शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कचरा वेचणारी मुले शिष्यवृत्तीपासून वंचित

By admin | Updated: January 24, 2015 22:47 IST

समाजकल्याण विभागाने मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीच्या यादीत कचरा वेचणाऱ्या आणि तत्सम व्यवसाय करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश केला आहे. मात्र शिष्यवृत्तीसाठी कचरा वेचण्याच्या

अमरावती : समाजकल्याण विभागाने मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीच्या यादीत कचरा वेचणाऱ्या आणि तत्सम व्यवसाय करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश केला आहे. मात्र शिष्यवृत्तीसाठी कचरा वेचण्याच्या व्यवसायाचे प्रमाणपत्र संबंधितांना सादर करावे लागणार आहे. या व्यवसायात काम करणारी मुले अल्पवयीन असल्याने, मुलांना कचरा वेचण्याचे प्रमाणपत्र देणार कोण? दिलेच, तर बालहक्क कायद्याचे उल्लंघन म्हणून, त्यांचे पालकच कारवाईच्या कचाट्यात सापडणार असल्याने, शिष्यवृत्ती योजनेत कचरा वेचणारे विद्यार्थीच वंचित राहणार आहेत. सामाजिक न्याय विभागाने २०१४-१५ शैक्षणिक वर्षांपासून मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेत कचरा गोळा करणाऱ्या पालकांच्या मुलांचा समावेश केला आहे. सद्यस्थितीत मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीत मेहतर काम करणाऱ्या आणि अस्वच्छ व्यवसायाशी संबंधित आरोग्य कर्मचारी, चर्मकार कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. मात्र आता या शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढविली आहे. त्यात, कचरा गोळा करणारे विद्यार्थी समाविष्ट केले आहेत. नव्या नियमामुळे जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांना सरकारी शिष्यवृत्तीचे कवच लाभणार आहे. कचरा वेचून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या राज्यात मोठी आहे. उत्तर महाराष्ट्रात सुमारे पाऊण लाखावर संख्या आहे. मागील सर्वेक्षणात जिल्ह्यात हजारो अधिक कुटुंबे कचरा उचलण्याशी संबंधित असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे नव्या शिष्यवृत्ती योजनेचे कवच आता संबंधितांना होणार आहे. पण त्याचवेळी शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी संबंधिताना कचरा वेचत असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. ग्रामपंचायत ते महापालिकेपर्यंतच्या त्या -त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. कचरा उलणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्तीसाठी त्यांच्या शाळांमार्फत अर्ज करावे लागणार आहे. राज्यात अल्पवयीन मुलांना काम करण्यास प्रतिबंध असून, तसे निदर्शनास आल्यास किंवा कुणी तक्रार केल्यास, अल्पवयीन मुलांना कामाला लावून पैसे मिळविले म्हणून त्यांच्या पालकांवरही गुन्हा नोंदविण्याचा नियम आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळविणे शक्य होणार नसल्याने, ज्या उद्देशाने कचरा वेचणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू झाली नेमके ते विद्यार्थीच लाभापासून अपात्र राहण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे यावर तोडगा काढणे गरजेचे झाले आहे.