शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

रतनगंज परिसरात खाद्यतेलाच्या जुन्या पिंपांचा बाजार

By admin | Updated: January 10, 2017 00:12 IST

रतनगंज परिसरात खाद्यतेलाच्या जुन्या पिंपांचा बाजार भरतो. येथे ते डब्बे धुतली जातात. त्यानंतर जंग लागलेली पिंपे पुन्हा बाजारपेठेत विक्री केले जात आहे.

अन्न प्रशासन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष : खाद्यतेलाच्या विक्रीसाठी वापरसंदीप मानकर अमरावतीरतनगंज परिसरात खाद्यतेलाच्या जुन्या पिंपांचा बाजार भरतो. येथे ते डब्बे धुतली जातात. त्यानंतर जंग लागलेली पिंपे पुन्हा बाजारपेठेत विक्री केले जात आहे. पुन्हा हे डब्बे रियुज करुन याममध्ये नागरिकांना खाद्यतेल विक्रीचा खुलेआम गौरखधंदा चालतो. परंतु अशा जुन्या पिंपाच्या वापरावर अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार गुन्हा असून अशा डब्बयांचा सर्रास वापर करून नागरिकांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे. 'लोकमत'ने यासंदर्भात रविवारी स्टिंग केले असता हा गौरखधंदा 'लोकमत'च्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. इतवारा बाजारातील अ‍ॅकॅडमिक स्कूलच्या बाजूला रतनगंज परिसरातील काला नागोबा परिसरात हा बाजार भरतो. या बाजारात अनेक व्यवसायिक असतात. शहरातील किराणा दुकानदारांकडून ७ ते ८ रुपयाला हे खाद्यतेलाचे जुने पिंपे विकत घेण्यात येतात. यानंतर हे काला नागोबा परिसरातील अनेक ठिकाणी धुतले जातात. यानंतर त्याच दुकानदारांना हे पिंपे २० ते ३० रुपयांपर्यंत विक्री करण्यात येते. यानंतर दुकानदार ड्रममध्ये आलेले खाद्यतेल या जंग लागलेल्या व जुन्या पिंप्यांमध्ये भरून नागरिकांना खुल्या तेलाची विक्री करण्यात येते. जुन्या पिंप्यांचा वापर करणे हे नियमबाह्य असून अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी अशा किराणा व्यापाऱ्यांवर धाडी टाकून या जुन्या पिंप्यांची तपासणी केली, तर जे काय आहे ते सत्य बाहेर निघेल. या धंद्यात अनेक दिवसांपासून सुरु असून याकडे पोलीसांचे व अन्न व प्रशासन विभागाचे दुर्लक्ष आहे. जंग लागलेले व इंनफेक्शन या डब्यांचा पूर्णवापर करण्यात येत असल्याने या पासून नागरिकांना विविध आजार होत आहे. यामुळे पोटाचे आजार व कर्करोग होण्याचाही धोका निर्माण होऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञ डॉक्टरांनी वर्तविला आहे. परंतु नागरिकांच्या जिविताशी रोज खाद्यतेल विक्रेते खेळ करी आहेत. पण अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी गप्प का, असा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे. नालीत धुतले जातात खाद्यतेलाचे पिंपअनेक ठिकाणी खाद्यतेलाच्या पिंपांचे विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे येथे शेकडो पिप्यांचे ढिग , लागलेले निदर्शनास आले आहे. हे पिंपे ज्या ठिकाणी धुण्यात येतात त्या ठिकाणी मोठी नाली आहे. त्या नालीवर डिटरजंट सदर डब्बे धुतल्या जात आहे. त्यामुळे हे घाणे पाणी सुध्दा या डब्यात चिकटते. व त्याच किरकोळ व्यापारी खुले खाद्यतेल भरून ते नागरिकांना विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे खुले पिंप विक्रीचा व्यापार थांबविणे गरजेचे झाले आहे. जुन्या पिंपांमध्येच जर खाद्यतेल भरून विक्री करण्यात येत असेल तर अन्न व प्रशासन विभागाने धाडी टाकून कारवाई करणे अपेक्षित आहे.एफडीए गप्प का? शहरात गंज लागलेल्या जून्या पिप्यांमधुन खुल्या खाद्यतेलाची विक्री होत आहे. हे नियमबाह्य असून यामुळे हे तेल नागरिकांच्या खाण्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्या जिविताला धोका निर्माण होण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे. हा प्रकार लोकमतने शुक्रवारच्या अंकात लोकदरबारात मांडले. लोकांचे आरोग्य धोक्यात असताना अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी गप्प का, असा सवाल जागरूक नागरिक विचारत आहेत.जुन्या पिंपांचा वापर केल्याने त्यात जर विशिष्ट प्रकारचे केमिकल राहते. ते खाद्यतेलात मिश्रित झाले तर नागरिकांना विषबाधा होऊ शकते. तसेच संसर्ग झाल्याने व हे अनेकवेळा खाण्यात आल्याने मेंदू, यकृत, हृदयाचे आजार वाढण्याची शक्यता अधिक असते.- अतूल यादगिरे, कॅन्सर तज्ज्ञ, अमरावती