शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना १० हजार सौरपंप देण्याचा शासनाचा मानस

By admin | Updated: January 28, 2015 23:07 IST

येत्या काळात विदर्भात कोणत्याही शेतकऱ्याची उपासमार होणार नाही यासाठी शासन जागरुक आहे. शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी १० हजार सौरपंप देण्याचा शासनाचा मानस आहे.

अमरावती : येत्या काळात विदर्भात कोणत्याही शेतकऱ्याची उपासमार होणार नाही यासाठी शासन जागरुक आहे. शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी १० हजार सौरपंप देण्याचा शासनाचा मानस आहे. याद्वारे शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला. कृषी व जलसंधारण विभागाच्यावतीने अंजनगाव तालुक्यातील भंडारज येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमात सिमेंट नाला बांध भूमिपूजन ना.पोटे यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी आ. रमेश बुंदिल, प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते होते. विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी विभागासाठी १० हजार ट्रान्समिटर घेतलेत. नादुरुस्त ट्रान्समीटर येत्या ३ दिवसांत दुरुस्त होतील, असे पोटे म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री यांचा कल शेतकऱ्यांच्या बाजूचा आहे. नाला बंडिंग, नाला रुंदीकरण, नाला सरळीकरण, सिमेंट नालाबांध यामाध्यमातून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचे दारिऱ्द्य कमी होईल. हे लोकाभिमुख शासन असून शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पुढाकार घेऊन अमरावती जिल्ह्यात सुरु केलेला गाव मुक्काम कार्यक्रम कौतुकास्पद आहे. जलयुक्त शिवार कार्यक्रमात लोकांचा सहभाग आवश्यक असल्याचे सांगत ना.पोटे म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व अधिकारी शेतकरीभिमुख होऊन काम करतात, असा गौरवपूर्ण उल्लेख करुन अशा उपक्रमामुळे ग्रामस्थांचे प्रश्न थेट सुटण्यास मदत होणार आहे. गावागावांत शेतकऱ्यांच्या उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यावर आपला भर राहील, असेही ते म्हणाले. अमरावती जिल्हा राज्यात एक नंबर करु. फळबाग दुष्काळातील मदतीसाठी दोन कोटी रुपये देण्यात आले आहेत. आ. रमेश बुंदिले म्हणाले की, तालुक्यात २५ गाव टंचाईमुक्त करण्यात येत आहेत. १५० नवीन डीबीला मंजुरी मिळाली असून १५ दिवसांत कामे सुरु होतील. गावतळे अधिक प्रमाणात करण्यावर त्यांनी भर दिला. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था मान्सूनवर असलंबून आहे. ९४ टक्के पाऊस असूनही सोयाबीन, कापूस पिकाची परिस्थिती खराब आहे. विदर्भ हा बेसाल्ट खडकाच्या प्रकारात येतो. खारपान पट्ट्यात विदर्भ येतो. यासाठी शेतकऱ्यांना शेततळ्यांशिवाय दुसरे काही घेता येत नाही. पुनर्भरणालाही मयार्दा आहेत. पाण्याचा उपसा कमी करावा, असा मौलिक सल्ला देऊन विभागीय आयुक्त म्हणाले की, मोर्शी भागात आठ विहिरी अपेक्षित असताना येथे १८ विहिरी आहेत. आपणास दरवर्षी पाच हजार गावे दुष्काळमुक्त करायची आहेत. यात २५३ गावे अमरावती जिल्ह्यातील समाविष्ट आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे या कामावर पूर्ण नियंत्रण राहणार आहे. गावांचा सहभाग याकामी अत्यंत आवश्यक आहे. जलयुक्त शिवाराची कामे घेण्याकरिता जेसीबी, पोकलेन, डंपर, डिप्प्र आदी साधणे जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या निधीतून खरेदी करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गित्ते म्हणाले की, दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी शासन सहा विभाग एकत्र करुन जलयुक्त शिवार अभियान राबवित आहे. यात महसूल विभाग समन्वयक आहे. १९८० गावे पाच वर्षांत दुष्काळमुक्त करायची आहेत. प्रत्येक तालुक्यात २५ गावे टंचाईमुक्त करणार. प्रत्येक ३ महिन्यांत या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात दोन महिन्यांत तीन बैठका घेतल्या असून सतत आढावा घेणार असल्याचे सांगितले.