शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या सोन्यानेही केला शेतकऱ्यांचा घात

By admin | Updated: November 22, 2015 00:18 IST

वरुड तालुक्यात सततच्या नापिकीमुळे शेतकरी त्रस्त आहे. परंतु शेतीशिवाय पर्याय नसल्याने मिळेल तेथून कर्ज घेऊन परिवाराचा चरितार्थ चालवीत आहे.

कवडीमोल भाव : वैदर्भीय शेतकऱ्यांवर 'बुरे दिन'वरुड : वरुड तालुक्यात सततच्या नापिकीमुळे शेतकरी त्रस्त आहे. परंतु शेतीशिवाय पर्याय नसल्याने मिळेल तेथून कर्ज घेऊन परिवाराचा चरितार्थ चालवीत आहे. मंगळसूत्र गहाण ठेवून केलेल्या शेतीने दगा दिल्याने हिरवे स्वप्न भंगले आहे. कापसाला भाव नसल्याने उत्पादन खर्च काढणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे.वरुड तालुक्यात संत्रा, हळद, मिरची, कापूस, सोयाबीन ही पिके घेतली जातात. बागायती शेतीचा परिसर असल्याने सुखी समृध्द परिसर म्हणून परिचित आहे. परंतु सतत चार वर्षांपासून कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा एवढ्यावरच हा प्रकोप थांबला नाही. गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. बहुगुणी संत्राचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. हजारो टन संत्रा परप्रांतात निर्यात केला जातो. दिल्ली, मुंबई, कोलकता, उत्तरप्रदेश झारखंड, ग्वालीयर, आग्रा, मिझोराम सह नेपाळ, केरळ येथेही संत्रा पाठविला जातो. विदर्भातील बहुगुणी संत्राची चव देशासह विदेशातील लोकांनीसुध्दा चाखली आहे. निसर्गाच्या अवकृपेने सर्वकाही नेस्तनाबूत झाले. अज्ञात रोगाच्या तडाख्याने आंबिया बहराला गळती लागली. ५० टक्के संत्रा गळत आहे. तापमानाच फरक पडल्याने संत्रा पिवळी पडून गळती सुरु आहे. कुणी फंगस तर कुणी बुरशीमुळे गळती असल्याचे सांगत आहे.परंंतु कृषी विभागाकडून काहीही उपाययोजना केली जात नाही, ही शोकांतिका आहे. मृग नक्षत्राने दडी मारल्याने पिकांची पेरणी उशिरा झाली.तब्बल एक महिना उशिरा कपाशी, मिरची, तूर, ज्वारी या पिकांची लागवड करण्यात आली. सोयाबीननेसुध्दा दगा दिल्याने दिवाळीच्या राशीसाठीसुध्दा सोयाबीन घरात आली नाही. सोयाबीन उत्पादनात कमालीची घट झाल्याने सोयाबीन उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसला. संत्रा आंबिया बहरसुध्दा गळाल्याने ५० ते ६० टक्के संत्रा उत्पादकांचे नुकसान झाले. मृग बहर आलाच नाही. यामुळे संत्रा उत्पादकांनासुध्दा मोठा फटका बसला. कपाशी, मिरचीचे पीकसुध्दा बुडाले, मिरचीवर कोकड्या रोगासह अज्ञात रोगाच्या आक्रमणामुळे शेकडो हेक्टर जमिनीतील मिरचीचे पीक बुडाले. त्यामुळे लाखो रुपयांचा फटका मिरची उत्पादकांना बसला. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांनी पत्नीच्या गळयातील मंगळसूत्र गहाण ठेवून कशीबशी शेती केली. तरीसुध्दा अखेर शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंगले. तर पुन्हा कर्जाचा डोंगर डोक्यावर उभा ठाकला आहे. यामुळे येणाऱ्या मार्चमध्ये कर्जाचा भरणा कसा करावा की, शेती गहाणामध्ये जाऊ द्यायच्या हा प्रश्न शेतकऱ्यापुढे आहे. शिक्षण आणि मुलींचे विवाह करण्याचा प्रश्न निर्माण होऊन शेतकरी त्रस्त झाला आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे आणि नेत्याच्या दुर्लक्षामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. (तालुका प्रतिनिधी)