शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

शासकीय योजनांचा कारभार रामभरोसे

By admin | Updated: June 25, 2014 23:32 IST

गोरगरीब निराधार नागरिकांना जगण्यासाठी आधार मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. परंतु बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या लापरवाहीने

अचलपूर : गोरगरीब निराधार नागरिकांना जगण्यासाठी आधार मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. परंतु बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या लापरवाहीने या योजनांना हरताळ फासला जात आहे. परिणामी अनेक निराधार लाभार्थ्यांना योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.संजयगांधी, इंदिरा गांधी तथा श्रावणबाळ निराधार योजनांचा लाभ घेण्यासाठी निराधारांना कार्यालय व बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहे. या शासकीय योजनेच्या कार्यालयांमधील गोंधळ असल्याची माहिती हाती आली आहे. हा विभाग रामभरोसे सुरु असून यावर अधिकाऱ्यांचा अंकुश आहे काय, असा प्रश्न जनतेत उपस्थित झाला आहे. दारिद्र्यरेषेखाली येत असलेल्या अनेक निराधार नागरिक संजय गांधी निराधार योजनेपासून वंचित आहेत. त्यातील काहींना गेल्या तीन महिन्यांपासून अनुदान मिळाले नाही. काही केशरी शिधा पत्रिकाधारकांना दारिद्र्यरेषेखाली दाखवून निराधार योजनेत समाविष्ट करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. वास्तविक निराधार, वयोवृद्धांना जगण्यासाठी आधार मिळावा यासाठी सरकार लाखो रुपये खर्च करीत असताना त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कधी तहसील तर कधी बँकेत खाते उघडण्यासाठी चकरा माराव्या लागत आहे. त्यासाठी त्यांना तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे.आॅनलाईन डाटा सुरु झाल्यापासून गेल्या तीन महिन्यांपासून अनेकांना अनुदान मिळाले नाही. अनेक निराधारांचा दारिद्र्यरेषेखालील कार्डमध्ये समावेश केल्याने अनुदान मिळण्यास अडथळे येत असल्याची माहिती आहे. काही निराधारांना तर गेल्या सहा महिन्यांपासून अनुदान मिळाले नाहीत.शासकीय योजनांच्या लाभापासून अजूनही कित्येक लाभार्थी वंचित असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी दलालांचा बोलबाला आहे. लाभाच्या प्राप्तीसाठी दलाल लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहे. त्यांच्या माध्यमातून गेल्यास तत्काळ काम होते. तर सामान्य नागरिक गेल्यास त्यांना भटकंती करावी लागते, असे चित्र येथील तहसील कार्यालयात बघायला मिळत आहे.संजय गांधी निराधार योजनेच्या शहरी विभागाचे प्रमुख तथा नायब तहसीलदार व्ही.एम. कांडलकर यांचेशी संपर्क होऊ न शकल्याने ग्रामीण भागाचे प्रमुख नायब तहसीलदार फुलमाळी यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, ''सध्या आॅन लाइन डाटा एन्ट्री सुरु आहे. अजून एक ते दीड महिना हे काम चालणार आहे. त्यानंतर डाटा मुंबई येथे जाऊन व मुंबईहून डाटा परत आल्यावर माहिती मिळेल. आम्ही आमच्या स्तरावर काहीच करु शकत नाही''. (शहर प्रतिनिधी)