शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

पेरणीनंतर पावसाची दडी

By admin | Updated: June 29, 2015 00:40 IST

जिल्ह्यात १२ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले. नंतर पाच दिवसांनी मान्सूनचा नियमित पाऊस पडला.

शेतकरी चिंतेत : आठवडा कोरडा गेला, ७५ टक्के पेरणी बाकीअमरावती : जिल्ह्यात १२ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले. नंतर पाच दिवसांनी मान्सूनचा नियमित पाऊस पडला. त्यामुळे खरिपाच्या पेरणीला वेग आला. परंतु २२ जूननंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात २५ टक्के क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. दोन दिवसांत पाऊ स न आल्यास निम्म्या पेरणीक्षेत्रात मोड येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीला १५ जूनपासून सुरुवात झाली. नंतर आठवडाभर सतत सार्वत्रिक पाऊस झाला. खरिपाच्या पेरणीला आवश्यक ६५ ते ७० मि.मी. पाऊस झाला असल्याने खरिपाच्या पेरणीला वेग आला. जिल्ह्यात ७ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्रापैकी दीड लाख हेक्टर क्षेत्रात सद्यस्थितीत पेरणी आटोपली आहे. यापैकी १ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रात कपाशी व सोयाबीनची पेरणी झालेली आहे. मात्र २२ जूनपासून अद्यापपर्यंत पावसाने दांडी मारली आहे. संरक्षित सिंचनाची सुविधा असणाऱ्या क्षेत्रात स्प्रिंक्लर सुरु झाले आहेत. मात्र कोरडवाहू क्षेत्रात बिजांकुर करपण्याच्या स्थितीत आहे. पेरणी झालेल्या शेतात बियाणे अंकुरण होण्यास ओलाव्याची कमी भासत आहे. अशीच स्थिती दोन दिवस राहिल्यास कोरडवाहू क्षेत्रात झालेल्या पेरणीत किमान २ टक्के शेतात मोड येण्याची भीती निर्माण झाली आहे. तीन वर्षांपासून नापिकीचे सत्र सुरू आहे. मागील वर्षी दीड महिना उशिरा पाऊस आल्यामुळे पीक उद्ध्वस्त झाले. यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षीच्या तुलनेत चारपट म्हणजे १९५ मि.मी. पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु २२ तारखेपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. चार दिवसांपासून पाऊ स निरंक२४ जून रोजी चिखलदरा, मोर्शी व वरुड तालुक्यात ५ ते ७ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यानंतर २८ तारखेपर्यंत जिल्ह्यात कुठेही पाऊ स पडला नाही. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तीन दिवसांत तुरळक, नंतर आठवडा कोरडा जिल्ह्यात आठ दिवसांत काही तालुक्यात तुरळक पाऊ स पडला. २८ ते ३० जूनदरम्यान काही ठिकाणी आणखी तुरळक पाऊ स पडण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर पुुढील आठ दिवस (५ जुलैपर्यंत) पुन्हा कोरडा राहण्याची शक्यता श्री शिवाजी कृ षी महाविद्यालयाचे हवामन तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.