शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

सुवर्ण व्यवसायावर गदा, बंगाली कारागिरांचे अतिक्रमण

By admin | Updated: May 10, 2015 00:36 IST

एकीकडे श्रीमंत असल्याचा गैरसमज दुसरीकडे बंगाली कारागिरांचे व्यवसायावर अतिक्रमण तर तिसरीकडे बेरोजगारांची वाढती ...

त्रिकोणी संघर्षात अडकला समाज : सोनार समाजाची ससेहोलपटमोहन राऊत अमरावतीएकीकडे श्रीमंत असल्याचा गैरसमज दुसरीकडे बंगाली कारागिरांचे व्यवसायावर अतिक्रमण तर तिसरीकडे बेरोजगारांची वाढती संख्या अशा त्रिकोणी संघर्षात राज्यातील सोनार समाज बांधव अडकला आहे. ऐरणीवर सोने ठोकताना भक्तीचे ध्यान करीत संत नरहरी महाराजांना विठ्ठल मिळाला. आता या समाजाची ससेहोलपट थांबणार कधी, असा प्रश्न नेक्स्ट जनरेशन विचारत आहे़बारा बलुतेदारांपैकी एक बलुतेदार म्हणून समाजव्यवस्थेने निर्माण केलेल्या फळीमधला एक उपेक्षित राहिलेला समाज म्हणजे सोनार आजही या बारा बलुतेदारांपैकी एक असलेल्या जातीचे विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी शासन उदासीन असल्याने तो समाज उपेक्षीतच राहीला आहे़ एवढेच नाही तर आपला कौटुंबिक गाडा चालविण्यासाठी गावोागावी जाऊन आपला उदरनिर्वाह भागवावा लागत आहे़सोनार समाज अहीर किंवा खानदेशी, अझर देवांग अथवा दैवज्ञ अथवा पंचाग सोनार, देशी किंवा मराठे सोनार, विदूर, कन्नड, कोकणी, लाड, माळवी, परदेशी, साड, शिलवंत, वैद्य, अथवा जैन या उपजाती राज्यात येतात़ या समाजाने अनेक पिढ्यांपासून आपली कला जोपासली आहे़ पूर्वीच्या आपल्या घराच्या पुढच्या भागात दुकान राहत असत. या दुकानात अनेक आविष्कारी दागिने तयार केली जात असत. आता ज्वेलरीने मोठी जागा घेतली आहे़ मोठ्या कॉपोरेट कंपन्यांनी ग्राहकांना नवीन आकाराचे दागिने बाजारात उपलब्ध करून दिल्याने गावकुसातील या समाजावर उपासमारीचे पाळी आली आहे़ या समाजातील शिक्षणाचे प्रमाण अधिक असले तरी रोजगार मिळत नाही. स्वरोजगारासाठी शासन पाऊल उचलत नसल्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढली आहे़ सोन्या-चांदीसारख्या मौल्यवान धातूंचे सोनार हे काम करत असल्यामुळे यांना श्रीमंत समजले जाते़ परंतु हा केवळ गैरसमज आहे़सध्या सोनारांची उपासमार सुरू आहे़ क धी या सोनाराला रोजचे शंभर दोनशे रूपये मिळत असे. त्यात ते आपला उदरनिर्वाह भागवीत असत. परंतु आज त्यांना शंभर रूपयेसुध्दा मिळत नाहीत, ही शोकांतिका आहे.त्याला आपल्या कामासाठी गावोगावी फिरूनही कामे मिळत नाही़ सध्याची परिस्थिती पाहिली तर त्या सोनाराजवळ पोट भरण्यासाठीसुध्दा पैसे नाही. अशा महागाईच्या परिस्थितीमध्ये एका सोनाराला आपला उदरनिर्वाह चालवणे कुटुंबांना सुविधा देणे संभव होत नाही़ शहरात दिवसातून आठ-दहा घंटे एका जागेवर बसून काम केल्यामुळे सोनाराला आपल्या वयाच्या चाळीशीतच गुडघे दुखणे, पाठीच्या कन्याचे दुखणे या आजारांचा सामना करावा लागतो़ सोनार पन्नास वर्षाच्या पुढे काम करू शकत नाहीत़ त्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्याचा प्रश्न गंभीर बनत आहे़ आज या व्यवसायावर बंगाली कारागिरांमुळे स्थानिक कारागीर अधिक हतबल झाला आहे़ सुवर्ण व्यवसायावर गदा आणणारे कलम लावण्यात येत आहे़ बेरोजगार कारागिरांना रोजगार मिळावा, उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शासनाने अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे़