शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

दर ५५ रुपये; वेचणी २० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:13 IST

पान २ ची लिड नरेंद्र निकम मोर्शी : दिवसेंदिवस शेती करणे जिकरीचे काम होत आहे. खरिपातील सोयाबीन, उडीद व ...

पान २ ची लिड

नरेंद्र निकम

मोर्शी : दिवसेंदिवस शेती करणे जिकरीचे काम होत आहे. खरिपातील सोयाबीन, उडीद व मूग पिकाने दगा दिला. शेतकऱ्यांची सर्व मदार आता तूर व कपाशीवर असताना कापूस वेचणीचे दर वाढल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. कापसाचा दर ५० रुपये अन् तो वेचण्यासाठी २० रुपये प्रतिकिलो खर्च करायचे, अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. वेचणीसाठी २० रुपये प्रतिकिलो मजुरी द्यायची तयारी असतानाही मजूर मिळत नसल्याने उणापुरा कापूस घरी आणायचा तरी कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

मजुरी चुकविण्यासाठी शेतकऱ्यांना कापसाची किरकोळ विक्री करावी लागत आहे. भाव ५० ते ५४ रुपये किलो असताना, वेचणी सोडून हाती केवळ ३० रुपये येतात. बोंडअळी व बोंडसडीमुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. कापसाचे उत्पादन अर्ध्यावरच आले आहे. तालुक्यात बागायती शेती वाढत असल्याने मजुरांची टंचाई अधिक जाणवू लागली आहे. परिणामी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागणार नाही. मजुरी चुकविण्यासाठी चिल्लर विकलेल्या कापसाचे पैसे साठवले जात नाही. त्यामुळे भविष्याचे काय, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कापूस वेचणाऱ्या मजूर स्त्रीला २०० रुपये मजुरी असून, ती दिवसाला १० ते १२ किलो कापूस वेचते. बहुतांश शेतकऱ्यांना उत्पादन खर्च पण निघणार नाही, हे कळून चुकले आहे.

पूर्वी पाथीवर मजुर असायचे, मात्र आता एक-एक करून मजूर गोळा करावा लागतो. त्यातही बड्या शेतकऱ्यांकडे अधिक दिवस काम मिळेल, मजुरी मिळेल, या आशेपोटी मजूर वर्ग तिकडे धाव घेतो. त्यामुळे चार-दोन एकर कपाशी असलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब मजूरच झाले आहेत. २० रुपये किलोची कापूस वेचाई देणे परवडत नसल्याने घरच्या घरी कापूस वेचण्यावर भर दिला जात आहे.

खासगी व्यापारी बरा

कापसाचा शासकीय हमीभाव ५७०० रुपये आहे. खासगी बाजारात ५००० ते ५४०० रुपयांनी कापूस खरेदी केला जात आहे. नाफेडला कापूस द्यायचा असल्यास खरेदी केद्रांपर्यंत कापूस पोहचविण्यासाठी प्रतिक्विंटल २०० रुपये खर्च येतो. अर्थात खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हाती ५४०० रुपये पडतात. व्यापारी १५ ते २० दिवसांनी चुकारा करतात, तर नाफेड त्याच चुकाऱ्याला एक ते दोन महिन्यांचा कालावधी घेतला जातो. त्यामुळे ऑन दि स्पॉट विक्रीला शेतकरी पसंती देत आहेत.

मजुरीसाठी विकावा लागतो कापूस

कापूस वेचणीची मजुरी दररोज व रोख स्वरूपात द्यावी लागते. हातमजुरीवर चरितार्थ असल्याने कुणीही मजुरी थांबवून ठेवत नाही. त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना घरी येईल तसा कापूस विकावा लागतो. कापूस पाच क्विंटल मोजून द्यायचा अन् पैसे दोन क्विंटलचे तरी रोख द्या, अशी विनवणी व्यापाऱ्यांना करायची, ही ग्रामीण भागातील वस्तुस्थिती आहे.

कोट

सध्या खुल्या बाजारात कापसाला प्रतिक्विंटल ४८०० ते ५२०० रुपये दर मिळत आहे. तत्पूर्वी, कापूस वेचाईसाठी २० रुपये किलो खर्च आला. शेतकऱ्यांचे सारे गणितच कोलमडले आहे.

- मोरेश्वर पापडकर, तळणी, शेतकरी