शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

भूजल विभाग पाणी गुणवत्ता तपासणीत खरा उतरणार का?

By admin | Updated: January 3, 2015 22:54 IST

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अख्त्यारित असलेल्या जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा व उपविभागीय प्रयोगशाळांमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचारी, साहित्य पाणीपुरवठा व

अमरावती : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अख्त्यारित असलेल्या जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा व उपविभागीय प्रयोगशाळांमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचारी, साहित्य पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या नियंत्रणाखाली देण्याचा निर्णय शासनाने घेतला आला आहे. मात्र सद्यस्थितीत या विभागाकडे यंत्रणा अपुरी असल्याने पाणी तपासणी कार्याला गती येईल का, असा संभ्रम निर्माण झाला असून कर्मचारी शासन निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत. महाराष्ट्रात आरोग्य विभागाकडे गेल्या दोन वर्षांपासून १३८ प्रयोग शाळा सुरु आहेत. आणखी १० प्रयोगशाळा उघडण्यात येणार आहेत. यामध्ये पाण्याची रासायनिक व अनुजीव तपासणी करण्यात येत आहे. दोन वर्षांपासून हा विभाग पाणी तपासणी कार्यात अग्रेसर असून निरंतर सेवा देत आहे. आरोग्य विभागाच्या प्रयोेगशाळेला देशात प्रथम क्रमांकाचा दर्जा मिळाल्याचेही प्रयोगशाळा तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. मात्र नुकत्याच झालेल्या निर्णयामुळे आरोग्य विभागातील प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयावर पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग किती खरा ठरेल हे भविष्यात उघड होईल. मात्र या विभागाकडे सद्यस्थितीत पाणी गुणवत्ता तपासणीबाबत अपुरी यंत्रणा असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे हा विभाग पाणी गुणवत्ता तपासणीच्या कार्याला गती देईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी गुणवत्ता प्रयोगशाळांच्या कामात सुसूत्रता येण्यासाठी व योग्य प्रकारे सनियंत्रण होण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ३४ जिल्हा प्रयोगशाळेतील कंत्राटी मनुष्यबळ, १३८ उपविभागीय प्रयोगशाळा, साहित्य व नव्याने स्थापन होणाऱ्या १० उपविभागीय प्रयोगशाळा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या ताब्यात देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या प्रयोगशाळा ज्या ठिकाणी कार्यरत राहतील त्याप्रमाणे जागेच्या उपलब्धतेनंतर प्रयोगशाळा स्थंलातरित करण्यात येणार आहेत. या प्रयोगशाळा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडे सोपविण्यात आल्या असून त्याचे व्यवस्थापन व नियंत्रण करण्यात येणार आहे. मात्र सध्या या विभागाकडे राज्यभरात केवळ सहा उपविभागीय प्रयोगशाळा आहेत. त्याच प्रमाणे मनुष्यबळसुध्दा कमी आहे. त्यामुळे पाणी गुणवत्ता तपासणी कार्यात हा विभाग किती खरा ठरतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)