शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

नापिकीचे सत्र, ‘व्हिजन २०१५’ गारद!

By admin | Updated: January 27, 2015 23:23 IST

उत्पादन खर्च कमी करण्यावर भर देऊन दर हेक्टरी उत्पादनात वाढ करणे, शेतीपूरक व्यवसायाला व नगदी पीक उत्पादनाला चालना देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्याचे दृष्टीने

आकड्यांचा खेळ, कागदावर समाधान गजानन मोहोड - अमरावतीउत्पादन खर्च कमी करण्यावर भर देऊन दर हेक्टरी उत्पादनात वाढ करणे, शेतीपूरक व्यवसायाला व नगदी पीक उत्पादनाला चालना देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्याचे दृष्टीने कृषी विभागाने जिल्ह्यासाठी केलेल्या व्हिजन २०१५ तीन वर्षापासून ओला व कोरडा दुष्काळ, अकाली पाऊस व गारपीटने गारद झाला आहे.यंदा तर जिल्ह्यातील १९७४ गावात पैसेवारी ४६ पैसे आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत अर्धेही उत्पन्न नाही. सरासरी उत्पन्नाच्या ४० टक्के उत्पन्न होत असताना ‘हा खेळ आकड्यांचा’ ठरला आहे. अधिकाधिक आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांना सावरण्याची गरज असताना शासनाने प्रचलित निकषानुसार एकरी १८०० रूपयांची मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. शेतकरी पुन्हा संकटातफेब्रुवारी २०११ मध्ये कृषी अनुसंधान केंद्र दुर्गापूर येथे अनौपचारिक गटाची बैठक होऊन कृषी विभागाचा व्हिजन अमरावती २०१५ हा कृषी विभागाचा अजेंडा ठरविण्यात आला. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे खासदार, आमदार, सर्व बाजार समित्यांचे सभापती, जिल्ह्यातील प्रगतीशिल शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीदरम्यान चर्चा, संवाद, लेखी सूचना यावरून २०१४-१५ कृषी विभागाचा आराखडा तयार करण्यात आला. सलग तीन वर्षे २०१२-१३, २०१३-१४ व खरीप २०१४, रबी २०१५ चा हंगाम जिल्ह्यात अती पाऊस, पावसात खंड, अतिवृष्टी, गारपीट यामुळे गारद झाला. केवळ शेती पिकांचे नव्हे तर फळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले व शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.काय आहे व्हिजन - २०१५?पीक पद्धतीत बदल, दुबार पिकाखालील क्षेत्रात वाढ, रबी क्षेत्र ३० ते ४० टक्क्यांनी वाढविणे.सुक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करून ५ वर्षात या सिंचनाखालील क्षेत्र ५० हजार हेक्टरने वाढविणे.उत्पादनक्षम फळबागाखालील क्षेत्र ७५ हजार हेक्टर करणे.संरक्षित ओलितासाठी २० हजार शेतकऱ्यांची निर्मिती.शेतकऱ्यांचे गट करून शेतीपूरक व्यवसायाला चालना देणे.यांत्रिकीकरणाला चालना देऊन मजुरीचे खर्च कपात करणे.खारपाणपट्ट्यात शेततळे, पेट्रो केरोसीन पंप, तुषार संच, रॉडो ट्यूबवेल यांच्या माध्यमातून संरक्षित ओलीत करणे. जुन्या सिमेंट बांधामधील गाळ काढून खोलीकरण व भूजलाचे पुनर्भरण करणे.मूल्याधारित जलसंधारणाच्या कामात वाढ करणे.आजची वस्तूस्थितीदुबार पिकाखालील क्षेत्रात २५ टक्क्याने वाढ झाली,पावसाअभावी खरिपाचे ७० टक्के क्षेत्र बाधित झाले, आर्द्रतेअभावी रबीची हरभऱ्याच्या सरासरी उत्पन्नात ४० ते ५० टक्क्यांनी कमी.सुक्ष्म सिंचन प्रस्ताव तालुका कार्यालयातून पुढे सरकत नाही. परिणामी अनुदानास विलंब होतो त्यामुळे शेतकरी टाळतात.उत्पादनक्षम फळबागाखालील क्षेत्र १५ ते २० हजाराने वाढल, मृगबहाराचे फळ भावाअभावी झाडावर.जानेवारीचा आंबिया बहराला पण ताण बसला नाही त्यामुळे बहार फुटला नाही. शेतकऱ्यांऐवजी राजकीय पक्ष कार्यकर्त्यांचे गट तयार झाले शेतीपूरक व्यवसाय कागदावर आकडेवारीतच राहिला. यांत्रिकीकरणामुळे मजुरीवर कुठलाही असर न होता मजुरीचे दर दिवसेंदिवस वाढतच आहे.खारपाणपट्ट्यासाठी केळकर समितीचा अहवाल कागदावरच आहे.