शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

पेट्रोल-डिझेल दरवाढ कष्टकऱ्यांच्या मुळावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:12 IST

अंजनगाव सुर्जी : पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा जबरदस्त फटका ...

अंजनगाव सुर्जी : पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा जबरदस्त फटका बसत आहे. एकीकडे वाहतूक खर्च वाढला असून, दुसरीकडे मात्र भाजीपाला, कांदे, बटाटे, फळे यांचे दर कमीच आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करीत आपला माल विकण्याची वेळ आली आहे. अमरावती येथील मार्केट यार्डात हवालदिल झालेले शेतकरी कमी भावात आपला माल विकून निराश होत घरी परत जात आहेत. अतिशय विदारक परिस्थिती राज्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. केंद्र सरकारने इंधनाच्या दरावरील नियंत्रण हटवल्यापासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत वाढ होत गेली आहे.

अनेक पिके शेतातच करपून जात आहेत. नगदी पीक म्हणून भाजीपाला, फळे, कांदे आदी पिके शेतकरी आपल्या शेतात घेत आहेत. योग्य भाव आल्यावर बाजारात याची विक्री करून कर्ज फेडून कुटुंबाचा गाडा चालवू, अशी अपेक्षा अनेक शेतकरी बाळगून आहेत. पण, अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. पण, एक नवी समस्या समोर आली आहे, ती म्हणजे मालवाहतुकीत झालेली भाडेवाढ. पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडल्याने भाडेवाढदेखील मोठी झाली आहे. मात्र, यामध्ये शेतकरी भरडला जात आहे. कारण त्याच्या मालाच्या दरात कोणतीही भाववाढ झाली नाही. नगदी पीक घेण्याचा खर्च, वाहतुकीचा खर्च आणि मार्केट यार्डातील भाव या सर्व बाबींची बेरीज केली असता, शेतात पिकवलेला माल हा शेतातच राहिलेला बरा, असा विचार शेतकरी बांधव करू लागले आहेत. त्यामुळे ही नगदी पिके शेतात करपून जात आहेत.

वाढ रुपयांनी, घट पैशांत

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात रुपयांत आणि कमी होतात पैशात. केंद्र सरकारने इंधनावरील नियंत्रण हटवल्याने पेट्रोल व डिझेलचे दर वाढतच गेले आहेत. ही दरवाढ रुपयांपासून सुरू होते आणि ज्यावेळी याचे दर कमी होतात, ते मात्र पैशात. यामुळे शेतकऱ्यांना आणखी आर्थिक चटके सहन करण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग अजूनच आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतमालाच्या वाहतूक खर्चाने त्यात आणखी भर टाकली. यामुळे शेतकरी पूर्णपणे भरडला जात आहे.