शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जिल्ह्यात आठ लाखांवर वाहने, प्रदूषण चाचणी केवळ हजार वाहनांचीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:11 IST

अमरावती: संदीप मानकर जिल्ह्यात आरटीओच्या स्थापनेपासून तर आतापर्यंत, दुचाकी, चारचाकी, तीनचाकी, तसेच ट्रक, ट्रॅक्टर व इतर प्रकारची वाहने ...

अमरावती: संदीप मानकर

जिल्ह्यात आरटीओच्या स्थापनेपासून तर आतापर्यंत, दुचाकी, चारचाकी, तीनचाकी, तसेच ट्रक, ट्रॅक्टर व इतर प्रकारची वाहने असे एकूण ८ लाख १२ हजार ७४४ वाहनांची आरटीओकडे नोंद आहे. मात्र, आठ लाखांवर वाहनांची नोंद असताना गतवर्षी १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान आरटीओच्या पथकाने पीयूसी (प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र) फक्त ९३९ वाहनांची केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

इतर वाहने प्रदूषण करीत धावत आहे की काय? असा सवाल नागरिकांचा आहे. ९३९ वाहनांची गतवर्षी पीयूसी संदर्भात आरटीओच्या पथकाने तपासणी केली. त्यापैकी १०८ जप्त केली. ३१३ वाहने तपासणीअंती दोषी आढळून आली. अशा वाहन चालकांकडून ३ लाख १९ हजार ५०० रुपयांची दंडात्मक तडजोड शुल्क वसूल करण्यात आल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

१ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान ५०० पेक्षा अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २७ वाहने जप्त केली, तर १३१ दोषी आढळून आल्याने वाहनचालकांकडून दंडात्मक कारवाईअंती त्यांच्याकडून १ लाख १६ हजारांची तडजोड शुल्क वसूल करण्यात आल्याची नोंद आहे.

नवीन वाहने खरेदी केल्यानंतर त्या वाहनधारकांना वर्षभर पीयूसी प्रमाणपत्राची गरज नाही. मात्र, इतर वाहनांना दरवर्षी वाहनांची प्रदूषण चाचणी करून घेणे अनिवार्य असते. यासंदर्भात वाहतूक पोलीससुद्धा कारवाई करतात. विना पीयूसी धावणाऱ्या वाहनांवर कारवाईंचा बडगा उगारण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यातील एकूण वाहने- ८,१२,७४४

जिल्ह्यातील पीयूसी सेंटर- ३६

असे आहेत प्रदुषित वाहने तपासणीचे दर ( रूपये)

चारचाकी वाहने (पेट्रोल) - ९०

चारचाकी वाहने (डिझल) -११०

तीन चाकी वाहने (पेट्रोल) - ७०

दुचाकी -३५

कुठल्या वाहनांना किती दंड

कार - १०००

जीप -१०००

ट्रक - १०००

दुचाकी -१०००

बॉक्स:

पीयूषी केली नाही म्हणून ३१३ वाहनांना दंड

वाहनांची पीयूषी केली नाही म्हणून गत वर्षी फक्त ९३९ वाहनांची तपासणी करण्यात आली.

मात्र त्यामध्ये ३१३ वाहने दोषी आढळून आली. त्यांच्याकडून तीन लाखांच्यावर तडजोड शुल्क वसूल करण्यात आली. मात्र ज्यांनी तडजोड शुल्क भरला नाही व पीयूषीच्या निकषात न बसलेले १०८ वाहने आरटीओच्या भरारी पथकाने जप्त केल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते यांनी दिली.

कोट आहे.