शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

‘आदिवासीं’च्या एकाधिकाराला ‘खो’

By admin | Updated: October 22, 2016 00:11 IST

राज्यातील जनजाती (आदिवासी) व्यक्तींची आर्थिक स्थिती (सुधारणे) अधिनियम १९७६ मधील तरतुदीनुसार आदिवासी ..

व्यापाऱ्यांशी हातमिळवणी : अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिकाश्यामकांत पाण्डेय धारणीराज्यातील जनजाती (आदिवासी) व्यक्तींची आर्थिक स्थिती (सुधारणे) अधिनियम १९७६ मधील तरतुदीनुसार आदिवासी उपयोजना क्षेत्रात एकाधिकार खरेदी योजनेचा शुभारंभ महामंडळाचे संचालक व माजी आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते शुक्रवारी कळमखार येथे करण्यात आले आहे. त्यामुळे आता एकाधिकार लागू झाल्याने खासगी व्यापाऱ्यांच्या दुकानाला कुलूप लावण्याची आवश्यकता असताना येथील विभागीय प्रबंधकांनी व्यापाऱ्यांशी हातमिळवणी करून अभय दिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. येथील खासगी व्यापारी गरीब आदिवासी शेतकऱ्यांना रोख खरेदी करण्याच्या नावाखाली एकाधिकार योजनेच्या दरापेक्षा कमी दरात सोयाबीन, उडीद व भुईमुंगाची खरेदी करीत आहेत. अशा प्रकारची कमी दरातील खरेदी आणि तेही एकाधिकार क्षेत्रात खरेदी करणे महामंडळाच्या कायद्यानुसार फौजदारीस पात्र अपराध ठरतो. अशा लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध विभागीय व्यवस्थापकांनी त्वरित कार्यवाही करण्याची अपेक्षा असताना उलट त्यांना आदिवासींची सर्रास लूट करण्याचा परवानाच दिल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. शहरातील अमरावती-बुरहानपूर मुख्य मार्गावर जवळपास १० (दहा) दुकानांत मोठ्या थाटेने काटे लावून सोयाबीनची खरेदी करीत आहे. ही दुकाने मुख्य मार्गाच्या पूर्वेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाक्याजवळ आणि दक्षिणेला दारुल ऊलूमच्या भाड्याच्या गाड्यावर राजरोषपणे सुरू आहे. त्याचप्रमाणे मांडवा रोड, टिंगऱ्या रोड येथे सुद्धा दुकाने थाटली गेली आहे. या सर्व दुकानांची माहिती अधिकाऱ्यांना असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्याचे टाळले जात आहे. या संपूर्ण प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाण-घेवाण महामंडळाचे अधिकारी आणि व्यापाऱ्यांदरम्यान झाल्याची चर्चा आहे. यापूर्वीही अधिकारी आणि व्यापाऱ्यांनी चना प्रकरणात संगनमत करून कोषाची माया जमविली होती, हे विशेष.