शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

जिल्ह्याचा पाणीटंचाई आराखडा बारगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:06 IST

अमरावती : दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. मात्र, यंदा जानेवारी महिना संपत आला तरी ...

अमरावती : दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. मात्र, यंदा जानेवारी महिना संपत आला तरी अजूनही आराखडा कागदावरच आहे . विशेष म्हणजे, चौदाही तालुक्यांतील आराखडा सादर न केल्यामुळे जिल्ह्याचा आराखडा तयार होऊ शकला नाही. त्यामुळे यंदा तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे होणार असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असला तरी भौगोलिक स्थिती तशी योग्य नियोजन केल्यामुळे जिल्ह्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. मागील काही वर्षापासून शासनातर्फे पाणीटंचाईबाबत विविध उपक्रम राबविले जात असल्याने तीव्रता कमी झाली तरी आजही अनेक गावांना टँकरने पाणी पुरवावे लागत आहे. दरवर्षी शासनाच्या आदेशानुसार ऑक्टोबर महिन्यात पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. तालुक्यातून पाणीटंचाई आराखडा आल्यानंतर जिल्ह्याचा एकत्रित आराखडा तयार होतो. मात्र, यंदा ग्रामपंचायत निवडणुकांमुळे ही प्रक्रिया पूर्ण रखडली होती. ग्रामपंचायतीच्या सूचनांच्या आधारावर तालुक्याचा आराखडा तयार केला जातो. त्यामध्ये टँकरने पाणी देण्यात येणारी गावे आणि वाड्या, दुरुस्ती योजनांची माहिती, विंधन विहिरी, अतितीव्र टंचाई झाल्यास अधिग्रहीत करावयाचे विहिरीची माहिती सादर करावी लागते. त्यासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याची बैठक घेणे क्रमप्राप्त आहे. गटविकास अधिकाऱ्यांकडून टंचाई आराखडा जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात येतो. अजूनही बहुतांश तालुक्यांच्या बैठका झालेल्या नाहीत. परिणामी जिल्ह्याचा आराखडा होऊ शकला नाही.

जिल्ह्यात साधारण मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाणीटंचाईची सुरुवात होते. सर्वाधिक टंचाईची झळ ही मेळघाटमध्ये धारणी व चिखलदरा तालुक्यातील गावांना सहन करावी लागते. दरवर्षी २० ते ४० टँकरने पाणीपुरवठा केला जातो.

बॉक्स

निधी परत जाण्याची शक्यता

आराखड्यातील कामांना मार्चअखेरपर्यंत मंजुरी घ्यावी लागते. तसे झाले नाही, तर बराचसा निधी परत शासनाकडे पाठवावा लागतो. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आराखडा मंजूर करून आला, तरच पुढील तांत्रिक प्रक्रिया पार पाडता येते, अन्यथा मोठा निधी अखर्चित राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही.