शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

भूकंपाच्या थरारक स्मृतींचे व्रण कायमच

By admin | Updated: April 25, 2016 00:07 IST

विदर्भातील काही कृषी संचालकांना नेपाळ येथे फिरायला घेऊन गेलेल्या आशिष बोके याने २५ एप्रिल २०१५ रोजी नेपाळमधील भूकंपाचा थरार अनुभवला होता.

आशिषने अनुभवला विध्वंस, विनाश : सन २०१५ मध्ये हादरले होते नेपाळवैभव बाबरेकर अमरावतीविदर्भातील काही कृषी संचालकांना नेपाळ येथे फिरायला घेऊन गेलेल्या आशिष बोके याने २५ एप्रिल २०१५ रोजी नेपाळमधील भूकंपाचा थरार अनुभवला होता. त्या घटनेला वर्ष लोटले. मात्र, तो भूकंप आणि त्यावेळच्या विनाशाच्या स्मृती आजही आशिष यांच्या मनात ताज्या आहेत. शहरातील गणेश पेठ येथील रहिवासी आशिष नामदेव बोके यांनी त्यांच्या कंपनीमार्फत विदर्भातील ३० कृषी संचालकांना नेपाळ येथे पर्यटनासाठी नेले होते. २२ एप्रिल रोजी नागपूर विमानतळावरून हे सर्व लोक दिल्लीकरीता निघाले. दिल्लीतून दुसऱ्या विमानाद्वारे नेपाळच्या काठमांडू शहरात गेले. २३ व २४ एप्रिल रोजी त्यांनी काठमांडू व पोखरा येथील हिमालय पर्वताची विहंगम दृश्ये बघितली. २५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता सर्वजण ट्रॅव्हल्सने पोखरा आणि काठमांडू मार्गावरील मनोकामना देवीचे मंदिर पाहण्यास निघाले. तेथील ‘रोप वे’मध्ये बसण्याचा आनंद सर्वांनीच लुटला. मात्र, पुढे भूकंपाच्या भयावह स्थितीचा सामना करावा लागेल, अशी पुसटशी कल्पनाही आशिषसह कृषी संचालकांना नव्हती. ‘रोप-वे’मध्ये धम्माल करून सर्व लोक गंतव्याकडे निघाले असतानाच सकाळी ११.५६ वाजताच्या सुमारास अचानक जमीन हादरू लागली. लोक एकमेकांच्या अंगावर कोसळू लागल. काय होतेय हे कोणालाच कळेना. आक्रिताच्या भीतीने लोक जीव मुठीत घेऊन सुरक्षीत जागेचा शोध घेऊ लागले. तेवढ्यात पुन्हा १२.०८ मिनीटांनी भूकंपाचा तीव्र झटका बसला. तब्बल ८० ते ९० सेकंदांपर्यंत जमीन हादरली. मोठमोठ्या भेगा पडल्यात. पर्वतरागांवरील मोठाल्या दरडी कोसळल्या. त्या दरडींखाली ६० ते ७० जण दबल्याचे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याचे सांगताना आशिष आजही शहारतात. भूकंपाची तीव्रता कमी होताच सगळ्यांनी ट्रॅव्हल्सकडे धाव घेतली. मात्र, धास्तीने ट्रॅव्हल्स चालक सुध्दा पळाला होता. त्यामुळे त्यांनी तत्काळ अतिरिक्त पैसे देऊन खासगी बसने ६० किलोमिटर अंतरावरील काठमांडूचा प्रवास सुरु केला. भूकंपानंतर मोबाईल नेटवर्कसुध्दा नव्हते. संपर्क पूर्णपणे तुटला होता. काठमांडूपर्यंतच्या प्रवासादरम्यान देखील अनेक बसेस दरीत कोसळल्याचे दिसून आले. भोवताल विदारक चित्र होते. इमारती कोसळलेल्या, नागरिकांची धावपळ, ढिगाऱ्याखाली मृतदेह शोधताना चाललेला आक्रोश अशी भयावह स्थिती आशिष यांच्यासह विदर्भातील कृषी संचालकांनी अनुभवली. काठमांडूतील हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर देखील पुढील ४८ तास भूकंपाचे हादरे बसण्याचा अंदाज असल्याने हॉटेल चालकाने त्यांना खोलीत जाऊ दिले नाही. हॉटेलचा वीज पुरवठा देखील खंडित झालेला असल्यामुळे चहुकडे काळोख पसरला होता. तेवढ्यात हॉटेलच्या शेजारी असलेली विशाल इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि त्याखाली ३०-३५ जण दबल्याने गोंधळ सुरू झाला. दुसऱ्या दिवशी मायदेशी परतण्याकरिता विमानतळ गाठले असता तेथेही सुमारे १५ हजार प्रवासी दिसून आले. अखेर रात्री १०.२० वाजता वायुसेनेच्या सातव्या विमानात सर्वांना प्रवेश मिळाला. रात्री उशिरा सर्व जण दिल्लीत पोहचले. दैव बलवत्तर म्हणून वाचलो, अशीच प्रतिक्रिया सगळ्यांनी व्यक्त केली.