शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आठ लाखांवर वाहने, प्रदूषण चाचणी केवळ हजार वाहनांचीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:11 IST

अमरावती: संदीप मानकर जिल्ह्यात आरटीओच्या स्थापनेपासून तर आतापर्यंत, दुचाकी, चारचाकी, तीनचाकी, तसेच ट्रक, ट्रॅक्टर व इतर प्रकारची वाहने ...

अमरावती: संदीप मानकर

जिल्ह्यात आरटीओच्या स्थापनेपासून तर आतापर्यंत, दुचाकी, चारचाकी, तीनचाकी, तसेच ट्रक, ट्रॅक्टर व इतर प्रकारची वाहने असे एकूण ८ लाख १२ हजार ७४४ वाहनांची आरटीओकडे नोंद आहे. मात्र, आठ लाखांवर वाहनांची नोंद असताना गतवर्षी १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान आरटीओच्या पथकाने पीयूसी (प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र) फक्त ९३९ वाहनांची केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

इतर वाहने प्रदूषण करीत धावत आहे की काय? असा सवाल नागरिकांचा आहे. ९३९ वाहनांची गतवर्षी पीयूसी संदर्भात आरटीओच्या पथकाने तपासणी केली. त्यापैकी १०८ जप्त केली. ३१३ वाहने तपासणीअंती दोषी आढळून आली. अशा वाहन चालकांकडून ३ लाख १९ हजार ५०० रुपयांची दंडात्मक तडजोड शुल्क वसूल करण्यात आल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

१ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान ५०० पेक्षा अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २७ वाहने जप्त केली, तर १३१ दोषी आढळून आल्याने वाहनचालकांकडून दंडात्मक कारवाईअंती त्यांच्याकडून १ लाख १६ हजारांची तडजोड शुल्क वसूल करण्यात आल्याची नोंद आहे.

नवीन वाहने खरेदी केल्यानंतर त्या वाहनधारकांना वर्षभर पीयूसी प्रमाणपत्राची गरज नाही. मात्र, इतर वाहनांना दरवर्षी वाहनांची प्रदूषण चाचणी करून घेणे अनिवार्य असते. यासंदर्भात वाहतूक पोलीससुद्धा कारवाई करतात. विना पीयूसी धावणाऱ्या वाहनांवर कारवाईंचा बडगा उगारण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यातील एकूण वाहने- ८,१२,७४४

जिल्ह्यातील पीयूसी सेंटर- ३६

असे आहेत प्रदुषित वाहने तपासणीचे दर ( रूपये)

चारचाकी वाहने (पेट्रोल) - ९०

चारचाकी वाहने (डिझल) -११०

तीन चाकी वाहने (पेट्रोल) - ७०

दुचाकी -३५

कुठल्या वाहनांना किती दंड

कार - १०००

जीप -१०००

ट्रक - १०००

दुचाकी -१०००

बॉक्स:

पीयूषी केली नाही म्हणून ३१३ वाहनांना दंड

वाहनांची पीयूषी केली नाही म्हणून गत वर्षी फक्त ९३९ वाहनांची तपासणी करण्यात आली.

मात्र त्यामध्ये ३१३ वाहने दोषी आढळून आली. त्यांच्याकडून तीन लाखांच्यावर तडजोड शुल्क वसूल करण्यात आली. मात्र ज्यांनी तडजोड शुल्क भरला नाही व पीयूषीच्या निकषात न बसलेले १०८ वाहने आरटीओच्या भरारी पथकाने जप्त केल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते यांनी दिली.

कोट आहे.