शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नापिकीचे सत्र, ‘व्हिजन २०१५’ गारद!

By admin | Updated: January 27, 2015 23:23 IST

उत्पादन खर्च कमी करण्यावर भर देऊन दर हेक्टरी उत्पादनात वाढ करणे, शेतीपूरक व्यवसायाला व नगदी पीक उत्पादनाला चालना देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्याचे दृष्टीने

आकड्यांचा खेळ, कागदावर समाधान गजानन मोहोड - अमरावतीउत्पादन खर्च कमी करण्यावर भर देऊन दर हेक्टरी उत्पादनात वाढ करणे, शेतीपूरक व्यवसायाला व नगदी पीक उत्पादनाला चालना देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्याचे दृष्टीने कृषी विभागाने जिल्ह्यासाठी केलेल्या व्हिजन २०१५ तीन वर्षापासून ओला व कोरडा दुष्काळ, अकाली पाऊस व गारपीटने गारद झाला आहे.यंदा तर जिल्ह्यातील १९७४ गावात पैसेवारी ४६ पैसे आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत अर्धेही उत्पन्न नाही. सरासरी उत्पन्नाच्या ४० टक्के उत्पन्न होत असताना ‘हा खेळ आकड्यांचा’ ठरला आहे. अधिकाधिक आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांना सावरण्याची गरज असताना शासनाने प्रचलित निकषानुसार एकरी १८०० रूपयांची मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. शेतकरी पुन्हा संकटातफेब्रुवारी २०११ मध्ये कृषी अनुसंधान केंद्र दुर्गापूर येथे अनौपचारिक गटाची बैठक होऊन कृषी विभागाचा व्हिजन अमरावती २०१५ हा कृषी विभागाचा अजेंडा ठरविण्यात आला. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे खासदार, आमदार, सर्व बाजार समित्यांचे सभापती, जिल्ह्यातील प्रगतीशिल शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीदरम्यान चर्चा, संवाद, लेखी सूचना यावरून २०१४-१५ कृषी विभागाचा आराखडा तयार करण्यात आला. सलग तीन वर्षे २०१२-१३, २०१३-१४ व खरीप २०१४, रबी २०१५ चा हंगाम जिल्ह्यात अती पाऊस, पावसात खंड, अतिवृष्टी, गारपीट यामुळे गारद झाला. केवळ शेती पिकांचे नव्हे तर फळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले व शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.काय आहे व्हिजन - २०१५?पीक पद्धतीत बदल, दुबार पिकाखालील क्षेत्रात वाढ, रबी क्षेत्र ३० ते ४० टक्क्यांनी वाढविणे.सुक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करून ५ वर्षात या सिंचनाखालील क्षेत्र ५० हजार हेक्टरने वाढविणे.उत्पादनक्षम फळबागाखालील क्षेत्र ७५ हजार हेक्टर करणे.संरक्षित ओलितासाठी २० हजार शेतकऱ्यांची निर्मिती.शेतकऱ्यांचे गट करून शेतीपूरक व्यवसायाला चालना देणे.यांत्रिकीकरणाला चालना देऊन मजुरीचे खर्च कपात करणे.खारपाणपट्ट्यात शेततळे, पेट्रो केरोसीन पंप, तुषार संच, रॉडो ट्यूबवेल यांच्या माध्यमातून संरक्षित ओलीत करणे. जुन्या सिमेंट बांधामधील गाळ काढून खोलीकरण व भूजलाचे पुनर्भरण करणे.मूल्याधारित जलसंधारणाच्या कामात वाढ करणे.आजची वस्तूस्थितीदुबार पिकाखालील क्षेत्रात २५ टक्क्याने वाढ झाली,पावसाअभावी खरिपाचे ७० टक्के क्षेत्र बाधित झाले, आर्द्रतेअभावी रबीची हरभऱ्याच्या सरासरी उत्पन्नात ४० ते ५० टक्क्यांनी कमी.सुक्ष्म सिंचन प्रस्ताव तालुका कार्यालयातून पुढे सरकत नाही. परिणामी अनुदानास विलंब होतो त्यामुळे शेतकरी टाळतात.उत्पादनक्षम फळबागाखालील क्षेत्र १५ ते २० हजाराने वाढल, मृगबहाराचे फळ भावाअभावी झाडावर.जानेवारीचा आंबिया बहराला पण ताण बसला नाही त्यामुळे बहार फुटला नाही. शेतकऱ्यांऐवजी राजकीय पक्ष कार्यकर्त्यांचे गट तयार झाले शेतीपूरक व्यवसाय कागदावर आकडेवारीतच राहिला. यांत्रिकीकरणामुळे मजुरीवर कुठलाही असर न होता मजुरीचे दर दिवसेंदिवस वाढतच आहे.खारपाणपट्ट्यासाठी केळकर समितीचा अहवाल कागदावरच आहे.