शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने रेड्डी अखेर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 05:00 IST

दीपाली चव्हाण यांची आत्महत्या अतिशय वेदनादायक घटना होती. त्यामुळे याप्रकरणी दाेषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका  सुरुवातीपासूनच घेतली. या अनुषंगाने मेळघाटात दोन दिवस दौरा करून कार्यरत महिला अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर याप्रकरणी निष्पक्ष चौकशी व तात्काळ कारवाईची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ३० मार्च रोजी प्रत्यक्ष भेटून दिले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची भेट , मेळघाटात गोपनीय दौराही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, हा संकल्प घेतला होता. त्या अनुषंगाने मेळघाटात महिला अधिकारी, कर्मचारी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर प्रकरणातील क्रौर्य पुढे आले. मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने उच्चस्तरीय चौकशीसाठी पाठपुरावा केला. परिणामी श्रीनिवास रेड्डी व विनोद शिवकुमार आज गजाआड आहेत, अशी माहिती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. दीपाली चव्हाण यांची आत्महत्या अतिशय वेदनादायक घटना होती. त्यामुळे याप्रकरणी दाेषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका  सुरुवातीपासूनच घेतली. या अनुषंगाने मेळघाटात दोन दिवस दौरा करून कार्यरत महिला अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर याप्रकरणी निष्पक्ष चौकशी व तात्काळ कारवाईची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ३० मार्च रोजी प्रत्यक्ष भेटून दिले. दीपालीच्या मोरगाव येथील निवासस्थानी भेट देतानाही याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे म्हटले होते. प्रकरणाची मुख्यमंत्र्यांना माहिती देताना, सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली. कर्मठ पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या डॉ. प्रज्ञा सरवदे यांची प्राथमिक चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक हा या पाठपुराव्याचा परिपाक आहे. दोषींवर थेट कारवाई व्हावी, असे निर्देश सरवदे यांना दिले होते. जलदगती निष्पक्ष चौकशीची अपेक्षा त्यांनी पूर्ण केली, असे पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रालाही रेड्डींनी गांभीर्याने घेतले नाहीदीपाली यांच्या आत्महत्येपूर्वी त्यांच्याकडून काही निवेदने प्राप्त झाली होती. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे निर्देशित केले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी रेड्डी यांना पत्र दिले. परंतु, रेड्डींनी प्रतिसाद दिला नाही. आत्महत्याप्रकरणी जे दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, ही मागणी सुरुवातीपासूनच होती. त्यानुसार अगोदर विनोद शिवकुमार व आता रेड्डी यांना अटक झाली आहे. राज्य सरकारने कुणालाही वाचविण्याच्या प्रयत्नांना दाद दिलेली नाही, असे ना. ठाकूर म्हणाल्या.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग