शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शीतलहर भाजीपाला पिकांना बाधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : गेल्या २४ तासात पारा आणखी दोन अंशांनी कमी झालेला आहे. यामुळे जिल्ह्यास हुडहुडी भरली. ...

ठळक मुद्देदुसऱ्या दिवशीही पारा ५.२ अंशावर : कांदा, केळी,तूर, मिरची टोमॅटोला घातक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या २४ तासात पारा आणखी दोन अंशांनी कमी झालेला आहे. यामुळे जिल्ह्यास हुडहुडी भरली. साधारणपणे एक आठवड्यापसून तापमान सात ते १२ अंशाच्या आसपास आहे. यामुळे जनजीवन ढवळून निघाले आहे. गेल्या दोन दिवसांतील थंडी पिकांना बाधक ठरणारी आहे. गहू, हरभऱ्याचे एकवेळ ठीक मात्र, भाजीपाला पिकांना ही थंडी घातक ठरणारी आहे.यंदाच्या हंगामात जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने हलक्या व मध्यम स्वरूपाच्या जमिनीत रबीची आशा नाही. मात्र, काळ्या पोताच्या व संरक्षित सिंचनाची सुविधा असणाऱ्या जमिनीत मात्र, रबीची पेरणी झालेली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार एक लाख ६९ हजार ३४१ हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत सद्यस्थितीत एक लाख सहा हजार १६३ हेक्टरमध्ये रबीची पेरणी झालेली आहे. याची ६२.६९ इतकी टक्केवारी आहे. सद्यस्थितीत हरभऱ्याची १,११,२३८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ८६,५६० हेक्टरमध्ये पेरणी आटोपली. दोन आठवड्यापूर्वी असलेल्या ढगाळ वातारणामुळे घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, लगेच वातावरण कोरडे झाल्याने शेतकऱ्यांना व्यवस्थापन करता आले. गव्हाच्या पेरणीसाठी थंडावा आवश्यक असल्याने ५६,२१४ हेक्टरपैकी १८,७१९ हेक्टरमध्ये सध्या पेरणी झालेली आहे. ही ३२.७२ टक्केवारी आहे. विहिरीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने कमी आल्याने गव्हाचे ५० टक्के क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहे.सलग दोन दिवसांपासून ५ ते ६ अंशांच्या दरम्यान तापमान असल्याने तुरीच्या पिकासह टोमॅटो व केळीचे पीक अतिथंडीमुळे करपण्याची शक्यता कृषीतज्ज्ञांनी वर्तविली आहे.थंडीचे व्यवस्थापन महत्त्वाचेसध्याचे तापमान गहू, बरभरा पिकाला पोषक आहे. मात्र, ५ अंशांपर्यंत घसरल्यास त्याला शीतलहर (कोल्ड वेव्ह) म्हटले जाते. या परिस्थितीचा प्रामुख्याने टोमॅटो, तूर, मिरची, कांदा व सर्वाधिक केळीच्या पिकाला धोका आहे. पानातील प्रोटोप्लॉझ्माचे क्रिस्टलायझेशन होत असल्याने पिकाला याचा धोका उत्पन्न होतो व पीक जागीच वाळायला सुरूवात होते. यापूर्वी सन २०११ मध्ये तापमान पाच अंशावर गेल्यामुळे शीतलहरेचा धोका निर्माण झाला होता. अनेक शेतामधील टोमॅटो, केळी, मिरची, कांदा व तुरीचे पीक जाग्यावरच सुकले होते. नदी-नाल्याकाठच्या शेतात शेकोटी पेटवाव्यात, मल्चींग आदी उपाययोजना कराव्यात. ज्या शेतात धुºयावर झाडे नाहीत त्या शेतात मात्र, काही प्रमाणात नुकसान होऊ शकते.