शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
5
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
6
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
7
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
8
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
9
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
10
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
11
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
12
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
13
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
14
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
15
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
16
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
17
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
18
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
19
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
20
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश

२० वर्षांनंतर कसे असेल शहर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 22:12 IST

आगामी २० वर्षांनंतर शहर कसे असेल? या शहर विकास योजनेचे प्रारूप मंगळवारच्या आमसभेत मांडण्यात आले. यामध्ये पूर्वी ५५१ आरक्षणे होती, आता १९३ आरक्षणांची भर पडली आहे. काही आरक्षणात बदलही करण्यात आलेला आहे. यामध्ये निवासी जागा ही सहा हजार ५५८ हेक्टर राहणार आहे.

ठळक मुद्देसुधारित प्रारूपास आमसभेची मान्यता : १९३ आरक्षण, ६,५५८ हेक्टर निवासी जागा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आगामी २० वर्षांनंतर शहर कसे असेल? या शहर विकास योजनेचे प्रारूप मंगळवारच्या आमसभेत मांडण्यात आले. यामध्ये पूर्वी ५५१ आरक्षणे होती, आता १९३ आरक्षणांची भर पडली आहे. काही आरक्षणात बदलही करण्यात आलेला आहे. यामध्ये निवासी जागा ही सहा हजार ५५८ हेक्टर राहणार आहे. या सुधारित प्रारूपावर उशिरापर्यंत सभागृहात चर्चा सुरू होती. याला मान्यता देण्यात आल्यानंतर नागरिकांच्या सूचना व हरकती एक महिन्यापर्यंत स्वीकारण्यात येणार आहे.सभागृहात शहराच्या सुधारित विकास प्रारूपाचे पॉवर पाइंट पे्रझेटेंशन राज्य शासनाच्या नगर रचना अधिकारी विजया जाधव यांनी केले. सभागृहाची याला मान्यता आवश्यक असल्याचे सांगितले. मात्र, जोवर या प्रारूपाविषयीची भूमिका व चर्चा स्पष्ट होत नाही तोवर सभागृहात ही पीपीटी दाखवण्यात येऊ नये, अशी भूमिका सदस्यांनी घेतली. महापालिकेची हद्दवाढ ही २००३ पासून झालेली नाही. महापालिकेच्या सध्याच्या डीपीची मुदत ही ३० नोव्हेंबर २०१८ रोजी संपुष्ठात येणार आहे. त्यानंतरच्या सुधारित प्रारूपास नियोजन प्राधिकरणाची मान्यता घ्यावी लागते. यानंतर एक महिना यावर नागरिकांच्या सूचना व हरकती मागण्यात येतील, अशी माहिती जाधव यांनी सभागृहाला दिली.नगर रचना अधिकाऱ्यांनी हा आराखडा ३० आॅक्टोबर २०१८ रोजी हस्तांतरित केला. या टिपणीमध्ये सुधारणा करता येईल काय, अशी विचारणा प्रशांत वानखडे यांनी केली यात भूसंपादनाचा मुद्दा, आरक्षण विकसित करावे लागणार आहे. शहरातील भुयारी गट योजनादेखील अर्धवट असल्याविषयीची भूीमका चेतन पवार यांनी मांडली. यावर धोरणात्मक चर्चा होऊ द्या, यावर सदस्यांचे एकमत झाले.सध्या शहराचा १९९२ मध्ये मंजूर विकास आराखडा आहे. पहिले ४५४ आरक्षण होते. यापैकी १३६ आरक्षण विकसित झालेत, ९७ अन्य विभागाचे होते. यापैकी काही विभागांनी मागणीच केली नाही, त्यामुळे कमी झाल्याचे जाधव यांनी सांगीतले. सध्याच्या सुधारीत प्रारूपात जमीन वापर नकाशाचा अवलंब झाला आहे. १२ हजार १६५ हेक्टर ३४ आर आरक्षण कुठे द्यायचे, यासाठी शहराचे चार सेक्टरमध्ये विभाजन करण्यात आल्याची माहिती विजया जाधव यांनी सभागृहाला दिली.असा आहे चार झोननिहाय एरियाया सुधारित प्रारूपानुसार १२ हजार १६५ हेक्टर ४ झोनमध्ये देण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या झोनमध्ये २,८७६ हेक्टर, दुसºया झोनमध्ये ३,०६८ हेक्टर, तिसºया झोनमध्ये ३,३७६ हेक्टर व चवथ्या झोनमध्ये २,०८२ हेक्टर एरीया राहणार आहे. पहिली टर्म ही २०३१ पर्यंत आरक्षित राहणार आहे. सध्या शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार सहा लाख ४७ हजार ५६ एवढी असल्याची नोंद आहे. ही २०४१ पर्यंत १० लाखांवर जाईल. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येनुसार झोननुसार नियोजन करण्यात आल्याचे जाधव यांनी सभागृहाला सांगितले.१०० रूपयांच्या स्टॅम्पवर अन्य विभागांचे बंधपत्रशहरात आधी ५५१ आरक्षणे होती. आता वाढून १९३ झालेली आहेत. यापैकी १७१ महापालिकेची, तर उर्वरित २२ अन्य विभागांची आहेत. या विभागांद्वारा आरक्षित जागेच्या मागणीसाठी १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर बंधपत्र लेखी घेण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले. शहराच्या १९३ आक्षणात बगिच्यासाठी ३१, मैदानासाठी २३, मेडिकलसाठी ३, प्राथमिक शिक्षणासाठी १, भाजी बाजार ११, मटनमार्केट १ यासह अन्य विभागांचे आरक्षण करण्यात आलेले आहेत. यामध्ये न्यायालयाचे आदेशाचे पालन करण्यात आलेले असून काही आरक्षण बदलविण्यात आल्याचे जाधव म्हणाले.