शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

शैक्षणिक धोरणासाठी विद्यार्थ्यांची चाचणी

By admin | Updated: April 30, 2015 00:19 IST

राज्यातील शिक्षणविषयक धोरण ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने जिल्ह्यात विशेष सर्वेक्षण करण्यात येत आहे.

सर्वेक्षण : शाळांसह घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांचे परीक्षणजितेंद्र दखणे  अमरावतीराज्यातील शिक्षणविषयक धोरण ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने जिल्ह्यात विशेष सर्वेक्षण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील २०० विद्यार्थ्यांच्या मराठी, इंग्रजी व गणित विषयातील ज्ञानाच्या तपासणीसाठी शाळेत व घरी जाऊन चाचणी घेतली जात आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने हा उपक्रम राबविला जात आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद राज्याच्या शैक्षणिक धोरणांवर मोठा परिणाम करणारी संस्था आहे. परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यासह राज्यातील शाळा, विद्यार्थी व शिक्षकांचे विविध प्रकारे सर्वेक्षण करुन धोरण ठरविण्यात येते. सध्या प्रचलित असलेले अभ्यासाबाबत व आगामी होणारे बदल याचीही जबाबदारी परिषदेवरच असते. आता परिषदेने विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या पध्दतीने तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यासह राज्यातही मोहीम राबविण्यात येत आहे. मराठी, इंग्रजी व गणित विषय शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. एकूण शैक्षणिक प्रगती या विषयांवर अवलंबून असते. त्यामुळे या विषयांची चाचणी घेण्यात येत आहे. जिलतील विविध शाळांमध्ये जाऊन १०० विद्यार्थ्यांना परत विचारले जातात आणि या विद्यार्थ्यांना सोडून अन्य १०० विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन परीक्षण करणे सुरू आहे. यासाठी जिल्ह्याभरात८४ सधन व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. ते प्रथमत: शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची चाचणी घेत आहेत. नंतर गावात, शहरात फिरुन खेळणाऱ्या तसेच बाहेर फिरणाऱ्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला जात आहे. काही सधन व्यक्तींनी सर्वेक्षण पूर्ण केले आहे.यामुळे घरात चाचणीपरीक्षा चाचणीत यश मिळवताना मानसिकतेचाही मोठा वाटा असतो. मानसिकता चांगली असलेला विद्यार्थी व्यवस्थितपणे उत्तरे लिहू शकतो. त्याचप्रमाणे अभ्यासाचेही आहे. चांगली मानसिकता असणारे विद्यार्थी अभ्यास चांगल्या पद्धतीने करु शकतात. अभ्यास त्यांच्या लक्षात राहू शकतो याचा त्यांना पेपर लिहिताना फायदा होतो. विद्यार्थ्यांची मानसिकता घरात चांगली राहू शकते की शाळेत याचा अंदाज घेण्यासाठी घराघरांतही चाचणी घेतली जात आहे. यातून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा मागोवा घेता येणार आहे. यावरुनच शाळेतील वातावरण कसे ठेवावे याबाबत निर्देश दिले जातील. सर्व प्रकारच्या शाळासर्वेक्षण करताना शाळांबाबत वर्गीकरण करण्यात आलेले नाही. कोणत्याही प्रकारच्या शाळांमध्ये जाऊन सर्वेक्षण करणे अपेक्षित आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, आश्रमशाळा आदी शाळेतील विद्यार्थ्यांची चाचणी घेतली जात आहे. वजाबाकीवर भरगणिताच्या चाचणीमध्ये वजाबाकीवर भर देण्यात येत आहे. यामध्ये गणित सोडविण्यासाठी दिले जातात. वजाबाकी आल्यानंर भागाकाराचे गणित सांगितले जाते. चुकल्यास अंक ओळखीवर भर देण्यात येतो. ५ पैकी ४ अंक ओळखता आल्यास केवळ अंक ओळख होते.इंग्रजीचा निष्कर्षइंग्रजी भाषेच्या चाचणीत अर्थ समजणे आवश्यक आहे. स्मॉल व कॅपिटल प्रकारात शब्द व अक्षर ओळखण्यास दिले जाते. काही वाक्यही सांगितली जातात.वाक्य वाचून त्याचा अर्थ समजल्यावर इंग्रजीची ओळख होते.१ ते ८ चे विद्यार्थीइयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या प्राथमिक शिक्षणाला पूर्ण शैक्षणिक आयुष्याचा पाया मानला जाता. या इयत्तांमध्ये मिळालेल्या शिक्षणातून पुढचे शैक्षणिक आयुष्य बहरत जाते. यामुळे याच इयत्तांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे चाचणीच्या माध्यमातून निरीक्षण केले जात आहे. चाचणीची रुपरेषाही या विद्यार्थ्यांना झेपेल अशीच आहे. त्यांना अगदी सोपे प्रश्न विचारुन त्यांच्या अभ्यासाच्या पद्धतीने अवलोकन करण्यात येणार आहे. यातून प्राथमिक शिक्षणाचे ठोस शैक्षणिक धोरण ठरवितांना याची मोठी मदत होणार आहे. अशी होते विद्यार्थ्यांची चाचणीमराठी वाचन क्षमता, मराठी विषयाच्या चाचणीत प्रथमता एक. छोटासा परिच्छेद वाचण्यास देण्यात येतो. नंतर एक गोष्ट वाचण्यासाठी दिली जाते. परिच्छेदामध्ये वाचण्यात चुका झाल्यास गोष्टीऐवजी अक्षर व शब्द वाचण्यास दिले जातात. यामध्ये पाचपैकी चार अक्षर व शब्द वाचता आल्यावर विद्यार्थ्यांची वाचनातील प्रगती असल्याचे समजण्यात येते. शैक्षणिक धोरण ठरविण्यासाठी अशा चाचण्या महत्त्वाच्या ठरतात. ही चाचणी तंत्रशुध्दपणे कोणतीही सुटी न ठेवता घेण्यावर भर आहे. यासाठी सधन व्यक्तीची मदत घेण्यात येत आहे. याचा अहवाल परिषदेला पाठविण्यात येईल. परिषदेकडून यासंदर्भात निष्कर्ष काढला जाईल.- प्रतिभा तायडे, प्राचार्य, डायट.