शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

'जलपर्णी'मुळे पिंगळा झाली गटारगंगा

By admin | Updated: March 1, 2015 00:21 IST

प्रवाहित नसणारे पाणी व सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे पाणी यामुळे तिवसा तालुक्यातील पिंगळा नदीसह लहान-मोठे नदीनाले प्रदूषित झाले आहेत.

गजानन मोहोड तिवसाप्रवाहित नसणारे पाणी व सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे पाणी यामुळे तिवसा तालुक्यातील पिंगळा नदीसह लहान-मोठे नदीनाले प्रदूषित झाले आहेत. नदिपात्रात कचरा टाकण्यात येत असल्यामुळे पाण्यात घाण व जलपर्णी वनस्पती वाढल्याने नद्या मानवी आरोग्यासाठी धोकादायक बनल्या आहेत.यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाल्यांना पाणी कमी आहे. तसेच नदी नाल्यावर बहुतेक गावात बांध घालण्यात आल्यामुळे पाण्याचा प्रवाह रोखला गेला आहे. त्यामुळे नदी-नाल्यांचे पाणी प्रवाहित नाही. कृषी विभागाद्वारा दगडी बंधारे बांधण्यात आल्याने नदी-नाल्यांचा प्रवाह खोळंबला आहे. पाणी प्रवाहित नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जलपर्णी वनस्पती वाढली आहे. तालुक्यातील पिंगळानदी प्रदूषित झाल्यामुळे तिवसेकर नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील सांडपाणी नालीद्वारे नदीत सोडण्यात आल्याने पाणी दूषित झाले आहे. नदीपात्र अरुंद झाल्याने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. गावातील कचरादेखील नदीपात्रात टाकण्यात येत असल्याने नद्यांचे गटार बनले आहेत. सद्यस्थितीत तिवसा, डेहणी, शेंदूरजना बाजार, मोझरी, तळेगाव ठाकूर येथील नदीनाले गटारगंगा बनले आहे. सांडपाण्यावर भाजी पिकेनदीच्या पाण्यात गावातील सांडपाणी नालीद्वारे नदीत मिसळत असल्याने नदीचे पाणी दूषित झाले आहे. मानवी आरोग्यास हे पाणी धोकादायक आहे. मात्र या पाण्याच्या सिंचनातून काही शेतात भाजीपाला पिकविण्यात येतो, तो आरोग्यासाठी हानीकारक ठरत आहे. दलदल वाढलीनदी-नाल्यांच्या पात्रातील पाणी कमी झाले. त्यामुळे या ठिकाणी जलापर्णी व दलदल वाढली आहे. पात्रात बेशरमसह झाडांची दाटी झाली, डुकरांची वर्दळ व डासांची उत्पत्ती हे नदीकाठच्या वस्तीसाठी धोकादायक बनले आहे.दूषित पाण्यामुळे त्वचाविकार दूषित नदिनाल्याचे पाणी शरीरास व वापरास घातक आहे. अनेक घातक जीवजंतूंची निर्मिती या पाण्यातून होते. या पाण्यात पाय बुडविल्यास खाजेची लागण होते. शरीरावर पूरळ येतात. या पाण्यात कपडे धुणे अपायकारक आहे. तसेच पशुंनाही या पाण्यामुळे पोटाचे विकार होतात.नदीपात्रात टाकला जातो कचरातालुक्यातील नदी-नाल्याचे पात्र अरुंद झाले आहे. यंदा पावसाळा कमी झाल्याने नदीपात्रात डबकी साचली आहेत. या पात्रात गावकरी कचरा टाकतात. त्यामुळे कचऱ्याचे ढीग नदीपात्रात पाहावयास मिळतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. अतिक्रमणामुळे नद्यांचा गुदमरतो जीवनदी-नाल्यांना पाणी नसल्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले आहे. गाळ उपस्यामुळे पडलेले खड्डे, कचरा व नदीकाठी वाढते अतिक्रमण यामुळे नद्यांचा श्वास गुदमरत आहे. मानवी हस्तक्षेपामुळे नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.तिवसा येथील पिंगळा नदीवर उगमापासून ५ ठिकाणी बंधारे बांधण्यात आल्यामुळे नदीचा प्रवाह खंडित झाला आहे. त्यामुळे नदीपात्रात घाण तयार होते. नदीपात्राची सफाई करण्यात यावी यासाठी बीडीओंना वारंवार निवेदन दिले आहे.- धर्मराज थूल,सरपंच, ग्रामपंचायत तिवसा