शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

खुल्या जागेच्या संवर्धनाचा प्रश्न

By admin | Updated: September 12, 2015 00:16 IST

महापालिकेच्या दस्तूरनगर प्रभाग क्र.३३ मध्ये बहुतांश मध्यमवर्गीय लोकवस्ती आहे. या प्रभागात विकासाचे प्रश्न मार्गी लागले असले तरी...

अमरावती : महापालिकेच्या दस्तूरनगर प्रभाग क्र.३३ मध्ये बहुतांश मध्यमवर्गीय लोकवस्ती आहे. या प्रभागात विकासाचे प्रश्न मार्गी लागले असले तरी अनेक समस्या अद्यापही कायम आहेत. प्रभागातील दोन ते तीन उद्याने वगळता वैभव कॉलनीसह काही भागांत अविकसित उद्याने आहेत. त्यांचा कायापालट करण्याची आवश्यकता आहे. काही भागातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या सिमेंट नाल्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. प्रभागात महापालिकेची शाळा नाही. फरशी स्टॉप ते शिव इंग्लिश शाळेपर्यंतच्या नाल्याच्या संरक्षण भिंतीचा मुद्दा रखडलेला आहे. चौकातील वाहतूक सिग्नल सुरू करण्याचीही नितांत गरज आहे. कंटेनर रिकामे, कचरा जमिनीवर महापालिकेने विविध भागांत केरकचरा साठविण्यासाठी कचरा कंटेनर ठेवले आहेत. मात्र, नागरिक घराघरातील कचरा कंटेनरमध्ये न टाकता जमिनीवरच टाकतात. त्यामुळे त्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न झाला आहे. नागरिकांना कचरा टाकण्याची सोय व्हावी, यासाठीच महापालिकेने कंटेनर ठेवले आहेत. तेव्हा नागरिकांनी कचरा कंटेनरमध्येच टाकण्याची दक्षता घ्यावी. जेणेकरून घाण, दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या उत्पन्न होणार नाहीत. कचरा कंटेनरचा पुरेपूर वापर व्हावा, यादृष्टीने महापालिकेने तातडीने नियोजन केल्यास स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागू शकतो. खुल्या जागेचा व्हावा विकासमहापालिकेच्या हद्दीतील दस्तुरनगर प्रभाग क्र. ३३ मध्ये व्यंकटेश व महालक्ष्मी कॉलनीत महापालिकेच्या माध्यमातून तसेच अन्य दोन उद्यानांचा सर्वसमावेशक विकास झाला आहे. याच धर्तीवर प्रभागातील महापालिकेच्या खुल्या रिकाम्या जागेवर उद्याने साकारण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न करावेत. विविध नगर, कॉलनीतील मैदानांचे नियोजन करून सर्व सोयीयुक्त उद्याने तयार करता येऊ शकतात. सर्विस गल्ल्यांमध्ये अस्वच्छता प्रभागात विकासकामे बऱ्यापैकी झाली आहेत. परंतु काही ठिकाणी समस्या कायमच आहेत. सर्विस गल्ल्यांची स्वच्छता नियमितपणे होत नसल्याने नाल्या तुंबल्या आहेत. सांडपाणी रस्त्याववरून वाहत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा व डासांचा त्रास सहन करावा लागतो. नाल्यांच्या काठावरील घाण व केरकचरा वेळेत न उचलल्यास तो नालीत पडून नाल्या बुजतात. त्यामुळे सांडपाणी व्यवस्थितरीत्या वाहून जात नाही. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाल्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे चित्र आहे. नाल्याला संरक्षण भिंतीची प्रतीक्षादस्तुरनगर प्रभागातील नाल्याला संरक्षण भिंत नसल्याने नाल्याच्या काठालगत वास्तव्यास असलेल्या नागरिकांना डासांचा प्रकोप व तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यामुळे फरशी स्टॉप ते शिव इंग्लिश शाळेपासून वाहणाऱ्या या नाल्याच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंत बांधणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी या भागाच्या लोकप्रतिनिधींचा सतत पाठपुरावा सुरू आहे. मात्र, संरक्षण भिंतीसाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. नाल्याच्या पाण्यापासून उद्भवणारी समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरिता नाल्याला संरक्षण भिंत बांधणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींकडूून होणाऱ्या पाठपुराव्याची प्रशासनाने दखल घेऊन तातडीने निधी उपलब्ध करून दिल्यास नागरिकांसाठी ते सोयीचे होईल.