शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

महापालिकेच्या आमसभेत ‘कालबाह्य’ प्रस्तावांचा रतीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 01:08 IST

महापालिकेच्या मासिक आमसभेत कार्यक्रम पत्रिकेत कालबाह्य प्रस्तावांचा रतीब घालण्यात आल्याने लोकाभिमुख प्रश्नांना ‘वाचाच’ फुटत नसल्याचे वास्तव आहे.

प्रशासनाकडून हवी उपाययोजना : सांघिक प्रयत्नांची गरज अमरावती : महापालिकेच्या मासिक आमसभेत कार्यक्रम पत्रिकेत कालबाह्य प्रस्तावांचा रतीब घालण्यात आल्याने लोकाभिमुख प्रश्नांना ‘वाचाच’ फुटत नसल्याचे वास्तव आहे. कधी एखाद्या विषयावर शाब्दिक चकमक तर दुसऱ्या विषयावर कुणाचे तरी बहिर्गमन होत असल्याने कार्यक्रम पत्रिकेची जाडी वाढू लागली आहे. या कार्यक्रम पत्रिकेतील कालबाह्य झालेले प्रस्ताव काढून टाकावेत व ही कार्यक्रमपत्रिका फ्रेश करावी, अशी मागणी बहुतांश नगरसेवकांमधून होत आहे. नगरसेवकांनी दोन वर्षापूर्वी टाकलेल्या प्रस्तावांवर आमसभेमध्ये चर्चाच न झाल्याने ते प्रस्तावच आता कालबाह्य ठरू लागले आहेत. मात्र ते अद्यापही कार्यक्रम पत्रिकेवर कायम असल्याने दिवसेंदिवस प्रस्तावांच्या संख्येतच भर पडत आहे. गतवर्षी आॅगस्टमध्ये एलबीटी प्रणाली हद्दपार झाली असताना भाजपच्या संजय अग्रवालांचा प्रश्न १९ एप्रिल २०१४ पासून कार्यक्रम पत्रिकेत आहे. १ एप्रिल २०१४ पासून स्थानिक संस्था कराच्या दराबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी २०१६ चा जुलै उजाडला, एलबीटी रद्द झाली. मात्र हा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. बहुतांश नगरसेवकांना दोन वर्षापूर्वी टाकलेल्या प्रस्तावांवर उत्तरच मिळालेले नसल्याने चर्चा न झाल्याने ते प्रस्ताव कायम आहेत. विद्यमान नगरसेवकांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक असताना पुढील आमसभांमध्येही हे प्रस्ताव निकाली निघण्याची अजिबातच शक्यता नाही, त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीनंतरही ते रखडलेले प्रस्ताव कार्यक्रम पत्रिकेची जाडी वाढवतील की काय, अशी अनेक नगरसेवकांना भीती आहे. याशिवाय स्थानिक संस्था कराबाबतचे बहुतांश प्रस्ताव आता कालबाह्य ठरले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील जागा १४ एप्रिल २०१५ पूर्वी अधिग्रहीत करून त्याठिकाणी सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव असाच धुळखात बसला आहे. १४ एप्रिल २०१६ निघून गेल्यानंतरही पालिकेच्या आमसभेत या प्रस्तावावर चर्चा होऊ शकली नाही, हे वास्तव आहे. (प्रतिनिधी) बडनेऱ्यात टँकर पोहोचेना २० मार्च २०१५ च्या सर्वसाधारण सभेत बडनेरा शहरातील पाणीटंचाईवरील उपाययोजनेसंदर्भात काँग्रेसच्या कांचन ग्रेसपुंजे यांनी प्रस्ताव टाकला होता. आॅगस्ट २०१४ मध्ये बडनेरा शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा टँकर देण्यात आला परंतु अजूनपर्यंत सुरू न केल्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे, असा तो प्रस्ताव होता. दीड वर्षे उलटूनही या प्रस्तावावर चर्चा न झाल्याने हा प्रस्तावच कालबाह्य ठरला आहे. आमसभेत प्रस्तावांवरील होणारी लांबलचक चर्चा पाहता पुढील उन्हाळ्यात तरी ग्रेसपुंजेंना त्यांच्या प्रस्तावाचे उत्तर मिळेल का, याबाबत त्याही साशंक असतील. एकच प्रस्ताव दोनदा नगरसेवकांनी आमसभेमध्ये ठेवलेला प्रस्ताव वर्षोगिणती चर्चेसाठी येत नसल्याने काही नगरसेवकांना जुनाच प्रश्न रिपिट करावा लागतो. त्यामुळे उगाचाच कार्यक्रम पत्रिकेची लांबी वाढते. कार्यक्रम पत्रिकेत चार-सहा महिन्यांच्या कालावधीनंतर अनेक प्रस्ताव पुन्हा मांडण्याचा प्रयत्न नगरसेवक करतात. मात्र प्रशासनाकडून त्यांच्या प्रस्तावाला उत्तरच मिळत नाही.