शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

श्रीमंताचा बंगला, पण पार्किंग कुठेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:15 IST

(फोटो वापरणे) अमरावती : महानगरात मुळात अधिकृत वाहनतळांची संख्या नावापुरतीच आहे. इमारती, संकुल बांधकामाला वाहनतळाची जागा न सोडतानाही परवानगी ...

(फोटो वापरणे)

अमरावती : महानगरात मुळात अधिकृत वाहनतळांची संख्या नावापुरतीच आहे. इमारती, संकुल बांधकामाला वाहनतळाची जागा न सोडतानाही परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या वाढली असून, महापालिका सहसंचालक नगरविकास विभागाचा हा प्रताप असल्याचे बोलले जात आहे. त्यात भर म्हणजे शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची दिवसेंदिवस संख्या वाढतच आहे. पुरेसे वाहनतळ नसल्याने रस्त्यावर वाहने लावण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचा परिणाम रहदारीस अडथळा होत असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

अमरावती महानगरात वाहनतळांची संख्या मुळातच कमी आहे. महापालिकेने चार ते पाच वाहनतळासाठी आरक्षित भूखंड जागा मालकांकडून विकसित करून घेतले. मात्र, त्यावर टोलजंग व्यापारी संकुले उभी राहिली. परंतु, वाहनतळांचा वापर होत नाही. अमरावती महापालिकेने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बीओटीवर स्मार्ट पार्किंग प्रकल्प राबविण्याची तयारी केली होती. मात्र, तेदेखील गुलदस्त्यात आहे. हल्ली नेहरू मैदान, गांधी चौक येथे अधिकृत वाहनतळ आहे. मात्र, आजूबाजूला अतिक्रमण, दुकानांनी वाहनतळ वेढले आहे. जयस्तंभ चौकातील महापालिकेच्या प्रियदर्शनी व्यापारी संकुलातील वाहनतळ गायब झाले आहे. व्यापारी संकुलातील वाहनतळ दिसत नाही, तर वाहने कुठेही रस्त्यावर उभी केली जातात. पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने वाहने टोईंग करून नेण्याचे तसेच दुचाकी उचलून नेऊन दंड आकारण्याचे प्रकार केले आहेत. मात्र, वाहनतळांची जागा नाहीच, असे चित्र आहे.

-------------------

शहराची लोकसंख्या : ८ लाख ५० हजार

दुचाकी संख्या : ६ लाख ७० हजार ४९७

चारचाकी वाहनांची संख्या : ६५ हजार २७९

------------------

मुख्य रस्ते सर्वाधिक त्रासदायक

शहरातील मुख्य परिसरात वाहनतळाची सर्वात गंभीर समस्या आहे. राजकमल चौक, जयस्तंभ चौक, इतवारा बाजार, राजापेठ, अंबादेवी मार्ग, सराफा बाजार याठिकाणी वाहनांमुळे तासंतास वाहतूक कोंडी होते. शहरातील वाहनतळे ताब्यात घेतल्याने याच भागात गंभीर परिस्थिती उद्‌भवली आहे.

---------------

- तर वाहनमालकांवर कारवाई

१) रस्त्यावर वाहने उभी केल्यास कलम १२२ अंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांना आहेत. त्यानुसार ५०० ते १००० दंड होऊ शकतो. मात्र, वाहतूक पोलीस शाखेने वाहतुकीला शिस्त लावू, परंतु कायद्याने जे अधिकार पोलिसांना दिले आहेत, त्याचा वापर करू असे म्हटले आहे.

२) वाहतूक पोलिसांची वाहने मेन रोडसारख्या भागात फिरत नाही, ते कॉलेज, गर्दी नसलेल्या भागात फिरतात. तेथेही केवळ धवनीक्षेपकावरून समज दिली जाते. त्यामुळे काहीच उपयोग होत नाही.