शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँकांद्वारा १२ टक्केच खरीप पीककर्ज वाटप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 19:31 IST

खरीप हंगामाला सुरूवात झाली असताना विभागातील बँकांचा खरीप पीककर्ज वाटपास असहकार आहे.

अमरावती : खरीप हंगामाला सुरूवात झाली असताना विभागातील बँकांचा खरीप पीककर्ज वाटपास असहकार आहे. सद्यस्थितीत सरासरी १९ टक्के वाटप झाले असले तरी सर्वाधिक खातेदार असणा-या राष्ट्रीयीकृत बँकांचा टक्का १२.२६ टक्केच आहे. बँका शासन प्रशासनास जुमानत नसल्यामुळे ऐन पेरणीच्या काळात शेतकरी अडचणीत आले आहेत.अमरावती विभागातील बँकांना यंदा ८,५४९ कोटी ८० लाखांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक आहे. त्या तुलनेत सद्यस्थितीत २,२५,९७२ शेतक-यांना २,२८,०९६ हेक्टर क्षेत्रासाठी १,६५६ कोटी ६० लाखांचे कर्जवाटप बँकांनी केले आहे. ही १९.३८ टक्केवारी आहे. यंदा १ एप्रिलपासून खरिपाच्या पीककर्ज वाटपाला सुरुवात झालेली आहे. यामध्ये जिल्हा बँकांनी जूनच्या सुरुवातीपासून कर्जवाटपाला सुरुवात केली आहे. विभागातील जिल्हा बँकांना यंदा २३०५.६९ कोटी रुपयांचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत १७,३९१ शेतक-यांना ३२,६५८ हेक्टरसाठी १४२.३७ कोटींचे वाटप केले. ही २६.८६ टक्केवारी आहे. अकोला जिल्हा बँकेला ६७९.२५ कोटींचे लक्ष्यांक असताना २४,०४४ शेतक-यांना ४५,४२९ हेक्टर क्षेत्रासाठी १९७.३९ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. ही २९.०९ टक्केवारी आहे. वाशीम जिल्हा बँकेने ५०४.६० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना २३,३५४ शेतक-यांना १७८.०८ कोटींचे वाटप केले. ही ३५.२९ टक्केवारी आहे. बुलडाणा जिल्हा बँकेने ४७६० शेतकºयांना ७,२३३ हेक्टरसाठी २२.८७ कोटींचे वाटप केले. ही ४८.४० टक्केवारी आहे, तर यवतमाळ जिल्हा बँकेने ७२,८७१ शेतक-यांना १,००,१४१ हेक्टरसाठी ३७६.२० कोटींचे वाटप केले. ही ६९.०८ टक्केवारी आहे.जिल्हा बँकांच्या तुलनेत राष्ट्रीयीकृत बँकांचा नन्नाचा पाढा राहिला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १३.४२ टक्के, अकोला १२.६१ टक्के, वाशीम ८.८१ टक्के, बुलडाणा ५.५८ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यात १९.७२ टक्के पीककर्ज वाटप केले आहे. ग्रामीण बँकेने सरसरी ९.२० टक्के कर्जवाटप केले आहे.  विभागातील जिल्हानिहाय कर्जवाटपअमरावती जिल्ह्यात लक्ष्यांकाच्या २९८.७५ कोटी म्हणजेच १७.७३ टक्के, अकोला जिल्ह्यात २८६.१२ कोटी म्हणजेच लक्ष्यांकाच्या २०.४६ टक्के, वाशीम जिल्ह्यात २६४.६४ कोटी म्हणजेच १७.३० टक्के, बुलडाणा जिल्ह्यात ११९.६२ कोटी म्हणजेच ६.७४ टक्के व यवतमाळ जिल्ह्यात ६८७.४५ कोटींचे वाटप सद्यस्थितीत करण्यात आले. ही ३१.८० टक्केवारी आहे. व्यापारी बँका जिल्हा प्रशासनाचे जुमानत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.