शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मार्चअखेर ४६६ गावे पाणीटंचाईच्या फेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:01 IST

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने याविषयीचा कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये प्रस्तावित ८१८ उपाययोजनांवर १२ कोटी ६७ लाख ४५ हजारांच्या निधीची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या आराखड्याला सोमवारी मंजुरी दिली. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाच्या कालावधीत ८१४ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ८८९.२ मिमी पाऊस पडला.

ठळक मुद्देकृती आराखड्याला मंजुरी : १३ कोटींच्या ८१८ उपाययोजना प्रस्तावित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सरासरीपेक्षा अधिक पावसाळा झाला असला तरी पाच तालुक्यांत पावसाने सरासरी गाठली नाही. त्यामुळे जिल्ह्यात मार्चअखेर किमान ४६६ गावांना पाणीटंचाईची झळ पोहचणार आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने याविषयीचा कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये प्रस्तावित ८१८ उपाययोजनांवर १२ कोटी ६७ लाख ४५ हजारांच्या निधीची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या आराखड्याला सोमवारी मंजुरी दिली.जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाच्या कालावधीत ८१४ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ८८९.२ मिमी पाऊस पडला. ही सरासरी टक्केवारी १०९.२ आहे. यामध्ये चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे, मोर्शी, अचलपूर, दर्यापूर अंजनगाव सुर्जी, धारणी व चिखलदरा तालुक्यात पावसाने १०० टक्के सरासरी पार केली. मात्र, अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, तिवसा व वरूड तालुक्यात पावसाची सरासरी माघारली. परिणामी जलपुनर्भरणाच्या कालावधीत भूजल उपसा झाल्याने भूजलस्तरात कमी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ४०० गावांमध्ये भूजलात तीन फुटांपर्यंत तूट आल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने ऑक्टोबरमध्ये विहिरींच्या केलेल्या निरीक्षणाअंती स्पष्ट झाले. साधारणत: पाणीटंचाईचे तीन टप्पे आहेत. यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या पहिल्या टप्यात पाणीटंचाई निरंक असली तरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारा कृती आराखडाच तयार नव्हता. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिले. आगामी काळात पाणीटंचाई उद्भवू नये यासाठीचे प्रयत्न आवश्यक असताना जानेवारी ते मार्च या दुसºया टप्प्याचा कृती आराखडा फेब्रुवारी माहिन्यात तयार झालेला आहे. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केव्हा होणार, हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. एप्रिल ते जून या अखेरच्या टप्प्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढणार आहे. यासाठीचे नियोजन व अंमलबजावणी तातडीने करावी लागणार आहे. विशेष म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या पाच तालुक्यांवर विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.मार्चनंतर ४१७ गावांसाठी ७५६ उपाययोजनापाणी टंचाईच्या तिसºया टप्प्यात म्हणजेच एप्रिल ते जून या कालावधीत ४१७ गावांसाठी एकूण ७५६ उपाययोजना प्रस्तावित आहेत. यासाठी ७.८२ कोटींचा निधी अपेक्षित आहे. यामध्ये १४९ विहिरी खोल करून गाळ काढण्यात येईल. यात ४४.७० लाख, २३५ खासगी विहिरींचे अधिग्रहणावर १.४१ कोटी, २१ टँकरने पाणीपुरवठ्यावर ६३ लाख, ७७ नळयोजनांच्या विशेष दुरुस्तीवर २.२६ कोटी, २३ तात्पुरत्या पूरक नळयोजना तयार करण्यासाठी ६४ लाख व २५१ नवीन विंधन विहिरीवर २.४३ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.१०८ नळयोजनांची विशेष दुरुस्तीपाणीटंचाईच्या दुसºया टप्प्यात १०८ नळयोजनांची विशेष दुरुस्ती केली जाणार आहे. यावर ३.०६ कोटींचा निधी खर्च होणार आहे. १०५ विहिरींचा गाळ काढण्यात येणार आहे यावर ३१.५० लाख, २४५ खासगी विहिरींचे अधिग्रहण यावर १.९६ कोटींचा खर्च, ४५ टँकरणे पाणीपुरवठा करणे यासाठी १.८० कोटी, ४० तात्पुरत्या नळयोजनांची विशेष दुरुस्ती करण्यात येणार आहे. यावर १.३० कोटींचा निधी तसेच ३१५ नवीन विंधन विहिरी तयार करण्यात येतील. यावर ४.४३ कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे.पर्जन्यमानातील स्थान व वेळ सापेक्ष दोलायमानता आणि पावसातील खंड, भूजलाचा सिंचनासाठी होणारा अतिउपसा, विंधन विहिरींद्वारे अतिखोल जलधारातून होणारा अति उपसा, सिंचनासाठी वापरण्यात येणारी पारंपरिक प्रवाही पद्धत व त्याद्वारे पाण्याचा होणारा अपव्यय, पाण्याचे नियोजन व व्यवस्थापनाचा अभाव यामुळे जिल्ह्यातील काही भागांत दरवर्षी पाणीटंचाई उद्भवते. यावर कायमस्वरुपी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

टॅग्स :water shortageपाणीकपात