शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस, सरकार, बचाव पक्षाच्या वकिलांमध्ये रंगला युक्तिवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 22:36 IST

नवनीत रवि राणा यांनी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या विलंबमाफी याचिकेवर मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सरकारी पक्ष, पोलीस प्रतिनिधी व बचाव पक्षांत युक्तिवाद झाला. ११ जानेवारीला यासंबंधी निर्णय होईल.

ठळक मुद्देआनंदराव अडसुळांविरुद्धचा खटला : नवनीत यांच्या पुनर्निरीक्षण-विलंबमाफी याचिकेवर ११ ला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नवनीत रवि राणा यांनी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या विलंबमाफी याचिकेवर मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सरकारी पक्ष, पोलीस प्रतिनिधी व बचाव पक्षांत युक्तिवाद झाला. ११ जानेवारीला यासंबंधी निर्णय होईल.विधी सुत्रानुसार, २०१४ मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान खासगी वृत्तवाहिनीने बसगाडीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात नवनीत राणा आणि खासदार आनंदराव अडसूळ यांच्यात शाब्दिक वाद झाला. नवनीत यांच्या तक्रारीनुसार गाडगेनगर पोलिसांनी खा. अडसुळांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी, विनयभंग आणि जिवे मारण्याच्या धमकीचे गुन्हे नोंदविले. पुढे हे फाइल पोलिसांनी बंद करण्याचा अहवाल प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केला. न्यायालयाने २०१६ साली हे प्रकरण एकतर्फी खारीज केले. कायद्यानुसार ९० दिवसांत पुनर्निरीक्षण याचिका दाखल केली जाऊ शकते. ३१ मे २०१८ रोजी माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार नवनीत राणा यांचे वकील दीप मिश्रा आणि परवेज खान यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात ४ जून २०१८ रोजी पुनर्निरीक्षण आणि विलंब माफी याचिका दाखल केली. मंगळवारी विलंबमाफी याचिकेवर सुनावणी झाली. सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील परिक्षीत गणोरकर तर खा. आनंदराव अडसूळ यांच्यातर्फे अ‍ॅड. चंद्रशेखर डोरले यांनी युक्तिवाद केला.असा झाला युक्तिवाद-२०१४ मध्ये हे प्रकरण पोलिसांनी बंद केले. त्याला ९० दिवसांच्या आत आव्हान द्यायला हवे होते, मात्र, चार वर्षांपर्यंत तसे केले गेले नाही. त्यामुळे विलंबमाफी याचिका दाखल करता येत नसल्याचा युक्तिवाद पोलिसांतर्फे सरकारी पक्षाचे अभियोक्ता अ‍ॅड. परीक्षित गणोरकर यांनी केला.-खा.अडसूळ यांचे वकील अ‍ॅड. चंद्रशेखर डोरले यांनीही सरकारी पक्षाच्या युक्तिवादाला समर्थन दिले. बातम्या आणि सोशल मीडियावरून ही माहिती जाहीर झाली असल्यामुळे ती मिळाली नाही, हे म्हणणे गैर आहे, असे डोरले यांनी न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला.-वकील परवेझ खान यांनी तो युक्तिवाद खोडून काढताना फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार, कलम १५७ व १७३ नुसार पोलीस आणि मॅजिस्ट्रेट यांनी फिर्यादीला त्यासंबंधीची माहिती कळविणे हे त्यांचे कर्तव्य ठरते. ते त्यांनी पार पाडले नाही. बातम्या वा सोशल मीडियामार्फत जाहीर झालेली माहिती यासाठी ग्राह्य धरता येणार नाही, कारण की, कायद्याला ती माध्यमे पर्याय नाही, असा युक्तीवाद केला. सुप्रीम कोर्टाच्या न्यायनिवाड्यांचाही हवाला त्यांनी न्यायासनाला दिला. 'अ‍ॅझम्पशन' आणि 'प्रिझम्पशन'वर न्यायनिर्णय करण्याऐवजी तो कायद्याच्या कलमांच्या आधारांवर केला जावा, असा अग्रह खान यांनी धरला.