शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

शीतलहर भाजीपाला पिकांना बाधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : गेल्या २४ तासात पारा आणखी दोन अंशांनी कमी झालेला आहे. यामुळे जिल्ह्यास हुडहुडी भरली. ...

ठळक मुद्देदुसऱ्या दिवशीही पारा ५.२ अंशावर : कांदा, केळी,तूर, मिरची टोमॅटोला घातक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या २४ तासात पारा आणखी दोन अंशांनी कमी झालेला आहे. यामुळे जिल्ह्यास हुडहुडी भरली. साधारणपणे एक आठवड्यापसून तापमान सात ते १२ अंशाच्या आसपास आहे. यामुळे जनजीवन ढवळून निघाले आहे. गेल्या दोन दिवसांतील थंडी पिकांना बाधक ठरणारी आहे. गहू, हरभऱ्याचे एकवेळ ठीक मात्र, भाजीपाला पिकांना ही थंडी घातक ठरणारी आहे.यंदाच्या हंगामात जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने हलक्या व मध्यम स्वरूपाच्या जमिनीत रबीची आशा नाही. मात्र, काळ्या पोताच्या व संरक्षित सिंचनाची सुविधा असणाऱ्या जमिनीत मात्र, रबीची पेरणी झालेली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार एक लाख ६९ हजार ३४१ हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत सद्यस्थितीत एक लाख सहा हजार १६३ हेक्टरमध्ये रबीची पेरणी झालेली आहे. याची ६२.६९ इतकी टक्केवारी आहे. सद्यस्थितीत हरभऱ्याची १,११,२३८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ८६,५६० हेक्टरमध्ये पेरणी आटोपली. दोन आठवड्यापूर्वी असलेल्या ढगाळ वातारणामुळे घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, लगेच वातावरण कोरडे झाल्याने शेतकऱ्यांना व्यवस्थापन करता आले. गव्हाच्या पेरणीसाठी थंडावा आवश्यक असल्याने ५६,२१४ हेक्टरपैकी १८,७१९ हेक्टरमध्ये सध्या पेरणी झालेली आहे. ही ३२.७२ टक्केवारी आहे. विहिरीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने कमी आल्याने गव्हाचे ५० टक्के क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहे.सलग दोन दिवसांपासून ५ ते ६ अंशांच्या दरम्यान तापमान असल्याने तुरीच्या पिकासह टोमॅटो व केळीचे पीक अतिथंडीमुळे करपण्याची शक्यता कृषीतज्ज्ञांनी वर्तविली आहे.थंडीचे व्यवस्थापन महत्त्वाचेसध्याचे तापमान गहू, बरभरा पिकाला पोषक आहे. मात्र, ५ अंशांपर्यंत घसरल्यास त्याला शीतलहर (कोल्ड वेव्ह) म्हटले जाते. या परिस्थितीचा प्रामुख्याने टोमॅटो, तूर, मिरची, कांदा व सर्वाधिक केळीच्या पिकाला धोका आहे. पानातील प्रोटोप्लॉझ्माचे क्रिस्टलायझेशन होत असल्याने पिकाला याचा धोका उत्पन्न होतो व पीक जागीच वाळायला सुरूवात होते. यापूर्वी सन २०११ मध्ये तापमान पाच अंशावर गेल्यामुळे शीतलहरेचा धोका निर्माण झाला होता. अनेक शेतामधील टोमॅटो, केळी, मिरची, कांदा व तुरीचे पीक जाग्यावरच सुकले होते. नदी-नाल्याकाठच्या शेतात शेकोटी पेटवाव्यात, मल्चींग आदी उपाययोजना कराव्यात. ज्या शेतात धुºयावर झाडे नाहीत त्या शेतात मात्र, काही प्रमाणात नुकसान होऊ शकते.