शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
3
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
4
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
5
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
6
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
7
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
8
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
9
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
10
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
11
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
12
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
13
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
14
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
15
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
16
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
17
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
18
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
19
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
20
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा

बायकोच्या मोबाईलला वैतागले नवरे, भरवसा सेलमध्ये ६२४ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:38 IST

नवरा-बायकोच्या भांडणाच्या भरवसा सेलमध्ये ६२४ तक्रारी, १६२ प्रकरणात घडविला समेट अमरावती: संदीप मानकर बायकोच्या मोबाईलला वैतागलेले नवरे, घरगुती वाद, ...

नवरा-बायकोच्या भांडणाच्या भरवसा सेलमध्ये ६२४ तक्रारी, १६२ प्रकरणात घडविला समेट

अमरावती: संदीप मानकर

बायकोच्या मोबाईलला वैतागलेले नवरे, घरगुती वाद, नवरा-बायकोचा एकामेकांवरील संशय, नवऱ्याला जडलेले दारूचे व्यसन तसेच फेसबूक, व्हॉट्सॲपच्या वापरामुळे होणारी भांडणे, विवाहित महिलेचा सासरच्या मंडळीकडून होणारा छळ आदी कारणांमुळे वर्षभरात पोलीस आयुक्तलयात असलेल्या भरवसा सेलमध्ये ६२४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. बायकोच्या मोबाईलला वैतागल्यानंतर नवऱ्यानेसुद्धा पोलिसांकडे बायकोची तक्रार केल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत.

भरवसा सेलमध्ये तक्रारीचा अर्ज आल्यानंतर येथील महिला पोलीस व अधिकारी नवरा व बायकोचे समुपदेशन करून दोघांचीही समजूत काढतात. त्यांचा संसार कसा टिकेल, त्यांच्यातील गैरसमज दूर होऊन समेट कसा घडेल, याकरिता प्रयत्न केले जातात. समझोता न झाल्यामुळे २६४ प्रकरणे पुढील कारवाईसाठी शाखेला फाई्ल केल्याचे पोलिसांनी सांगितले. १६२ प्रकरणांत समेट घडवून आणण्यात पोलिसांना यश आले. २९ प्रकरणांत कुठलाच तोडगा न निघाल्यामुळे भादंविचे कलम ४९८ (अ) अन्वये गुन्हा नोंदविण्याकरिता ही प्रकरणे संबंधित ठाण्यात पाठविण्यात आल्याची माहिती शहर भरवसा सेलचे पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

बॉक्स:

नवरा-बायकोमध्ये होणाऱ्या भांडणाची कारणे

नवऱ्याचा किंवा बायकोचा दुसऱ्यावर संशय, सासू-सासऱ्याशी न पटणे, फोनवर बोलणे, सोशल मीडियाचा वाढता वापर, नवऱ्याचे व्यसन, नवरा कमावित नसल्याचे कारण, टोमणे मारणे, एकामेकांवरील अविश्वास आदी कारणांमुळे दाम्पत्यमध्ये वाद होऊन ही प्रकरणे पोलिसांसमोर येत असल्याचे त्यांनी सांगितले.

बॉक्स :

१६२ प्रकरणांत समेट

जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान शहरातील भरोसा सेलकडे नवरा-बायकोच्या भांडणाच्या ६२४ तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी १६२ प्रकरणांत समेट घडवून आणण्यात पोलिसांना यश आले.२०१९ मध्ये ६६६ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १८२ प्रकरणांत समेट घडवून आणला. ही कुुटुंबे आता गुण्यागोविंदाने नांदत आहेत.

भरवसा सेलमध्ये आलेल्या तक्रारी

२०१९ - ६६६

२०२० - ६२४

कोट

भरवसा सेलच्या माध्यमातून पती-पत्नीचे समुपदेशन करून त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. पत्नीच्या तक्रारीवरून पती किंवा सासरच्या मंडळीविरुद्ध एफआयआर झाला, तर ते संबध आणखीन ताणले जातात. पण, त्याआधी समेट घडला, तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचतात.

- आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती