शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

रेल्वेत खाद्यपदार्थ विक्रीसाठी ‘महिला गँग’

By admin | Updated: September 3, 2015 00:10 IST

रेल्वे गाड्यांमध्ये महिलांकडून अनधिकृत खाद्यपदार्थ विकले जात आहेत. या व्यवसायासाठी महिलांची टोळी सक्रिय असून या टोळीला रेल्वे पोलिसांचे अभय असल्याचे चित्र आहे.

प्रवाशांचे आरोग्य धोक्यात : रेल्वे पोलिसांची वसुली जोरातअमरावती : रेल्वे गाड्यांमध्ये महिलांकडून अनधिकृत खाद्यपदार्थ विकले जात आहेत. या व्यवसायासाठी महिलांची टोळी सक्रिय असून या टोळीला रेल्वे पोलिसांचे अभय असल्याचे चित्र आहे. महिलांच्या एका टोळीच्या अधिनस्थ किमान ८ ते १० युवक कार्यरत आहेत. नागपूर ते भुसावळ दरम्यान अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रीच्या व्यवसायात महिलांचाच वरचष्मा आहे.रेल्वे गाड्यात भिकारी, खिसेकापू, चोरटे आणि तृतीयपंथीयांचा हैदोस ही नित्याचीच बाब झाली आहे. रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करणे असुरक्षितेची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र, आता अनधिकृत खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या अनेक महिला गँग सक्रिय झाल्या आहेत. रेल्वे स्थानक ते गाडीपर्यंत या महिला गँगचे अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रीचे अड्डे आहेत. चहा, कॉफी, भेळ, फळे, पाणी, नाश्ता, गुटखा, सिगारेट आदी साहित्याची विक्री या महिला गँगकडून केली जाते. गँगचे अनधिकृत खाद्य पुरवठा करण्याचे केंद्र अकोला, वर्धा, नागपूर व बडनेरा रेल्वे स्थानक हे आहे. यापैकी काही महिला गँग बनावट तृतियपंथीय तयार करून त्यांच्यामार्फत रेल्वे गाड्यांमधून प्रवाशांकडून पैसे उकळण्याचा धंदा चालवितात. बनावट तृतीयपंथी प्रवाशांकडून पैसे मागण्यासाठी प्रसंगी अश्लिल चाळे करतात. त्यामुळे काही प्रवासी बनावट तृतीयपंथीयांकडून बचाव करण्यासाठी त्यांच्या मर्जीप्रमाणे पैसे देखील देतात. अनधिकृत खाद्यपदार्थांची विक्री असो वा भिकारी अथवा बनावट तृतीयपंथी या सर्वांचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. परंतु रेल्वे पोलीस या महिला गँगकडून बांधलेले हप्ते घेत असल्याने कारवाई केली जात नाही. अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रीसाठी लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना प्राधान्य देण्यात येते. रेल्वे सुरक्षा दलाने गाडीनिहाय या महिला गँगकडून रक्कम ठरविल्याची माहिती आहे. बडनेरा ते वर्धा, अकोला ते बडनेरा व नागपूर ते वर्धा, अकोला ते भुसावळ या प्रवासा दरम्यान अनधिकृत खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या महिला गँग सक्रिय असल्याचे वास्तव आहे. रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाच्या आशीर्वादाने रेल्वे गाड्यांमध्ये हा प्रकार सुरु असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.चोरीच्या घटना वाढल्यारेल्वे गाड्यात अलिकडे खिसेकापू, मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनधिकृत खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या महिला गँगसोबत युवकांची टोळी राहात असल्याने या युवकांच्या माध्यमातून रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांच्या साहित्य, सामानाची चोरी होत असावी, असा अंदाज आहे. मोबाईल चोरीच्या घटनांनी अलिकडच्या काळात कहर केला आहे. रेल्वे पोलिसांकडून एकही चोरीची घटना उघडकीस आली नाही, हे विशेष.रेल्वे सुरक्षा दल ‘नॉट रिचेबल’रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रीसाठी महिलांची टोळी कार्यरत असल्याच्या पार्श्वभूमिवर बडनेरा रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी आर.के.मीना यांच्याशी संपर्क साधला असता ते ‘नॉट रिचेबल’ होते. वारंवार संपर्क साधुनही याविषयी बोलता आले नाही. रेल्वेत तृतीयपंथी, अनधिकृत खाद्यपदार्थांची विक्री, भिकाऱ्यांचा सुरु असलेला हैदोस थांबविण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून केली जात आहे.