शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली, मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात
4
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
5
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
9
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
12
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
13
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
14
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
15
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
16
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
17
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
18
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
20
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी

आंतरराष्ट्रीय 'सट्टा' सोयाबीन घसरले !

By admin | Updated: February 20, 2015 00:09 IST

खरीप २०१४ चे ९० टक्के पेरणीक्षेत्र असणाऱ्या सोयाबीन व कापसाला यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्याने मोठा फटका बसला आहे.

लोकमत विशेषगजानन मोहोड अमरावतीखरीप २०१४ चे ९० टक्के पेरणीक्षेत्र असणाऱ्या सोयाबीन व कापसाला यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्याने मोठा फटका बसला आहे. सोने, चांदीसह कापूस व सोयाबीन हे एनसीडीईएक्स (नॅशनल कमोडीटी डेरीव्हेशन एक्सचेंज लिमीटेड) मध्ये समाविष्ट आहे. मात्र तुरीचा यामध्ये समावेश नसल्याने या आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम झालेला नाही. त्यामुळे तुरीच्या भावात वाढ होत आहे, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.जिल्ह्यात दररोज सकाळी ११.३० वाजतादरम्यान एनसीडीईएक्सचे दर (व्यापाऱ्यांच्या भाषेत डबा) उघडतात व त्यानुसार शेतमालाचे भाव ठरविण्यात येऊन बाजार समितीमध्ये मालाची खरेदी प्रक्रिया सुरू होते. यावर्षी ब्राझील, अर्जेंटीना व अमेरिका या देशात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाल्यामुळे भारताचा सर्वात मोठा ग्राहक देश असलेल्या चीनकडून मागणी कमी झाली. आंतरराष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत भारताचे उत्पादन हे ५ ते ७ टक्क्यांनी कमी असल्याचा परिणाम निर्यातीवर झाला व याचा थेट परिणाम होऊन सोयाबीनचे भाव यंदा पडले आहे. सोयाबीनप्रमाणे कापसासाठी देखील चीन मोठा ग्राहक आहे. मात्र आॅस्ट्रेलिया व अमेरिकेत कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. त्याचप्रमाणे चीनमध्येदेखील कापूस उत्पादन अधिक झाले. भारतातून दरवर्षी दीड कोटी कापसाच्या गाठी निर्यात केल्या जातात. यंदा ५० लाख गाठीची निर्यात अद्यापपर्यंत झालेली नाही. यंदा भारतामध्ये ४ कोटी ५० लाख गाठी तयार करण्यात आल्या. देशातील सूतगिरणीद्वारा साधारणपणे ३ कोटी १५ लाख गाठींची खरेदी करण्यात येते. उर्वरित १ कोटीवर गाठींना मागणी नाही. मागील वर्षीच्या २५ ते ३० लाख कापसाच्या गाठी निर्यातीअभावी अद्याप शिल्लक आहेत. यामुळे कापसाचे दर हमीभावाच्या आत असल्याची माहिती अमरावती बाजार समितीचे अडते, व्यापारी अमर बांबल यांनी दिली. मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस व सोंगणी, मळणीच्या काळात परतीचा पाऊस व गारपीट यामुळे सोयाबीन उत्पादनात कमी होऊन सोयाबीन डागी झाले. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असल्यामुळे एफएक्यू ग्रेडच्या सोयाबीनला चार हजारांवर भाव मिळाला. यंदा सोयाबीनचे दर ३००० ते ३२०० रूपये प्रतिक्विंटल दरम्यान स्थिरावले आहे. कापसाच्या हमीभावात ४ हजार ५० रुपये असताना ग्रामीण भागात तर ३५०० रूपये क्विंटलने कापसाची खरेदी होत आहे. जिल्ह्यात खरीप २०१४ मध्ये ६ लाख ७९ हजार ९९० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. यापैकी ३ लाख १९ हजार ९८५ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन व १ लाख ९४ हजार ३५२ हेक्टर क्षेत्रात कपासीची पेरणी झाली आहे. एकूण पेरणीक्षेत्राच्या ९० टक्के हे पेरणीक्षेत्र आहे. या हंगामात पेरणीपासून उशिरा पाऊस व नंतर खंड यामुळे सोयाबीन उत्पादनात ७० ते ७५ टक्क््यांनी कमी झाली. जिल्हा दुष्काळग्रस्त आहे. उत्पादन कमी असताना मागणी कमी असल्यामुळे सोयाबीन व कापसाचे भाव पडले. याचा फार मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.