शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
6
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
7
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
8
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
10
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
11
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
12
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
13
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
15
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
16
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
17
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
18
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
19
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
20
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?

कचरा वेचणारी मुले शिष्यवृत्तीपासून वंचित

By admin | Updated: January 24, 2015 22:47 IST

समाजकल्याण विभागाने मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीच्या यादीत कचरा वेचणाऱ्या आणि तत्सम व्यवसाय करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश केला आहे. मात्र शिष्यवृत्तीसाठी कचरा वेचण्याच्या

अमरावती : समाजकल्याण विभागाने मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीच्या यादीत कचरा वेचणाऱ्या आणि तत्सम व्यवसाय करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश केला आहे. मात्र शिष्यवृत्तीसाठी कचरा वेचण्याच्या व्यवसायाचे प्रमाणपत्र संबंधितांना सादर करावे लागणार आहे. या व्यवसायात काम करणारी मुले अल्पवयीन असल्याने, मुलांना कचरा वेचण्याचे प्रमाणपत्र देणार कोण? दिलेच, तर बालहक्क कायद्याचे उल्लंघन म्हणून, त्यांचे पालकच कारवाईच्या कचाट्यात सापडणार असल्याने, शिष्यवृत्ती योजनेत कचरा वेचणारे विद्यार्थीच वंचित राहणार आहेत. सामाजिक न्याय विभागाने २०१४-१५ शैक्षणिक वर्षांपासून मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेत कचरा गोळा करणाऱ्या पालकांच्या मुलांचा समावेश केला आहे. सद्यस्थितीत मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीत मेहतर काम करणाऱ्या आणि अस्वच्छ व्यवसायाशी संबंधित आरोग्य कर्मचारी, चर्मकार कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. मात्र आता या शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढविली आहे. त्यात, कचरा गोळा करणारे विद्यार्थी समाविष्ट केले आहेत. नव्या नियमामुळे जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांना सरकारी शिष्यवृत्तीचे कवच लाभणार आहे. कचरा वेचून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या राज्यात मोठी आहे. उत्तर महाराष्ट्रात सुमारे पाऊण लाखावर संख्या आहे. मागील सर्वेक्षणात जिल्ह्यात हजारो अधिक कुटुंबे कचरा उचलण्याशी संबंधित असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे नव्या शिष्यवृत्ती योजनेचे कवच आता संबंधितांना होणार आहे. पण त्याचवेळी शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी संबंधिताना कचरा वेचत असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. ग्रामपंचायत ते महापालिकेपर्यंतच्या त्या -त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. कचरा उलणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्तीसाठी त्यांच्या शाळांमार्फत अर्ज करावे लागणार आहे. राज्यात अल्पवयीन मुलांना काम करण्यास प्रतिबंध असून, तसे निदर्शनास आल्यास किंवा कुणी तक्रार केल्यास, अल्पवयीन मुलांना कामाला लावून पैसे मिळविले म्हणून त्यांच्या पालकांवरही गुन्हा नोंदविण्याचा नियम आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळविणे शक्य होणार नसल्याने, ज्या उद्देशाने कचरा वेचणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू झाली नेमके ते विद्यार्थीच लाभापासून अपात्र राहण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे यावर तोडगा काढणे गरजेचे झाले आहे.