शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

न्यूरोसर्जनअभावी इर्विनचे रुग्ण मरणाच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 22:04 IST

आपत्कालीन आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सज्ज असणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात न्यूरोसर्जनचे पद अस्तित्वात नाही. त्यामुळे अपघातात मेंदूला मार लागलेल्या अनेक रुग्णांना खासगीत उपचार करून घ्यावे लागतात. त्यासाठी येणारा अफाट खर्च परवडणारा नसल्याने अनेकांचा जीव उपचाराअभावी जात असल्याची भीती व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देनागपूर, खासगीत रेफर : अनेकांचे जीव गेल्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आपत्कालीन आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सज्ज असणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात न्यूरोसर्जनचे पद अस्तित्वात नाही. त्यामुळे अपघातात मेंदूला मार लागलेल्या अनेक रुग्णांना खासगीत उपचार करून घ्यावे लागतात. त्यासाठी येणारा अफाट खर्च परवडणारा नसल्याने अनेकांचा जीव उपचाराअभावी जात असल्याची भीती व्यक्त होत आहे.अमरावती जिल्हा व जिल्ह्याबाहेरील अपघातग्रस्त रुग्णांना तात्काळ उपचार मिळण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णवाहिका वा अन्य वाहनाद्वारे आणले जाते. रुग्णाला त्वरेने दाखल करून घेतले जाते. अपघातग्रस्त रुग्ण रक्तबंबाळ अवस्थेत बेडवर पडून असताना, डॉक्टर तपासणी करतात. परिचारिकांना सलाइन व आवश्यक त्या औषधी देण्यास सांगितले जाते. जखमेतून रक्त थांबण्यासाठी टाके व मलमपट्टी केली जाते. रुग्ण जर बेशुद्धावस्थेत असेल किंवा त्याच्या डोक्याला मार लागला असेल, तर त्याला सीटी स्कॅन सूचविले जाते. नेमके अशावेळी काय, असा प्रश्न इर्विनमध्ये उद्भवतो. कारण नियमित वेळेत सीटी स्कॅन तंत्रज्ञ तयार असतात; मात्र रुग्ण ड्युटी टाइम नसताना कॉल केल्यानंतर हा तंत्रज्ञ उपलब्ध असेल, याची खात्री कुणीही देऊ शकत नाही.प्रत्येक क्षण जीवन-मृत्यूच्या रेषेवर घालवणाऱ्या रुग्णासाठी ही वेळ फार महत्त्वाची असते. तासभरानंतर सीटी स्कॅन झाले तरी त्याचे रिपोर्ट तपासून उपचाराची दिशा ठरविणाºया न्यूरोसर्जनचे पदच जिल्हा सामान्य रुग्णालयाला उपलब्ध करण्यात आलेले नाही.आरोग्य प्रशासनाची हेळसांडअपघातात मेंदूला मार लागलेल्या गंभीर रुग्णाला नागपूर हलविण्याचा सल्ला दिला जातो, नाही तर खासगी रुग्णालयात दाखल करावे लागते. हा कालपव्यय रुग्णांसाठी घातक ठरत आहे. इर्विन रुग्णालयात न्यूरोसर्जनचे पदच नसल्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांना तपासणार कोण, असा प्रश्न उद्भवला आहे. तास-दोन तास निघून जाईपर्यंत रुग्णाची प्राणज्योत मालवते, अशी स्थिती सद्यस्थितीत येथे पाहायला मिळत आहे. २० लाख लोकसंख्येच्या आरोग्याची जबाबदारी वाहणाºया जिल्हा सामान्य रुग्णालयात अपघातग्रस्तांवर अशी वेळ येणे, ही गंभीर बाब असल्याच्या प्रतिक्रिया उपटत आहेत. तथापि, गेल्या कित्येक वर्षांपासून आरोग्य प्रशासनाने हा मुद्दा दुर्लक्षित केला आहे.न्यूरोसर्जनचे पद जिल्हा सामान्य रूग्णालयात बहाल करण्यातबाबत अनेकदा मागणी नागरिक व लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली आहे. त्यावर राज्याच्या आरोग्य विभागाकडून तातडीने विचार होण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात न्यूरोसर्जनचे पद नाही. त्यामुळे गंभीर स्थितीतील रुग्णांना नागपूर रेफर केले जाते. यासाठी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आवश्यकता आहे.- श्यामसुंदर निकमजिल्हा शल्यचिकित्सक