळे पुन्हा हा प्रकल्प प्रकाशझोतात आला आहे.

मेळघाटातील शासकीय व खासगी कामांसह घरकुल लाभार्थी रेतीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत असतानासुद्धा त्यांना परवानगी मिळत नाही. इतकेच नव्हे तर नवीन शासनादेशाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे ऑनलाइन अर्ज केल्यानंतरसुद्धा कंत्राटदारांना परप्रांतातून रेती आणण्यासाठी परवानगी देण्यात अडचणी निर्माण केल्या जात आहे. असे असताना गडगा प्रकल्पावर शासनाची इतकी मेहरबानी कशी, असा सवाल सर्व स्तरावरून विचारला जात आहे.

जाहीर लिलाव केव्हा?

मेळघाटातील मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील सीमारेषा म्हणून ओळख असलेल्या तापी नदीवर अनेक ठिकाणी रेतीघाट आहेत. वैरागड येथे दोन, सोनाबर्डी, खाऱ्या, चिचघाट आणि रत्नापूर अशा गावाजवळून वाहणाऱ्या तापी नदीवर मोठ्या प्रमाणात रेतीसाठा उपलब्ध आहे. मात्र, रेतीघाटांचे जाहीर लिलाव न झाल्यामुळे कंत्राटदार आणि घरकुल लाभार्थ्यांना आपले काम बंद करावे लागले. गडगा प्रकल्पांसाठी ज्याप्रमाणे शासनाने रत्नापूर येथील रेतीघाट आरक्षित केला आहे त्याचअनुषंगाने स्थानिक कंत्राटदार आणि खासगी बांधकामासाठीसुद्धा एखादा रेतीघाट जिल्हाधिकाऱ्यांनी राखीव करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

-------------------