शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

दररोजच्या जेवणात ‘भाकरी’चा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:12 IST

पान २ ची बॉटम बळीराजाची व्यथा, अन्नधान्यात ज्वारीच महत्त्व अबाधित, चढा दर परवडेना गुरुकुंज मोझरी : गरिबाच्या ताटातील ...

पान २ ची बॉटम

बळीराजाची व्यथा, अन्नधान्यात ज्वारीच महत्त्व अबाधित, चढा दर परवडेना

गुरुकुंज मोझरी : गरिबाच्या ताटातील हक्काच्या भाकरीला आज श्रीमंती लाभली आहे. अव्वाच्या सव्वा किमतीमुळे गरिबांना भाकरीचा शोध घ्यावा लागतो, अशी ग्रामीण जनतेची व्यथा झाली आहे.

महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आजही आवडीने भाकरी खाल्ली जाते. कारण भाकर हे परिपूर्ण अन्न आहे. अनेक प्रकारच्या धान्यापासून व त्याच्या मिश्रणातून भाकरी करता येते. साधारणपणे तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी या धान्याच्या पिठाची भाकरी करतात. काही जण सर्व प्रकारच्या धान्याचे पीठ एकत्र करून त्याची भाकरी करतात, ज्यामुळे सर्व प्रकारची तृणधान्ये आहारातून शरीरात जातात. भाकरीमधून शरीराला पुरेसे फायबर्स, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स मिळतात, ज्यामुळे गव्हाच्या पोळीच्या ऐवजी आहारात सर्व प्रकारच्या धान्याच्या भाकरीचा नक्कीच समावेश होऊ शकतो. कारण ती आरोग्यासाठी जास्त लाभदायक आहे. भाकरीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. उत्कृष्ट भाकरी बनविण्यासाठी अंगी कसब लागते. त्यातही हातावर तयार करून चुलीच्या तप्त लाल निखाऱ्यावर भाजलेली गरमागरम भाकरीची चवच न्यारी.

आजच्या गृहिणींना ती कसब अवगत करून घ्यावी लागते. कधीकाळी वऱ्हाडात मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड केली जायची. उत्त्पन्न भरघोस येत होते. पण, परिस्थिती झपाट्याने बदलली. शिवारात जंगली प्राण्यांचा वावर वाढीला लागला अन् अकस्मात या पिकाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. सोयाबीनचा पेरा वाढीस लागला. सुरुवात उत्तम झाली, पण आता सोयाबीनसारख्या पिकाच्या उत्पादनात दरवर्षी कमालीची घट येत आहे. आता शेतकऱ्याला ज्वारीचे पीक घेण्याची इच्छा असली तरी हिंमत होत नाही. कारण एकाच ठिकाणी ज्वारीसारखे पशूपक्ष्यांचे आवडते खाद्य उत्पादन केल्यास त्याची राखण करणे जोखमीचे आहे. रानडुकरासारखे प्राणी त्यावर ताव मारतात, तर पक्ष्यांचे जत्थे हाती आलेले पीक खाऊन फस्त करतात.

कोठारे ओस

पूर्वजांच्या काळापासूनच निर्माण केलेली ज्वारीची कोठारे आज ओस पडून आहेत. पूर्वी खोल खड्डा खणून तयार केलेले पेव घरोघरी होते. त्यात ज्वारी साठविली जायची. मात्र, आज पेव दुर्लभ झाले आहे. आजही वृद्धांना भाकरीची मेजवानीच हवीहवीशी वाटते. कारण तिला आवश्यक पाण्यापासून तर कुठल्याही पेय पदार्थात कुस्करून टाकता येते. पचनासाठी सुलभ आहे.

----------

पोत्याची ज्वारी किलोने

भाकरीसोबत मिरचीचा ठेचा ही न्याहारी कधीकाळी ठरलेली असायची. त्यावेळी घरात पोत्याने असणारी ज्वारी आज किलोने विकत घ्यावी लागते. आज तीच भाकरी श्रीमंतांच्या ताटात सन्मानाने विराजमान झाली. गरीब कष्टकरी मजूर आजच्या चढ्या बाजारभावात विकत घेण्यास विचार करूनही त्याकडे डोळेझाक करतो. कारण तितक्याच पैशात इतर स्वस्त धान्य अधिक प्रमाणात उपलब्ध होते.