शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
3
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
4
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
5
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
6
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
7
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
8
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
9
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
10
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
11
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
12
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
13
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
14
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
15
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
16
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
18
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
19
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
20
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन

संत्रा बहराची फळगळ

By admin | Updated: September 11, 2015 00:29 IST

जिल्ह्यात यंदा सर्वाधिक असलेल्या संत्रा आंबिया बहराच्या अपरिपक्व फळांना मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे.

उत्पादनात २० टक्क्यांनी कमी : बुरशीचा प्रादुर्भाव, वातावरणाचा बदल कारणीभूतअमरावती : जिल्ह्यात यंदा सर्वाधिक असलेल्या संत्रा आंबिया बहराच्या अपरिपक्व फळांना मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. बुरशीजन्य आजार, अन्नद्रव्यांची कमतरता व वातावरणातील बदलांमुळे ही फळगळ होत असल्याचे कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले. या फळगळीमुळे संत्र्याच्या सरासरी उत्पादनात किमान २० टक्क्यांनी घट येण्याची शक्यता असून यामुळे संत्रा उत्पादकांना कोट्यवधींचा फटका बसणार आहे. सद्यस्थितीत दिवसा वातावरणात कमालीची उष्णता जाणवत आहे. अचानक झालेल्या या बदलासोबतच अन्नधान्याची कमतरता व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने संत्र्याची फळगळ होत आहे. बोटिओडिप्लोडिया, कोलीटोट्रिकम व काही अंशी आॅलटरनेरिआ या बुरशीमुळे संत्र्यांची मोठ्या प्रमाणावर फळगळ होत आहे. या बुरशी फळांच्या देठांमधून फळांमध्ये प्रवेश करून पूर्ण वाढ झालेल्या फळांचे नुकसान करतात. जुन्या वाळलेल्या फांद्या असतील तर रोग अधिक पसरतो. काळी माशी, मावा-तुडतुडे यांच्या शरीरातून निघालेल्या साखरेसारख्या पदार्थांवर बुरशीची वाढ, पेशीक्षय होऊन फळगळ होत आहे. संत्र्यामध्ये शेंडेमर रोगाला कारणीभूत असलेल्या बुरशींचा प्रादुर्भाव पावसाळ्यात होतो. याची लक्षणे सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात दिसतात. नंतर या बुरशीचा प्रादुर्भाव संत्र्याचे देठ व सालीच्या जोडावर होऊन तेथे काळपट तपकिरी रंगाचे डाग पडतात. तो भाग कुजून फळांची गळ होते. फायटोप्थेरा या बुरशीच्या प्रादुर्भावामुळेदेखील संत्राफळावर फळकुज्या रोग येतो. जुलै-आॅगस्टमधील सततचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर हा रोग पसरतो. झाडांच्या जमिनीलगतच्या फांद्यावरील कोवळ्या पानावर प्रथम भुरकट/तांबडे ठिपके पडतात व पानगळ होत आहे. झाडावरील कोवळ्या फांद्या कुजतात व प्रतिकूल वातावरणात हा रोग लहान फळांवर येऊन फळांवर कुजल्यासारखे डाग पडतात. त्यानंतर फळे गळून पडत असल्याचे प्रादेशिक संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ राजेंद्र वानखडे, योगेश इंगळे व मोहन खाकरे यांनी सांगितले. या कराव्यात उपाययोजनाअमरावती : झाडांवर भरपूर पालवी राहावी म्हणून अन्नद्रव्यांचा शिफारसीनुसार वापर करावा. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळल्यास त्वरित पुरवठा करावा. बागांमधील ओल तुटली असेल तर शेतकऱ्यांनी ओलीत सुरू करावे. पहिले हलके पाणी द्यावे व नंतर वाढवत न्यावे. पाण्याच्या पाळ्या नियमित जमिनीच्या आवश्यकतेप्रमाणे देण्यात याव्यात. ठिबक सिंचनाद्वारे ओलीत करावयाचे असल्यास दररोज ओलीत करावे. आॅगस्ट सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात एन. ए.ए. १ ग्रॅम (१० पीपीएम) किंवा २, ४-डी १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) + युरिया १ किलो + १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा बेनोमिल १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच रसशोषण करणाऱ्या पतंगाच्या नियंत्रणासाठी २५ मि.ली. डायझिनॉन किंवा १० मि.ली. मॅलॉथिआॅन अधिक १०० ग्रॅम गूळ अधिक २५ मि. लि. फळांचा रस (खाली पडलेल्या) किंवा शिरका एक लिटर पाण्यात मिसळून तयार केलेले मिश्रण मोठे तोंड असलेल्या डब्यात घेऊन हे डबे अधूनमधून झाडांवर टांगावेत. सायंकाळी बागेत धूर करावा. नर पतंगांना आकर्षित करणारे ०.१ टक्के मिथाईल युजेनॉलचे सापळे एकरी १० या प्रमाणात लावावे. तसेच संत्राबागेत विजेचे दिवे लावावेत. रस शोषण करणारा पतंगाच्या अळ्या गुळवेल व वासनवेल या वेलीवर उपजिविका करीत असल्यामुळे या वेलींचा नायनाट करावा. संत्रा फळांची तोडणी झाल्यानंतर लगेच वाळलेल्या फांद्यांची छाटणी करावी किंवा पावसाळ्यापूर्वी रोगट व वाळलेल्या फांद्या (सल) काढून जाळाव्यात व लगेच झाडावर कार्बेन्डाझिम ०.१ टक्के (१० ग्रॅम १० लिटर पाणी) फवारणी करावी. गळून पडलेली फळे लवकरात लवकर उचलून दूर फेकून द्यावीत किंवा खड्यात पुरवावी. नॅफथॅलीन अ‍ॅसेटिक अ‍ॅसिड (एन. ए. ए.) किंवा २, ४-डी पाण्यात पूर्णपणे विरघळत नसल्यामुळे ४०-५० मि. ली. अल्कोहोल किंवा अ‍ॅसिटोनमध्ये विरघळून घ्यावीत, असे कृषी विद्यापीठाच्या प्रादेशिक संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.