शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंताचा बंगला, पण पार्किंग कुठेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:15 IST

(फोटो वापरणे) अमरावती : महानगरात मुळात अधिकृत वाहनतळांची संख्या नावापुरतीच आहे. इमारती, संकुल बांधकामाला वाहनतळाची जागा न सोडतानाही परवानगी ...

(फोटो वापरणे)

अमरावती : महानगरात मुळात अधिकृत वाहनतळांची संख्या नावापुरतीच आहे. इमारती, संकुल बांधकामाला वाहनतळाची जागा न सोडतानाही परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या वाढली असून, महापालिका सहसंचालक नगरविकास विभागाचा हा प्रताप असल्याचे बोलले जात आहे. त्यात भर म्हणजे शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची दिवसेंदिवस संख्या वाढतच आहे. पुरेसे वाहनतळ नसल्याने रस्त्यावर वाहने लावण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचा परिणाम रहदारीस अडथळा होत असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

अमरावती महानगरात वाहनतळांची संख्या मुळातच कमी आहे. महापालिकेने चार ते पाच वाहनतळासाठी आरक्षित भूखंड जागा मालकांकडून विकसित करून घेतले. मात्र, त्यावर टोलजंग व्यापारी संकुले उभी राहिली. परंतु, वाहनतळांचा वापर होत नाही. अमरावती महापालिकेने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बीओटीवर स्मार्ट पार्किंग प्रकल्प राबविण्याची तयारी केली होती. मात्र, तेदेखील गुलदस्त्यात आहे. हल्ली नेहरू मैदान, गांधी चौक येथे अधिकृत वाहनतळ आहे. मात्र, आजूबाजूला अतिक्रमण, दुकानांनी वाहनतळ वेढले आहे. जयस्तंभ चौकातील महापालिकेच्या प्रियदर्शनी व्यापारी संकुलातील वाहनतळ गायब झाले आहे. व्यापारी संकुलातील वाहनतळ दिसत नाही, तर वाहने कुठेही रस्त्यावर उभी केली जातात. पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने वाहने टोईंग करून नेण्याचे तसेच दुचाकी उचलून नेऊन दंड आकारण्याचे प्रकार केले आहेत. मात्र, वाहनतळांची जागा नाहीच, असे चित्र आहे.

-------------------

शहराची लोकसंख्या : ८ लाख ५० हजार

दुचाकी संख्या : ६ लाख ७० हजार ४९७

चारचाकी वाहनांची संख्या : ६५ हजार २७९

------------------

मुख्य रस्ते सर्वाधिक त्रासदायक

शहरातील मुख्य परिसरात वाहनतळाची सर्वात गंभीर समस्या आहे. राजकमल चौक, जयस्तंभ चौक, इतवारा बाजार, राजापेठ, अंबादेवी मार्ग, सराफा बाजार याठिकाणी वाहनांमुळे तासंतास वाहतूक कोंडी होते. शहरातील वाहनतळे ताब्यात घेतल्याने याच भागात गंभीर परिस्थिती उद्‌भवली आहे.

---------------

- तर वाहनमालकांवर कारवाई

१) रस्त्यावर वाहने उभी केल्यास कलम १२२ अंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांना आहेत. त्यानुसार ५०० ते १००० दंड होऊ शकतो. मात्र, वाहतूक पोलीस शाखेने वाहतुकीला शिस्त लावू, परंतु कायद्याने जे अधिकार पोलिसांना दिले आहेत, त्याचा वापर करू असे म्हटले आहे.

२) वाहतूक पोलिसांची वाहने मेन रोडसारख्या भागात फिरत नाही, ते कॉलेज, गर्दी नसलेल्या भागात फिरतात. तेथेही केवळ धवनीक्षेपकावरून समज दिली जाते. त्यामुळे काहीच उपयोग होत नाही.