शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जिल्ह्याचा पाणीटंचाई आराखडा बारगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:06 IST

अमरावती : दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. मात्र, यंदा जानेवारी महिना संपत आला तरी ...

अमरावती : दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. मात्र, यंदा जानेवारी महिना संपत आला तरी अजूनही आराखडा कागदावरच आहे . विशेष म्हणजे, चौदाही तालुक्यांतील आराखडा सादर न केल्यामुळे जिल्ह्याचा आराखडा तयार होऊ शकला नाही. त्यामुळे यंदा तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे होणार असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असला तरी भौगोलिक स्थिती तशी योग्य नियोजन केल्यामुळे जिल्ह्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. मागील काही वर्षापासून शासनातर्फे पाणीटंचाईबाबत विविध उपक्रम राबविले जात असल्याने तीव्रता कमी झाली तरी आजही अनेक गावांना टँकरने पाणी पुरवावे लागत आहे. दरवर्षी शासनाच्या आदेशानुसार ऑक्टोबर महिन्यात पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. तालुक्यातून पाणीटंचाई आराखडा आल्यानंतर जिल्ह्याचा एकत्रित आराखडा तयार होतो. मात्र, यंदा ग्रामपंचायत निवडणुकांमुळे ही प्रक्रिया पूर्ण रखडली होती. ग्रामपंचायतीच्या सूचनांच्या आधारावर तालुक्याचा आराखडा तयार केला जातो. त्यामध्ये टँकरने पाणी देण्यात येणारी गावे आणि वाड्या, दुरुस्ती योजनांची माहिती, विंधन विहिरी, अतितीव्र टंचाई झाल्यास अधिग्रहीत करावयाचे विहिरीची माहिती सादर करावी लागते. त्यासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याची बैठक घेणे क्रमप्राप्त आहे. गटविकास अधिकाऱ्यांकडून टंचाई आराखडा जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात येतो. अजूनही बहुतांश तालुक्यांच्या बैठका झालेल्या नाहीत. परिणामी जिल्ह्याचा आराखडा होऊ शकला नाही.

जिल्ह्यात साधारण मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाणीटंचाईची सुरुवात होते. सर्वाधिक टंचाईची झळ ही मेळघाटमध्ये धारणी व चिखलदरा तालुक्यातील गावांना सहन करावी लागते. दरवर्षी २० ते ४० टँकरने पाणीपुरवठा केला जातो.

बॉक्स

निधी परत जाण्याची शक्यता

आराखड्यातील कामांना मार्चअखेरपर्यंत मंजुरी घ्यावी लागते. तसे झाले नाही, तर बराचसा निधी परत शासनाकडे पाठवावा लागतो. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आराखडा मंजूर करून आला, तरच पुढील तांत्रिक प्रक्रिया पार पाडता येते, अन्यथा मोठा निधी अखर्चित राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही.