शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विभागात सव्वापाच लाख पदवीधर

By admin | Updated: July 16, 2014 23:50 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये मागील ३२ वर्षांमध्ये पदवीधरांच्या संख्येमध्ये कमी अधिक प्रमाण दिसून आले. १९८५ ते २०१४ दरम्यान ५ लाख ३७ हजार ६३० विद्यार्थी

वैभव बाबरेकर - अमरावतीसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये मागील ३२ वर्षांमध्ये पदवीधरांच्या संख्येमध्ये कमी अधिक प्रमाण दिसून आले. १९८५ ते २०१४ दरम्यान ५ लाख ३७ हजार ६३० विद्यार्थी पदवीधर झाले असून आतापर्यंत २ लाख पदवी प्रमाणपत्र विद्यापीठात धूळखात आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना १९८३ साली झाली. पहिल्या वर्षी विद्यापीठांतर्गत पदवीधरांची संख्या निरंक राहिली. दुसऱ्या वर्षी १९८४ मध्ये विभागात केवळ बीएडच्या ३३२ विद्यार्थ्यांना पदवीप्रमाण वितरीत करण्यात आले होते. १९८५ साली पदवीधरांचे प्रमाण वाढत गेल्यावर ती संख्या २ हजार ५० वर पोहोचली. याचप्रमाणे दरवर्षी विद्यापीठातंर्गत येणाऱ्या महाविद्यालयांची संख्या वाढत गेल्याने प्रत्येक वर्षात पदवीधरांची संख्यासुध्दा वाढली. यामध्ये मध्यंतरी १९९६ साली २० हजार ६१७ विद्यार्थी पदवीधर झालेत. त्यानत्ांर १९९७ मध्ये पुन्हा पदवीधर कमी होऊन ती १९ हजार६४३ वर पोहोचली. त्यानंतर पुन्हा पदवीधरांचा उतरता आलेख पाहता २० हजारांवर पोहोचलेली आकडेवारी २००१ मध्ये १७ हजार ८७३ वर पोहोचली. त्यानंतर पदवीधरांचा चढता आलेख पाहायला मिळाला असून २०१४ मध्ये ३२ हजार १०५ विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली. या ३२ वर्षांमध्ये पदवीधरांच्या संख्येत कमी अधिक प्रमाण आढळून आले असून आतापर्यंत ५ लाख ३७ हजार ६३० विद्यार्थी पदवीधर झाले आहेत. यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी विद्यापीठातून पदवीप्रमाण पत्र विद्यापीठ प्रशासनाकडून तयार करण्यात आले होते. मात्र त्यापैकी २ लाखांच्या जवळपास विद्यार्थ्यांनी पदवीप्रमाणपत्र नेलेच नाही. त्यामुळे २ लाख प्रमाणपत्र अजूनही विद्यापीठात धूळखात पडलेले आहे.विद्यापीठ्यात मनुष्यबळाची कमतरतासंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी सलंग्न महाविद्यालयात दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र वाढत्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक लेखाजोखा ठेवण्याकरिता मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. तरीसुध्दा मनुष्यबळ वाढविण्याचे प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाने सुरु केले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा ताण वाढतच आहे. वादविवाद, आंदोलनांमुळे विद्यापीठ चर्चेतसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मागील काही वर्षांमध्ये चांगलेच गाजले आहे. कुलगरु कन्या गुणवाढ प्रकरण व कुलसचिवाचा स्वग्राम भत्ता प्रकरण यामुळे विद्यापीठ चांगलेच चर्चेत आले आहे. अजूनही दिनेश सूर्यवंशी यांनी आंदोलनाची भूमिका दर्शविली आहे.पदवीधारकांना विद्यापीठाकडून पत्रव्यवहार३२ वर्षांमध्ये विभागातील २ लाख पदवीप्रमाणपत्र विद्यापीठात धूळखात आहेत. या प्रमाणपत्रकरिता विद्यापीठाकडून पदवीधर विद्यार्थ्यांना पत्र देण्यात आले आहे. मात्र विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र नेलेच नाही. याकरिता दरवर्षी ५० रुपये विलंब शुल्क भरावे लागत असल्याने अनेकांनी आवश्यकता भासत नसलेल्या प्रमाणपत्राकडे दुर्लक्ष केले आहेत.