शेतकऱ्याचे उपोषण : आत्मदहनाचा इशाराबडनेरा : कूळ कायद्याच्या नियमानुसार मिळालेले शेत हडपण्याच्या विरोधात बडनेऱ्यातील शेतकरी राजेश मालपे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १० आॅगस्ट रोजी उपोषणास बसले. माझ्या मागणीचा विचार न झाल्यास १५ आॅगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. मुंबई कूळ वहिवाटीनुसार, मला मिळालेले शेत हडपण्याचा प्रयत्न श्यामा सोमानी मुख्त्यारपत्रधारक पवनकुमार जाजोदीया तसेच या प्रकरणात साथ देणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप राजेश मालपे यांनी केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १० आॅगस्ट रोजी राजेश मालपे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या मागणीवर विचार न केल्यास १३ व १४ आॅगस्ट रोजी ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोरही उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. माझ्या मागणीचा विचार प्रशासनाने न केल्यास १५ आॅगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे. ''मी गरीब कुटुंबातला आहे. मला व माझ्या कुटुंबाला मानसिक व आर्थिक त्रास देण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. आमच्या कुटुंबाला खरेदीखत तसेच सातबारा व ८ 'अ' असे रेकॉर्ड आमच्या नावाने असतानादेखील केवळ आमचे खच्चीकरण करण्याचे काम होत असल्याची व्यथा राजेश मालपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात कथन केली आहे. (शहर प्रतिनिधी)
कूळ कायद्यात मिळालेले शेत हडपले
By admin | Updated: August 11, 2015 00:22 IST