शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

पावसाअभावी रासायनिक खतांची मागणी मंदावली

By admin | Updated: September 16, 2015 00:17 IST

जिल्ह्यात ३५ दिवसांपासून पावसाची दडी असल्याने रासायनिक खतांचा वापर कमी झाला आहे.

अमरावती : जिल्ह्यात ३५ दिवसांपासून पावसाची दडी असल्याने रासायनिक खतांचा वापर कमी झाला आहे. सद्यस्थितीत ४ हजार १२६ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. सर्वाधिक १ हजार ४५८ मेट्रिक टन संयुक्त खते व सर्वात कमी १६० मे टन साठा युरिया खताचा आहे. पिकाला पाण्याची आवश्यकता असताना पावसाने प्रदीर्घ दडी मारली आहे. पावसाळ्याचे १२० दिवसांपैकी १०५ दिवस आटोपले आहे. आता परतीच्या पाऊसाचा प्रवास सुरू झाला असला तरी जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. यामुळे पिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच पिकांची वाढ खुंटली आहे. अशा स्थितीत पिकांना रासायनिक खतांची गरज आहे. मात्र पाऊस नसताना खताचा डोज दिल्यास पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे शेतकरी खताची मात्रा देण्यास धजावत नाही. परिणामी खतांची मागणी मंदावल्याने जिल्ह्यात तूर्तास एमओपी, कॅन, अमोनियम सल्फेट वगळता उर्वरित खतांचा साठा शिल्लक आहे. यावर्षी जिल्ह्यात १ लाख १५ हजार ६०० मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी मंजूर होऊन सप्टेंबर अखेरपर्यंत तेवढा साठ्याचे नियोजन करण्यात आले. १४ सप्टेंबरपर्यंत ९२ हजार ९४८ मेट्रिक टन खतांचा प्राथमिक पुरवठा करण्यात आला. सद्यस्थितीत ७ हजार ९३८ मे टन खतांचा नॉन बफर साठा शिल्लक आहे. ३१ मार्च २०१५ अखेर रबीमधील खतांचा ७ हजार २२७ मेट्रिक टन साठा अधिकृत विक्रेत्यांकडे शिल्लक आहे. असा एकूण १ लाख ८ हजार ११३ मे. टन साठा आतापर्यंत उपलब्ध होता. यापैकी १ लाख ३ हजार ९८७ मे. टन खतांच्या साठ्याची विक्री झाल्याने जिल्ह्यात ४ हजार १२५ मेट्रिक टन साठा विक्रेत्यांकडे शिल्लक आहे. (प्रतिनिधी)