शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
"कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
6
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
7
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
8
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
9
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
10
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
11
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
12
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
13
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
14
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
16
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
17
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
18
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
19
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
20
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव

लाखभर एकरातील तूर पीक नष्ट

By admin | Updated: July 29, 2016 23:57 IST

महिनाभरापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील किमान एक लाख एकरमधील तुरीचे पीक पिवळे पडून जळाले आहे.

भीषण संकट : अतिपावसाचा परिणाम, मर रोगाचे थैमान, व्यवस्थापनाची गरज गजानन मोहोड  अमरावतीमहिनाभरापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील किमान एक लाख एकरमधील तुरीचे पीक पिवळे पडून जळाले आहे. शेतकऱ्यासमोर नवे संकट उभे ठाकले असताना कृषी विभागाचे कुठलेच नियोजन नाही. मग, हा विभाग कोणत्या कामाचा, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. तुरीचे पीक हे संवेदनशील आहे. सतत पाऊस झाल्यास किंवा शेतात पाणी साचल्यास तुरीचे उभे पीक पिवळे पडून कोमेजून जाते. पेरणीनंतर तुरीच्या पिकाची पहिली ३० दिवस वाढ ही मंदगतीने होते. नंतर मात्र ही वाढ झपाट्याने होते. नेमका याच काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. सरासरीच्या १५८.३ टक्के पाऊस व झडसदृश स्थिती व अतिवृष्टिमुळे बहुतांश शेतांमध्ये पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा न होणाऱ्या काळ्या जमिनीत तर तुरीची अवस्था अत्यंत विदारक आहे. दोन दिवसांपेक्षा अधिक काळ तुरीचे पीक पाण्यात उभे राहिल्यास पिकांची मुळे सडू लागतात व पाने पिवळी पडतात. यामुळे तुरीचे झाड जागेवरच मृतप्राय होते. यालाच ‘मर’ देखील म्हणतात. यासाठी शेतातील पाणी बाहेर काढणे महत्त्वाचे आहे. परंतु सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना व्यवस्थापन करण्याकरिता उसंत मिळालेली नाही. त्यामुळे सरासरी क्षेत्राच्या २५ ते ३० टक्के भागातील तूरपीक धोक्यात आले आहे. पावसाने उघाड दिल्यास तुरीचे उर्वरित पीक शेतकऱ्यांच्या हाती येईल. जिल्ह्यात १ लाख ३१ हजार हेक्टरमध्ये तुरीची पेरणी अमरावती : तूर जागीच जळाल्याचा प्रकार अत्याधिक पाऊस व काळी जमीन असणाऱ्या दर्यापूर, चांदूरबाजार, मोर्शी, तिवसा, अंजनगांव सुर्जी, या तालुक्यात अधिक दिसून येत आहे. जिल्ह्यात यंदा १ लाख ३१ हजार ७८५ हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी झाली आहे. यामध्ये अंजनगांव ६७६७ हेक्टर, अचलपूर १०,३१७, चांदूरबाजार ११,६७०, धामणगांव ९४२२, चांदूररेल्वे ७१०७, तिवसा ५४९५, मोर्शी १३,८१८, वरुड ११,४९३, दर्यापूर ११,८७१, धारणी १०,४३०, चिखलदरा २२९३, अमरावती १०,२९०, भातकुली १०,२८० व नांदगांव खंडेश्वर तालुक्यात १०,४०८ हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी झाली आहे. ‘मर’ म्हणजे काय? शेतात पाणी साचून राहण्याचा कालावधी, पिकाची विकास अवस्था, जमिनीची संप्रुक्तता, तापमानातील बदल व पाण्याचा निचरा हे घटक तूर पिकावर परिणाम करतात. शेतात २ दिवसपर्यंत पाणी साचून रााहिल्यास जमिनीतील आॅक्सीजनचे प्रमाण टिकून राहते. नंतर जमीन पाण्याने ओतप्रोत भरते.याला जमीन ‘संप्रुक्त’ झाली असे म्हणतात. जमिनीतील आॅक्सीजनचे प्रमाण कमी होऊन कार्बनडायआॅक्साईडचे प्रमाण वाढते व तूर पीक बाधित होते. जमिनीत हवा खेळती न राहिल्याने मुळांना श्वासोच्छवास घेण्यास अडसर निर्माण होतो. परिणामी ‘मर’ रोगची लागण होते. जमिनीतून उद्भवणाऱ्या रोगांचे प्रमाणही वाढते. अशा करा उपाययोजनासर्वप्रथम चर खोदून शेतातील पाणी बाहेर काढावे. वाफसा आल्यानंतर लगेच डवरणी करावी, ज्यामुळे जमिनीतील हवा खेळती राहते. आवश्यकतेनुसार नत्रयुक्त रासायनिक खतांचा वापर करावा, मर झालेल्या भागात पुन्हा लागवड करायची असल्यास बियाण्यास कर्बोक्षिन + थायरम (मिश्र घटक) ३ ग्राम प्रतिकिलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी, अर्ध रब्बी हंगामात तुरीची १५ सप्टेंबरपर्यंत पेरणी आटोेपावी. पर्याय : तीळ आणि सूर्यफूल एखाद्या शेतात आंतरपीक म्हणून तूर जर अतिपावसाने जळाल्यास अन्य पीक घेता येत नाही. मात्र, ज्या शेतात फक्त तुरीची पेरणी करण्यात आली आहे, अशा शेतातील तूर जळाल्यास तीळ व सूर्यफूलाचे पीक पर्यायी पीक म्हणून घेता येत असल्याची माहिती कृषीतज्ज्ञांनी दिली. कृषीविभागाला केव्हा येणार जाग? जिल्ह्यातील १ लाखांपेक्षा अधिक हेक्टर शेतीतील तूर अतिपावसाने जागीच जळाली असताना अद्याप कृषीविभागाद्वारा पाहणी, सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना व्यवस्थापनाचा सल्ला देण्यात आलेला नाही. किंबहुना शेतकऱ्यांच्या शेतात जावून पाहणी करण्याची तसदी देखील कृषी अधिकाऱ्यांनी घेतली नाही. शेतकऱ्यांवर नवे संकट उद्भवले असताना शासनाला याचा रिपोर्ट कृषी विभागाने पाठविला नसल्याची माहिती आहे. वहाणांना माती लागणार नाही, याची दक्षता घेणाऱ्या या कृषी विभागाला केव्हा जाग येणार, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिपावसामुळे तूर पिकांवर ‘मर’ स्थिती उद्भवली आहे. शेतात चर खोदून पाणी बाहेर काढणे, हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. - योगेश इंगळे, कृषी शास्त्रज्ञ