शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

संत्रा कलमांपाठोपाठ जंभेरीचे रोपटेही धोक्यात

By admin | Updated: September 14, 2015 00:02 IST

विदर्भाचा कॅिलफोर्निया म्हणून वरुड तालुका देशभर परिचित आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, पश्चिम महाराष्ट्रामध्ये या संत्रा कलमांची अधिक मागणी असते.

नर्सरीधारकांना लाखोंचा फटका : अपुऱ्या पावसाचा फटकाजयप्रकाश भोंडेकर शेंदूरजनाघाटविदर्भाचा कॅिलफोर्निया म्हणून वरुड तालुका देशभर परिचित आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, पश्चिम महाराष्ट्रामध्ये या संत्रा कलमांची अधिक मागणी असते. १८ महिन्यांचे उत्पादन असलेल्या संत्रा, मोसंबीसह लिंबूवर्गीय कलमांचे रोप लावल्यांनतर त्यावर सहा महिन्यांनंतर डोळे चढविले (बडींग) जाते. ही प्रक्रिया नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत चालते. नर्सरीधारकांनी डोळे चढविलेल्या कलमांची मशागत करून त्या वाढविल्या जातात. जून महिन्यात १८ महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर संत्रा कलमा विक्रीस योग्य होतात. मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्याने नर्सरीधारकांवर चिंतेचे सावट पसरले आहे. जंभेरी रोपांची लागवड करणाऱ्यावरसुध्दा अवकळा पसरली आहे. मागील ६० ते ७० वर्षांपासून शेंदूरजनाघाट परिसरातील शेतकरी ईडलिंबापासून काढलेल्या बियांतून तयार केलेल्या जंभेरी नावाच्या रोपट्यावर कलमा चढवून त्यापासून संत्रा मोसंबी, लिंंबूची रोपटी (कलमा) तयार करतात. या कलमा उत्पादनाची आक्टोबर, नोव्हेंबरपासून सुरुवात केल्या जाते. ईडलिंंबू नावाच्या झाडाला येणाऱ्या फळातून बी काढून ते सावलीमध्ये सुकविले जाते. नंतर वाफा पध्दतीने त्याची पेरणी करून त्यापासून रोपटे तयार केले जातात. रोपट्याची लागवड जुलै ते आॅगस्टमध्ये सुरू केली जाते. नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये डोळे बांधणी केली जाते. सदर्हू रोपटे ८ ते ९ इंच अंतरावर शेतामध्ये लावले जाते. त्यावर दोन ते ३ वर्षे वयाच्या संत्रा झाडावरील डोळा (कलम) काढून ते या रोपट्यावर चढविले जाते. जंभेरीच्या रोपट्यावर संत्राकरिता रंगपूर लाईम, मोसंबीकरिता न्युसेलर हैदराबादी, गावरानी अशा जातीच्या कलमा चढविली जाते. जून महिन्यापासून या कलमांची जोपासना केली जाते. या कलमांची वाढ होण्यास आणि विक्रीस उपलब्ध होईपर्यंत साधारणत दीड वर्षाचा (१८ महिने) कालावधी लागतो. अशा पध्दतीने संत्रासह लिंंबूवर्गीय कलमा शास्त्रोक्त पध्दतीने कलमांची निर्मिती होते. संत्रा कलमा तयार करण्याकरिता १८ ते २२ रुपयांचा खर्च येतो. यावर्षी संत्र्यासह लिंंबूवर्गीय कलमांचे सुमारे दीड ते दोन कोटींच्या घरात उत्पादन आहे. कृषी विभागाने डी.एन.ए चाचणी करुनच संत्रा, मोसंबी आणि लिंंबूवर्गीय कलमांचे उत्पादन केले जाते. कलमांच्या खरेदीकरिता. राजस्थान, मध्यप्रदेशासह देशाच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी येतात. विविध राज्याच्या कृषी विभागाच्या वतीनेसुध्दा येथून परवान्यावर खरेदी केली जाते. यातून जून ते सप्टेंबरपर्यंत काट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. तालुक्यात २७५ नर्सरी परवानाधारक तर तेवढेच विनापरवाना संत्रा कलमा निर्मिती करणारे आहेत. शेतजमिनीमध्ये (विघा) २० आरपासून तर ४०-५० आर जमिनीवर लागवड केली जाते. २० आर जमिनीवर ३५ हजार कलमां तयार केल्या जातात. यावर्षी दीड ते दोन कोटी संत्रा कलमा निर्मितीचे कार्य नर्सरीधारक करीत आहेत. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावलौकिक मिळविलेल्या वरुड तालुक्यावर नैसर्गिक ते कृत्रिम असे संकट सातत्याने येत असते. यावर्षीसुध्दा नोव्हेंबर अखेरपासून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जंभेरीच्या रोपट्यावर संत्राचा डोळा लावण्याचे काम झाले. जेमतेम लावलेल्या डोळ्याने (बडींग) अंकुरने सुरु केले होते. अनेक अडचणीवर मात करून जीवापेक्षाही अधिक जपवणूक करून संत्रा कलम तयार केल्यात. मात्र जून महिन्यापासून सतत दीड महिना पावसाने दडी मारली. यामुळे संत्रा कलमांना मागणीच नसल्याने लाखो संत्रा कलमा शेतात उभ्या आहेत. ४ ते ५ रुपये प्रति कलम भाव मिळत आहे. उत्पादन खर्च १२ ते १४ रुपये आला असल्याने अल्प दरात विकण्याची मानसिकत नसतानाही नाइलाजाने विकली जाते. नवीन लागवडीकरिता जभेंरीचे रोपटे लावले जाते. मात्र संत्रा कलमांना मागणी नसल्याने रोपालासुध्दा भाव मिळत नाही. यातूनही सावरत नर्सरीधारकांनी रोपांची लागवड केली. मात्र पाऊस नसल्याने कृत्रिम पाणी पुरवठा करुन जगविणे सुरु केले आहे. मात्र तापत्या उन्हामुळे रोपेसुध्दा सुकू लागली आहेत. त्यामुळे नर्सरीधारकांना दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे. अनेकांकडे यंदाच्याच कलमांची विक्री न झाल्याने कलमा तशाच पडून आहेत.नर्सरीधारकांकडे खरेदीदारांची पाठदरवर्षी पावसाळ्यात कलमांच्या खरेदीसाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यासह परप्रांतीय शेतकरी वरुड तालुक्यात येत असतात. परंतु यंदा मात्र पावसाच्या वेळापत्रकात बदल झाल्याने आणि अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने संत्राकलम लागवड करणाऱ्या नर्सरीधारकांनी कलमांच्या खरेदीसाठी फारशी गर्दी केली नाही. याची झळ नर्सरीधारकांना बसली आहे.