शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

दर ५५ रुपये; वेचणी २० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:13 IST

पान २ ची लिड नरेंद्र निकम मोर्शी : दिवसेंदिवस शेती करणे जिकरीचे काम होत आहे. खरिपातील सोयाबीन, उडीद व ...

पान २ ची लिड

नरेंद्र निकम

मोर्शी : दिवसेंदिवस शेती करणे जिकरीचे काम होत आहे. खरिपातील सोयाबीन, उडीद व मूग पिकाने दगा दिला. शेतकऱ्यांची सर्व मदार आता तूर व कपाशीवर असताना कापूस वेचणीचे दर वाढल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. कापसाचा दर ५० रुपये अन् तो वेचण्यासाठी २० रुपये प्रतिकिलो खर्च करायचे, अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. वेचणीसाठी २० रुपये प्रतिकिलो मजुरी द्यायची तयारी असतानाही मजूर मिळत नसल्याने उणापुरा कापूस घरी आणायचा तरी कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

मजुरी चुकविण्यासाठी शेतकऱ्यांना कापसाची किरकोळ विक्री करावी लागत आहे. भाव ५० ते ५४ रुपये किलो असताना, वेचणी सोडून हाती केवळ ३० रुपये येतात. बोंडअळी व बोंडसडीमुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. कापसाचे उत्पादन अर्ध्यावरच आले आहे. तालुक्यात बागायती शेती वाढत असल्याने मजुरांची टंचाई अधिक जाणवू लागली आहे. परिणामी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागणार नाही. मजुरी चुकविण्यासाठी चिल्लर विकलेल्या कापसाचे पैसे साठवले जात नाही. त्यामुळे भविष्याचे काय, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कापूस वेचणाऱ्या मजूर स्त्रीला २०० रुपये मजुरी असून, ती दिवसाला १० ते १२ किलो कापूस वेचते. बहुतांश शेतकऱ्यांना उत्पादन खर्च पण निघणार नाही, हे कळून चुकले आहे.

पूर्वी पाथीवर मजुर असायचे, मात्र आता एक-एक करून मजूर गोळा करावा लागतो. त्यातही बड्या शेतकऱ्यांकडे अधिक दिवस काम मिळेल, मजुरी मिळेल, या आशेपोटी मजूर वर्ग तिकडे धाव घेतो. त्यामुळे चार-दोन एकर कपाशी असलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब मजूरच झाले आहेत. २० रुपये किलोची कापूस वेचाई देणे परवडत नसल्याने घरच्या घरी कापूस वेचण्यावर भर दिला जात आहे.

खासगी व्यापारी बरा

कापसाचा शासकीय हमीभाव ५७०० रुपये आहे. खासगी बाजारात ५००० ते ५४०० रुपयांनी कापूस खरेदी केला जात आहे. नाफेडला कापूस द्यायचा असल्यास खरेदी केद्रांपर्यंत कापूस पोहचविण्यासाठी प्रतिक्विंटल २०० रुपये खर्च येतो. अर्थात खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हाती ५४०० रुपये पडतात. व्यापारी १५ ते २० दिवसांनी चुकारा करतात, तर नाफेड त्याच चुकाऱ्याला एक ते दोन महिन्यांचा कालावधी घेतला जातो. त्यामुळे ऑन दि स्पॉट विक्रीला शेतकरी पसंती देत आहेत.

मजुरीसाठी विकावा लागतो कापूस

कापूस वेचणीची मजुरी दररोज व रोख स्वरूपात द्यावी लागते. हातमजुरीवर चरितार्थ असल्याने कुणीही मजुरी थांबवून ठेवत नाही. त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना घरी येईल तसा कापूस विकावा लागतो. कापूस पाच क्विंटल मोजून द्यायचा अन् पैसे दोन क्विंटलचे तरी रोख द्या, अशी विनवणी व्यापाऱ्यांना करायची, ही ग्रामीण भागातील वस्तुस्थिती आहे.

कोट

सध्या खुल्या बाजारात कापसाला प्रतिक्विंटल ४८०० ते ५२०० रुपये दर मिळत आहे. तत्पूर्वी, कापूस वेचाईसाठी २० रुपये किलो खर्च आला. शेतकऱ्यांचे सारे गणितच कोलमडले आहे.

- मोरेश्वर पापडकर, तळणी, शेतकरी