शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

उत्पादन खर्च वाढला, हमीभाव मात्र जुनाच!

By admin | Updated: July 19, 2014 23:39 IST

बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांच्यासोबत मजुरीच्या खर्चात कित्येक पटींनी वाढ झालेली असताना सोयाबीन, भुईमुगाच्या आधारभूत किमतीमध्ये २०१४-१५ या हंगामासाठी वाढ करण्यात आलेली नाही.

सोयाबीनला ठेंगा : कापूस, तूर, धानाला ५० रूपयांची वाढगजानन मोहोड - अमरावतीबियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांच्यासोबत मजुरीच्या खर्चात कित्येक पटींनी वाढ झालेली असताना सोयाबीन, भुईमुगाच्या आधारभूत किमतीमध्ये २०१४-१५ या हंगामासाठी वाढ करण्यात आलेली नाही. कापूस, तूर, धानाच्या किमतीमध्ये फक्त ५० रूपये प्रति क्विंटलने वाढ करण्यात आली आहे. दुष्काळ, अतिवृष्टी व गारपीट या संकटांनी आधीच शेतकरी गारद झाला असताना त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. २०१३च्या खरीप हंगामात अतिवृष्टी, गारपीट व परतीच्या पावसामुळे पिकांचे सरासरी उत्पन्न ४० ते ५० टक्क्यांनी घटले. सोयाबीन गंजीतच सडले, शेंगांमध्ये बिजांकुरण झाले. यामुळे २५६० या हमीभावांपेक्षा कमी भावाने सोयाबीनची विक्री झाली. पावसात भिजल्याने सोयाबीनची प्रतवारी कमी झाली. उगवणशक्तीदेखील ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाली. पेरणीसाठी ३० ते ४० टक्क्यांनी अधिक बियाणे लागणार आहे. सोयाबीनचे उत्पन्न कमी, उत्पादन खर्चात वाढसोयाबीनची उगवणशक्ती ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाल्याने अधिकचे बियाणे शेतकऱ्यांना लागणार आहे. एकरी ४ हजारांचे बियाणे, १हजार रूपये पेरणी खर्च, ३हजार रूपयांची खते, फवारणी औषधी, ३हजार रूपये निंदण, कापणी, मळणी व मजुरी असा एकरी ११ हजार रूपये खर्च यंदा अपेक्षित आहे. यंदा प्रतिकूल परिस्थितीमुळे २५ ते ३० टक्क्यांनी उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. एकरी ४ ते ५ क्विंटल उत्पन्न शासनाच्या आधारभूत किमतीपेक्षाही कमी राहणार आहे. सरसरी उत्पन्न यंदा कमी यंदा बियाण्यांची बॅग ३०० ते १००० रूपयांनी वाढली आहे. काळ्या बाजारात याच्या दुप्पट दाम शेतकऱ्यांना मोजावे लागत आहे, यंदाच्या हंगामात ५० दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. ज्यांनी पेरणीचे धाडस केले त्याच्यावर दुबार पेरणीची वेळ आली. आठ-पंधरा दिवसांनंतर येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा मशागत करावी लागत आहे, बियाण्यांवर वाढलेला खर्च, पेरणीसाठी पुन्हा वाढीव खर्च, मजुरांचा वाढलेला खर्च यामुळे शेतकरी पेरणीआधीच जेरीस आला आहे. पेरणीला दीड महिना उशीर होत असल्याने पिकाच्या वाढीला पुरेसा काळ मिळत नाही, तसेच उगवणशक्ती अभावी ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाल्याची रोपांची संख्या यामुळे पेरणीपूर्वीच सरासरी उत्पन्नात कमी येणार आहे, किमान आधारभूत किमतीत वाढ होऊन काहीसा भार हलका होईल या अपेक्षेत शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. कृषी मूल्य आयोगाच्या शिफारसीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेल्यानंतर आधारभूत किमतीत वाढ करण्यात येते. कपाशीचा उत्पादन खर्च ६०४० रूपये प्रति क्विंटल येत असल्याचे आयोगाने मान्य केले आहे. प्रत्यक्षात कपाशीसाठी शिफारस ५० रूपयांची केली.