शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

'जलपर्णी'मुळे पिंगळा झाली गटारगंगा

By admin | Updated: March 1, 2015 00:21 IST

प्रवाहित नसणारे पाणी व सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे पाणी यामुळे तिवसा तालुक्यातील पिंगळा नदीसह लहान-मोठे नदीनाले प्रदूषित झाले आहेत.

गजानन मोहोड तिवसाप्रवाहित नसणारे पाणी व सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे पाणी यामुळे तिवसा तालुक्यातील पिंगळा नदीसह लहान-मोठे नदीनाले प्रदूषित झाले आहेत. नदिपात्रात कचरा टाकण्यात येत असल्यामुळे पाण्यात घाण व जलपर्णी वनस्पती वाढल्याने नद्या मानवी आरोग्यासाठी धोकादायक बनल्या आहेत.यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाल्यांना पाणी कमी आहे. तसेच नदी नाल्यावर बहुतेक गावात बांध घालण्यात आल्यामुळे पाण्याचा प्रवाह रोखला गेला आहे. त्यामुळे नदी-नाल्यांचे पाणी प्रवाहित नाही. कृषी विभागाद्वारा दगडी बंधारे बांधण्यात आल्याने नदी-नाल्यांचा प्रवाह खोळंबला आहे. पाणी प्रवाहित नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जलपर्णी वनस्पती वाढली आहे. तालुक्यातील पिंगळानदी प्रदूषित झाल्यामुळे तिवसेकर नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील सांडपाणी नालीद्वारे नदीत सोडण्यात आल्याने पाणी दूषित झाले आहे. नदीपात्र अरुंद झाल्याने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. गावातील कचरादेखील नदीपात्रात टाकण्यात येत असल्याने नद्यांचे गटार बनले आहेत. सद्यस्थितीत तिवसा, डेहणी, शेंदूरजना बाजार, मोझरी, तळेगाव ठाकूर येथील नदीनाले गटारगंगा बनले आहे. सांडपाण्यावर भाजी पिकेनदीच्या पाण्यात गावातील सांडपाणी नालीद्वारे नदीत मिसळत असल्याने नदीचे पाणी दूषित झाले आहे. मानवी आरोग्यास हे पाणी धोकादायक आहे. मात्र या पाण्याच्या सिंचनातून काही शेतात भाजीपाला पिकविण्यात येतो, तो आरोग्यासाठी हानीकारक ठरत आहे. दलदल वाढलीनदी-नाल्यांच्या पात्रातील पाणी कमी झाले. त्यामुळे या ठिकाणी जलापर्णी व दलदल वाढली आहे. पात्रात बेशरमसह झाडांची दाटी झाली, डुकरांची वर्दळ व डासांची उत्पत्ती हे नदीकाठच्या वस्तीसाठी धोकादायक बनले आहे.दूषित पाण्यामुळे त्वचाविकार दूषित नदिनाल्याचे पाणी शरीरास व वापरास घातक आहे. अनेक घातक जीवजंतूंची निर्मिती या पाण्यातून होते. या पाण्यात पाय बुडविल्यास खाजेची लागण होते. शरीरावर पूरळ येतात. या पाण्यात कपडे धुणे अपायकारक आहे. तसेच पशुंनाही या पाण्यामुळे पोटाचे विकार होतात.नदीपात्रात टाकला जातो कचरातालुक्यातील नदी-नाल्याचे पात्र अरुंद झाले आहे. यंदा पावसाळा कमी झाल्याने नदीपात्रात डबकी साचली आहेत. या पात्रात गावकरी कचरा टाकतात. त्यामुळे कचऱ्याचे ढीग नदीपात्रात पाहावयास मिळतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. अतिक्रमणामुळे नद्यांचा गुदमरतो जीवनदी-नाल्यांना पाणी नसल्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले आहे. गाळ उपस्यामुळे पडलेले खड्डे, कचरा व नदीकाठी वाढते अतिक्रमण यामुळे नद्यांचा श्वास गुदमरत आहे. मानवी हस्तक्षेपामुळे नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.तिवसा येथील पिंगळा नदीवर उगमापासून ५ ठिकाणी बंधारे बांधण्यात आल्यामुळे नदीचा प्रवाह खंडित झाला आहे. त्यामुळे नदीपात्रात घाण तयार होते. नदीपात्राची सफाई करण्यात यावी यासाठी बीडीओंना वारंवार निवेदन दिले आहे.- धर्मराज थूल,सरपंच, ग्रामपंचायत तिवसा