शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

पोलीस, सरकार, बचाव पक्षाच्या वकिलांमध्ये रंगला युक्तिवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 22:36 IST

नवनीत रवि राणा यांनी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या विलंबमाफी याचिकेवर मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सरकारी पक्ष, पोलीस प्रतिनिधी व बचाव पक्षांत युक्तिवाद झाला. ११ जानेवारीला यासंबंधी निर्णय होईल.

ठळक मुद्देआनंदराव अडसुळांविरुद्धचा खटला : नवनीत यांच्या पुनर्निरीक्षण-विलंबमाफी याचिकेवर ११ ला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नवनीत रवि राणा यांनी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या विलंबमाफी याचिकेवर मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सरकारी पक्ष, पोलीस प्रतिनिधी व बचाव पक्षांत युक्तिवाद झाला. ११ जानेवारीला यासंबंधी निर्णय होईल.विधी सुत्रानुसार, २०१४ मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान खासगी वृत्तवाहिनीने बसगाडीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात नवनीत राणा आणि खासदार आनंदराव अडसूळ यांच्यात शाब्दिक वाद झाला. नवनीत यांच्या तक्रारीनुसार गाडगेनगर पोलिसांनी खा. अडसुळांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी, विनयभंग आणि जिवे मारण्याच्या धमकीचे गुन्हे नोंदविले. पुढे हे फाइल पोलिसांनी बंद करण्याचा अहवाल प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केला. न्यायालयाने २०१६ साली हे प्रकरण एकतर्फी खारीज केले. कायद्यानुसार ९० दिवसांत पुनर्निरीक्षण याचिका दाखल केली जाऊ शकते. ३१ मे २०१८ रोजी माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार नवनीत राणा यांचे वकील दीप मिश्रा आणि परवेज खान यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात ४ जून २०१८ रोजी पुनर्निरीक्षण आणि विलंब माफी याचिका दाखल केली. मंगळवारी विलंबमाफी याचिकेवर सुनावणी झाली. सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील परिक्षीत गणोरकर तर खा. आनंदराव अडसूळ यांच्यातर्फे अ‍ॅड. चंद्रशेखर डोरले यांनी युक्तिवाद केला.असा झाला युक्तिवाद-२०१४ मध्ये हे प्रकरण पोलिसांनी बंद केले. त्याला ९० दिवसांच्या आत आव्हान द्यायला हवे होते, मात्र, चार वर्षांपर्यंत तसे केले गेले नाही. त्यामुळे विलंबमाफी याचिका दाखल करता येत नसल्याचा युक्तिवाद पोलिसांतर्फे सरकारी पक्षाचे अभियोक्ता अ‍ॅड. परीक्षित गणोरकर यांनी केला.-खा.अडसूळ यांचे वकील अ‍ॅड. चंद्रशेखर डोरले यांनीही सरकारी पक्षाच्या युक्तिवादाला समर्थन दिले. बातम्या आणि सोशल मीडियावरून ही माहिती जाहीर झाली असल्यामुळे ती मिळाली नाही, हे म्हणणे गैर आहे, असे डोरले यांनी न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला.-वकील परवेझ खान यांनी तो युक्तिवाद खोडून काढताना फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार, कलम १५७ व १७३ नुसार पोलीस आणि मॅजिस्ट्रेट यांनी फिर्यादीला त्यासंबंधीची माहिती कळविणे हे त्यांचे कर्तव्य ठरते. ते त्यांनी पार पाडले नाही. बातम्या वा सोशल मीडियामार्फत जाहीर झालेली माहिती यासाठी ग्राह्य धरता येणार नाही, कारण की, कायद्याला ती माध्यमे पर्याय नाही, असा युक्तीवाद केला. सुप्रीम कोर्टाच्या न्यायनिवाड्यांचाही हवाला त्यांनी न्यायासनाला दिला. 'अ‍ॅझम्पशन' आणि 'प्रिझम्पशन'वर न्यायनिर्णय करण्याऐवजी तो कायद्याच्या कलमांच्या आधारांवर केला जावा, असा अग्रह खान यांनी धरला.