शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

पावसाअभावी रासायनिक खतांची मागणी मंदावली

By admin | Updated: September 16, 2015 00:17 IST

जिल्ह्यात ३५ दिवसांपासून पावसाची दडी असल्याने रासायनिक खतांचा वापर कमी झाला आहे.

अमरावती : जिल्ह्यात ३५ दिवसांपासून पावसाची दडी असल्याने रासायनिक खतांचा वापर कमी झाला आहे. सद्यस्थितीत ४ हजार १२६ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. सर्वाधिक १ हजार ४५८ मेट्रिक टन संयुक्त खते व सर्वात कमी १६० मे टन साठा युरिया खताचा आहे. पिकाला पाण्याची आवश्यकता असताना पावसाने प्रदीर्घ दडी मारली आहे. पावसाळ्याचे १२० दिवसांपैकी १०५ दिवस आटोपले आहे. आता परतीच्या पाऊसाचा प्रवास सुरू झाला असला तरी जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. यामुळे पिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच पिकांची वाढ खुंटली आहे. अशा स्थितीत पिकांना रासायनिक खतांची गरज आहे. मात्र पाऊस नसताना खताचा डोज दिल्यास पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे शेतकरी खताची मात्रा देण्यास धजावत नाही. परिणामी खतांची मागणी मंदावल्याने जिल्ह्यात तूर्तास एमओपी, कॅन, अमोनियम सल्फेट वगळता उर्वरित खतांचा साठा शिल्लक आहे. यावर्षी जिल्ह्यात १ लाख १५ हजार ६०० मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी मंजूर होऊन सप्टेंबर अखेरपर्यंत तेवढा साठ्याचे नियोजन करण्यात आले. १४ सप्टेंबरपर्यंत ९२ हजार ९४८ मेट्रिक टन खतांचा प्राथमिक पुरवठा करण्यात आला. सद्यस्थितीत ७ हजार ९३८ मे टन खतांचा नॉन बफर साठा शिल्लक आहे. ३१ मार्च २०१५ अखेर रबीमधील खतांचा ७ हजार २२७ मेट्रिक टन साठा अधिकृत विक्रेत्यांकडे शिल्लक आहे. असा एकूण १ लाख ८ हजार ११३ मे. टन साठा आतापर्यंत उपलब्ध होता. यापैकी १ लाख ३ हजार ९८७ मे. टन खतांच्या साठ्याची विक्री झाल्याने जिल्ह्यात ४ हजार १२५ मेट्रिक टन साठा विक्रेत्यांकडे शिल्लक आहे. (प्रतिनिधी)