शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
3
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
4
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
5
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
6
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
7
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
8
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
9
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
10
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
11
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
12
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
13
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
14
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
15
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
16
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
17
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
18
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
19
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना

श्रीमंताचा बंगला, पण पार्किंग कुठेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:15 IST

(फोटो वापरणे) अमरावती : महानगरात मुळात अधिकृत वाहनतळांची संख्या नावापुरतीच आहे. इमारती, संकुल बांधकामाला वाहनतळाची जागा न सोडतानाही परवानगी ...

(फोटो वापरणे)

अमरावती : महानगरात मुळात अधिकृत वाहनतळांची संख्या नावापुरतीच आहे. इमारती, संकुल बांधकामाला वाहनतळाची जागा न सोडतानाही परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या वाढली असून, महापालिका सहसंचालक नगरविकास विभागाचा हा प्रताप असल्याचे बोलले जात आहे. त्यात भर म्हणजे शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची दिवसेंदिवस संख्या वाढतच आहे. पुरेसे वाहनतळ नसल्याने रस्त्यावर वाहने लावण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचा परिणाम रहदारीस अडथळा होत असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

अमरावती महानगरात वाहनतळांची संख्या मुळातच कमी आहे. महापालिकेने चार ते पाच वाहनतळासाठी आरक्षित भूखंड जागा मालकांकडून विकसित करून घेतले. मात्र, त्यावर टोलजंग व्यापारी संकुले उभी राहिली. परंतु, वाहनतळांचा वापर होत नाही. अमरावती महापालिकेने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बीओटीवर स्मार्ट पार्किंग प्रकल्प राबविण्याची तयारी केली होती. मात्र, तेदेखील गुलदस्त्यात आहे. हल्ली नेहरू मैदान, गांधी चौक येथे अधिकृत वाहनतळ आहे. मात्र, आजूबाजूला अतिक्रमण, दुकानांनी वाहनतळ वेढले आहे. जयस्तंभ चौकातील महापालिकेच्या प्रियदर्शनी व्यापारी संकुलातील वाहनतळ गायब झाले आहे. व्यापारी संकुलातील वाहनतळ दिसत नाही, तर वाहने कुठेही रस्त्यावर उभी केली जातात. पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने वाहने टोईंग करून नेण्याचे तसेच दुचाकी उचलून नेऊन दंड आकारण्याचे प्रकार केले आहेत. मात्र, वाहनतळांची जागा नाहीच, असे चित्र आहे.

-------------------

शहराची लोकसंख्या : ८ लाख ५० हजार

दुचाकी संख्या : ६ लाख ७० हजार ४९७

चारचाकी वाहनांची संख्या : ६५ हजार २७९

------------------

मुख्य रस्ते सर्वाधिक त्रासदायक

शहरातील मुख्य परिसरात वाहनतळाची सर्वात गंभीर समस्या आहे. राजकमल चौक, जयस्तंभ चौक, इतवारा बाजार, राजापेठ, अंबादेवी मार्ग, सराफा बाजार याठिकाणी वाहनांमुळे तासंतास वाहतूक कोंडी होते. शहरातील वाहनतळे ताब्यात घेतल्याने याच भागात गंभीर परिस्थिती उद्‌भवली आहे.

---------------

- तर वाहनमालकांवर कारवाई

१) रस्त्यावर वाहने उभी केल्यास कलम १२२ अंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांना आहेत. त्यानुसार ५०० ते १००० दंड होऊ शकतो. मात्र, वाहतूक पोलीस शाखेने वाहतुकीला शिस्त लावू, परंतु कायद्याने जे अधिकार पोलिसांना दिले आहेत, त्याचा वापर करू असे म्हटले आहे.

२) वाहतूक पोलिसांची वाहने मेन रोडसारख्या भागात फिरत नाही, ते कॉलेज, गर्दी नसलेल्या भागात फिरतात. तेथेही केवळ धवनीक्षेपकावरून समज दिली जाते. त्यामुळे काहीच उपयोग होत नाही.