शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

रतनगंज परिसरात खाद्यतेलाच्या जुन्या पिंपांचा बाजार

By admin | Updated: January 10, 2017 00:12 IST

रतनगंज परिसरात खाद्यतेलाच्या जुन्या पिंपांचा बाजार भरतो. येथे ते डब्बे धुतली जातात. त्यानंतर जंग लागलेली पिंपे पुन्हा बाजारपेठेत विक्री केले जात आहे.

अन्न प्रशासन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष : खाद्यतेलाच्या विक्रीसाठी वापरसंदीप मानकर अमरावतीरतनगंज परिसरात खाद्यतेलाच्या जुन्या पिंपांचा बाजार भरतो. येथे ते डब्बे धुतली जातात. त्यानंतर जंग लागलेली पिंपे पुन्हा बाजारपेठेत विक्री केले जात आहे. पुन्हा हे डब्बे रियुज करुन याममध्ये नागरिकांना खाद्यतेल विक्रीचा खुलेआम गौरखधंदा चालतो. परंतु अशा जुन्या पिंपाच्या वापरावर अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार गुन्हा असून अशा डब्बयांचा सर्रास वापर करून नागरिकांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे. 'लोकमत'ने यासंदर्भात रविवारी स्टिंग केले असता हा गौरखधंदा 'लोकमत'च्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. इतवारा बाजारातील अ‍ॅकॅडमिक स्कूलच्या बाजूला रतनगंज परिसरातील काला नागोबा परिसरात हा बाजार भरतो. या बाजारात अनेक व्यवसायिक असतात. शहरातील किराणा दुकानदारांकडून ७ ते ८ रुपयाला हे खाद्यतेलाचे जुने पिंपे विकत घेण्यात येतात. यानंतर हे काला नागोबा परिसरातील अनेक ठिकाणी धुतले जातात. यानंतर त्याच दुकानदारांना हे पिंपे २० ते ३० रुपयांपर्यंत विक्री करण्यात येते. यानंतर दुकानदार ड्रममध्ये आलेले खाद्यतेल या जंग लागलेल्या व जुन्या पिंप्यांमध्ये भरून नागरिकांना खुल्या तेलाची विक्री करण्यात येते. जुन्या पिंप्यांचा वापर करणे हे नियमबाह्य असून अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी अशा किराणा व्यापाऱ्यांवर धाडी टाकून या जुन्या पिंप्यांची तपासणी केली, तर जे काय आहे ते सत्य बाहेर निघेल. या धंद्यात अनेक दिवसांपासून सुरु असून याकडे पोलीसांचे व अन्न व प्रशासन विभागाचे दुर्लक्ष आहे. जंग लागलेले व इंनफेक्शन या डब्यांचा पूर्णवापर करण्यात येत असल्याने या पासून नागरिकांना विविध आजार होत आहे. यामुळे पोटाचे आजार व कर्करोग होण्याचाही धोका निर्माण होऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञ डॉक्टरांनी वर्तविला आहे. परंतु नागरिकांच्या जिविताशी रोज खाद्यतेल विक्रेते खेळ करी आहेत. पण अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी गप्प का, असा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे. नालीत धुतले जातात खाद्यतेलाचे पिंपअनेक ठिकाणी खाद्यतेलाच्या पिंपांचे विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे येथे शेकडो पिप्यांचे ढिग , लागलेले निदर्शनास आले आहे. हे पिंपे ज्या ठिकाणी धुण्यात येतात त्या ठिकाणी मोठी नाली आहे. त्या नालीवर डिटरजंट सदर डब्बे धुतल्या जात आहे. त्यामुळे हे घाणे पाणी सुध्दा या डब्यात चिकटते. व त्याच किरकोळ व्यापारी खुले खाद्यतेल भरून ते नागरिकांना विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे खुले पिंप विक्रीचा व्यापार थांबविणे गरजेचे झाले आहे. जुन्या पिंपांमध्येच जर खाद्यतेल भरून विक्री करण्यात येत असेल तर अन्न व प्रशासन विभागाने धाडी टाकून कारवाई करणे अपेक्षित आहे.एफडीए गप्प का? शहरात गंज लागलेल्या जून्या पिप्यांमधुन खुल्या खाद्यतेलाची विक्री होत आहे. हे नियमबाह्य असून यामुळे हे तेल नागरिकांच्या खाण्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्या जिविताला धोका निर्माण होण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे. हा प्रकार लोकमतने शुक्रवारच्या अंकात लोकदरबारात मांडले. लोकांचे आरोग्य धोक्यात असताना अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी गप्प का, असा सवाल जागरूक नागरिक विचारत आहेत.जुन्या पिंपांचा वापर केल्याने त्यात जर विशिष्ट प्रकारचे केमिकल राहते. ते खाद्यतेलात मिश्रित झाले तर नागरिकांना विषबाधा होऊ शकते. तसेच संसर्ग झाल्याने व हे अनेकवेळा खाण्यात आल्याने मेंदू, यकृत, हृदयाचे आजार वाढण्याची शक्यता अधिक असते.- अतूल यादगिरे, कॅन्सर तज्ज्ञ, अमरावती