शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

आंतरराष्ट्रीय 'सट्टा' सोयाबीन घसरले !

By admin | Updated: February 20, 2015 00:09 IST

खरीप २०१४ चे ९० टक्के पेरणीक्षेत्र असणाऱ्या सोयाबीन व कापसाला यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्याने मोठा फटका बसला आहे.

लोकमत विशेषगजानन मोहोड अमरावतीखरीप २०१४ चे ९० टक्के पेरणीक्षेत्र असणाऱ्या सोयाबीन व कापसाला यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्याने मोठा फटका बसला आहे. सोने, चांदीसह कापूस व सोयाबीन हे एनसीडीईएक्स (नॅशनल कमोडीटी डेरीव्हेशन एक्सचेंज लिमीटेड) मध्ये समाविष्ट आहे. मात्र तुरीचा यामध्ये समावेश नसल्याने या आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम झालेला नाही. त्यामुळे तुरीच्या भावात वाढ होत आहे, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.जिल्ह्यात दररोज सकाळी ११.३० वाजतादरम्यान एनसीडीईएक्सचे दर (व्यापाऱ्यांच्या भाषेत डबा) उघडतात व त्यानुसार शेतमालाचे भाव ठरविण्यात येऊन बाजार समितीमध्ये मालाची खरेदी प्रक्रिया सुरू होते. यावर्षी ब्राझील, अर्जेंटीना व अमेरिका या देशात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाल्यामुळे भारताचा सर्वात मोठा ग्राहक देश असलेल्या चीनकडून मागणी कमी झाली. आंतरराष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत भारताचे उत्पादन हे ५ ते ७ टक्क्यांनी कमी असल्याचा परिणाम निर्यातीवर झाला व याचा थेट परिणाम होऊन सोयाबीनचे भाव यंदा पडले आहे. सोयाबीनप्रमाणे कापसासाठी देखील चीन मोठा ग्राहक आहे. मात्र आॅस्ट्रेलिया व अमेरिकेत कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. त्याचप्रमाणे चीनमध्येदेखील कापूस उत्पादन अधिक झाले. भारतातून दरवर्षी दीड कोटी कापसाच्या गाठी निर्यात केल्या जातात. यंदा ५० लाख गाठीची निर्यात अद्यापपर्यंत झालेली नाही. यंदा भारतामध्ये ४ कोटी ५० लाख गाठी तयार करण्यात आल्या. देशातील सूतगिरणीद्वारा साधारणपणे ३ कोटी १५ लाख गाठींची खरेदी करण्यात येते. उर्वरित १ कोटीवर गाठींना मागणी नाही. मागील वर्षीच्या २५ ते ३० लाख कापसाच्या गाठी निर्यातीअभावी अद्याप शिल्लक आहेत. यामुळे कापसाचे दर हमीभावाच्या आत असल्याची माहिती अमरावती बाजार समितीचे अडते, व्यापारी अमर बांबल यांनी दिली. मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस व सोंगणी, मळणीच्या काळात परतीचा पाऊस व गारपीट यामुळे सोयाबीन उत्पादनात कमी होऊन सोयाबीन डागी झाले. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असल्यामुळे एफएक्यू ग्रेडच्या सोयाबीनला चार हजारांवर भाव मिळाला. यंदा सोयाबीनचे दर ३००० ते ३२०० रूपये प्रतिक्विंटल दरम्यान स्थिरावले आहे. कापसाच्या हमीभावात ४ हजार ५० रुपये असताना ग्रामीण भागात तर ३५०० रूपये क्विंटलने कापसाची खरेदी होत आहे. जिल्ह्यात खरीप २०१४ मध्ये ६ लाख ७९ हजार ९९० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. यापैकी ३ लाख १९ हजार ९८५ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन व १ लाख ९४ हजार ३५२ हेक्टर क्षेत्रात कपासीची पेरणी झाली आहे. एकूण पेरणीक्षेत्राच्या ९० टक्के हे पेरणीक्षेत्र आहे. या हंगामात पेरणीपासून उशिरा पाऊस व नंतर खंड यामुळे सोयाबीन उत्पादनात ७० ते ७५ टक्क््यांनी कमी झाली. जिल्हा दुष्काळग्रस्त आहे. उत्पादन कमी असताना मागणी कमी असल्यामुळे सोयाबीन व कापसाचे भाव पडले. याचा फार मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.