शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दररोजच्या जेवणात ‘भाकरी’चा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:12 IST

पान २ ची बॉटम बळीराजाची व्यथा, अन्नधान्यात ज्वारीच महत्त्व अबाधित, चढा दर परवडेना गुरुकुंज मोझरी : गरिबाच्या ताटातील ...

पान २ ची बॉटम

बळीराजाची व्यथा, अन्नधान्यात ज्वारीच महत्त्व अबाधित, चढा दर परवडेना

गुरुकुंज मोझरी : गरिबाच्या ताटातील हक्काच्या भाकरीला आज श्रीमंती लाभली आहे. अव्वाच्या सव्वा किमतीमुळे गरिबांना भाकरीचा शोध घ्यावा लागतो, अशी ग्रामीण जनतेची व्यथा झाली आहे.

महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आजही आवडीने भाकरी खाल्ली जाते. कारण भाकर हे परिपूर्ण अन्न आहे. अनेक प्रकारच्या धान्यापासून व त्याच्या मिश्रणातून भाकरी करता येते. साधारणपणे तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी या धान्याच्या पिठाची भाकरी करतात. काही जण सर्व प्रकारच्या धान्याचे पीठ एकत्र करून त्याची भाकरी करतात, ज्यामुळे सर्व प्रकारची तृणधान्ये आहारातून शरीरात जातात. भाकरीमधून शरीराला पुरेसे फायबर्स, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स मिळतात, ज्यामुळे गव्हाच्या पोळीच्या ऐवजी आहारात सर्व प्रकारच्या धान्याच्या भाकरीचा नक्कीच समावेश होऊ शकतो. कारण ती आरोग्यासाठी जास्त लाभदायक आहे. भाकरीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. उत्कृष्ट भाकरी बनविण्यासाठी अंगी कसब लागते. त्यातही हातावर तयार करून चुलीच्या तप्त लाल निखाऱ्यावर भाजलेली गरमागरम भाकरीची चवच न्यारी.

आजच्या गृहिणींना ती कसब अवगत करून घ्यावी लागते. कधीकाळी वऱ्हाडात मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड केली जायची. उत्त्पन्न भरघोस येत होते. पण, परिस्थिती झपाट्याने बदलली. शिवारात जंगली प्राण्यांचा वावर वाढीला लागला अन् अकस्मात या पिकाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. सोयाबीनचा पेरा वाढीस लागला. सुरुवात उत्तम झाली, पण आता सोयाबीनसारख्या पिकाच्या उत्पादनात दरवर्षी कमालीची घट येत आहे. आता शेतकऱ्याला ज्वारीचे पीक घेण्याची इच्छा असली तरी हिंमत होत नाही. कारण एकाच ठिकाणी ज्वारीसारखे पशूपक्ष्यांचे आवडते खाद्य उत्पादन केल्यास त्याची राखण करणे जोखमीचे आहे. रानडुकरासारखे प्राणी त्यावर ताव मारतात, तर पक्ष्यांचे जत्थे हाती आलेले पीक खाऊन फस्त करतात.

कोठारे ओस

पूर्वजांच्या काळापासूनच निर्माण केलेली ज्वारीची कोठारे आज ओस पडून आहेत. पूर्वी खोल खड्डा खणून तयार केलेले पेव घरोघरी होते. त्यात ज्वारी साठविली जायची. मात्र, आज पेव दुर्लभ झाले आहे. आजही वृद्धांना भाकरीची मेजवानीच हवीहवीशी वाटते. कारण तिला आवश्यक पाण्यापासून तर कुठल्याही पेय पदार्थात कुस्करून टाकता येते. पचनासाठी सुलभ आहे.

----------

पोत्याची ज्वारी किलोने

भाकरीसोबत मिरचीचा ठेचा ही न्याहारी कधीकाळी ठरलेली असायची. त्यावेळी घरात पोत्याने असणारी ज्वारी आज किलोने विकत घ्यावी लागते. आज तीच भाकरी श्रीमंतांच्या ताटात सन्मानाने विराजमान झाली. गरीब कष्टकरी मजूर आजच्या चढ्या बाजारभावात विकत घेण्यास विचार करूनही त्याकडे डोळेझाक करतो. कारण तितक्याच पैशात इतर स्वस्त धान्य अधिक प्रमाणात उपलब्ध होते.