शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

शहानूरची सुरक्षितता धोक्यात

By admin | Updated: July 27, 2016 00:14 IST

दोन मोठ्या शहरासह १५६+७९ गावांना पाणीपुरवठा करीत असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठा गणल्या गेलेल्या....

विद्युत खांबावरील वीजपुरवठा बंद : धरणाच्या बाजूला अवैध उत्खननचेतन घोगरे अंजनगाव सुर्जीदोन मोठ्या शहरासह १५६+७९ गावांना पाणीपुरवठा करीत असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठा गणल्या गेलेल्या व लिमका बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद असलेला शहानूर प्रकल्प व पूर्णत: गुरुत्वाकर्षण शक्तीवर आधारित अशा शहानूर धरण प्रकल्पाची सुरक्षितता व धरणाच्या काही अंतरावरच अवैध मुरुम उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे तेथील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित व कामचुकारपणामुळे पावसाळ्याच्या तोंडावर धरणाची सुरक्षितता धोक्यात आली आहे.सुरुवातीलाच शहानूर धरणावर जात असलेल्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या निसर्गप्रेमींना कसरत करावी लागत आहे. त्यातच धरणाच्या मुख्य गेटजवळील असलेले एकूण २४ विद्युत खांबांवरील सर्व लाईट फुटलेले व लोमकळत दिसून येतात. काही विद्युत खांब मधोमध तुटलेले आहेत, तर काहींचे विद्युत प्रवाहाचे तार उघड्यावर लोमकळत आहेत. काही दिवसांपूर्वी शासनाने अंमलात आणलेल्या झाडे लावा झाडे जगवा या योजनेंतर्गत धरणाच्या मुख्य प्रवेशाच्या गेटजवळून दोन किमी लावण्यात आलेल्या वृक्ष लागवडीच्या खड्ड्यातील माती डांबरीकरणाच्या रोडवर आल्याने व त्या वृक्षांचे खड्डे न बुजविल्याने येणारे-जाणारे दुचाकी चालक अपघातास बळी पडत आहेत. तसेच धरणाच्या पाणी सोडणाऱ्या चार गेटजवळ कबुतरे व इतर पक्षी मृत्यूमुखी पडलेले दिसून येतात त्यामुळे तेथील पाणी दूषित तर नाही ना? किंवा कुणी त्यामध्ये द्रैवीक औषध तर टाकले नाही ना? असा प्रश्न निर्माण होतो. धरणाच्या पाणी साठ्यामध्ये सद्याच्या परिस्थितीत ६५ टक्के वाढ झालेली दिसून येते. तसेच तिथे असलेल्या विद्युत जनित्रगृह, संगणक कक्ष या इमारत नादुरुस्त असल्याचे दिसते व पावसाळी दिवस असल्यामुळे पाऊस येताच ही इमारतीच्या छप्परातून पाणी गळते. यासाठी तेथील कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक इमारतीवर प्लॅस्टीक कागद टाकून त्यावर गाडीतील खराब इंजिन आॅईल टाकले आहे. जेणेकरून पाणी छप्परातून गळणार नाही. धरण प्रकल्पाच्या बाजूला असलेल्या सातपुडा पर्वतरांगेतून खुलेआम अवैध मुरूम उत्खलन सुरू आहे. तरी हे उत्खलन कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार काय, हा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. अशा प्रकरणामुळे शहानूर धरण प्रकल्पाची सुरक्षितता धोक्यात आली आहे.धरणाजवळील कर्मचारी वसाहत नादुरुस्तशहानूर धरणाजवळ असलेली कर्मचारी वसाहतीमधील घरे नादुरुस्त असल्यामुळे तेथे कोणताच कर्मचारी राहू शकत नाही. पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा सुद्धा नसल्याने कर्मचारी येथे वास्तव्यास नाही. शाखा अभियंता या कर्मचाऱ्यास तेथे राहण्यास आग्रही करीत आहेत, अशी माहिती तेथील कर्मचारी नाव न सांगता ‘लोकमत’ला दिली आहे.१ मे पासून मी सदर कारभार सांभाळला आहे. धरणावरील विद्युत दुरुस्ती करण्याकरिता विद्युत कारागिराला सांगितले आहे व बाजूला चालू असलेल्या अवैध मुरुम उत्खनन हे धरण प्रकल्पाच्या हद्दीत येते किंवा नाही याची माहिती घेऊन उत्खनन करणाऱ्यांवर निश्चित कारवाई होईल.- रवींद्र शेगोकार, शाखा अभियंता, सिंचन प्रकल्प