शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शीतलहर भाजीपाला पिकांना बाधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : गेल्या २४ तासात पारा आणखी दोन अंशांनी कमी झालेला आहे. यामुळे जिल्ह्यास हुडहुडी भरली. ...

ठळक मुद्देदुसऱ्या दिवशीही पारा ५.२ अंशावर : कांदा, केळी,तूर, मिरची टोमॅटोला घातक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या २४ तासात पारा आणखी दोन अंशांनी कमी झालेला आहे. यामुळे जिल्ह्यास हुडहुडी भरली. साधारणपणे एक आठवड्यापसून तापमान सात ते १२ अंशाच्या आसपास आहे. यामुळे जनजीवन ढवळून निघाले आहे. गेल्या दोन दिवसांतील थंडी पिकांना बाधक ठरणारी आहे. गहू, हरभऱ्याचे एकवेळ ठीक मात्र, भाजीपाला पिकांना ही थंडी घातक ठरणारी आहे.यंदाच्या हंगामात जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने हलक्या व मध्यम स्वरूपाच्या जमिनीत रबीची आशा नाही. मात्र, काळ्या पोताच्या व संरक्षित सिंचनाची सुविधा असणाऱ्या जमिनीत मात्र, रबीची पेरणी झालेली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार एक लाख ६९ हजार ३४१ हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत सद्यस्थितीत एक लाख सहा हजार १६३ हेक्टरमध्ये रबीची पेरणी झालेली आहे. याची ६२.६९ इतकी टक्केवारी आहे. सद्यस्थितीत हरभऱ्याची १,११,२३८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ८६,५६० हेक्टरमध्ये पेरणी आटोपली. दोन आठवड्यापूर्वी असलेल्या ढगाळ वातारणामुळे घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, लगेच वातावरण कोरडे झाल्याने शेतकऱ्यांना व्यवस्थापन करता आले. गव्हाच्या पेरणीसाठी थंडावा आवश्यक असल्याने ५६,२१४ हेक्टरपैकी १८,७१९ हेक्टरमध्ये सध्या पेरणी झालेली आहे. ही ३२.७२ टक्केवारी आहे. विहिरीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने कमी आल्याने गव्हाचे ५० टक्के क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहे.सलग दोन दिवसांपासून ५ ते ६ अंशांच्या दरम्यान तापमान असल्याने तुरीच्या पिकासह टोमॅटो व केळीचे पीक अतिथंडीमुळे करपण्याची शक्यता कृषीतज्ज्ञांनी वर्तविली आहे.थंडीचे व्यवस्थापन महत्त्वाचेसध्याचे तापमान गहू, बरभरा पिकाला पोषक आहे. मात्र, ५ अंशांपर्यंत घसरल्यास त्याला शीतलहर (कोल्ड वेव्ह) म्हटले जाते. या परिस्थितीचा प्रामुख्याने टोमॅटो, तूर, मिरची, कांदा व सर्वाधिक केळीच्या पिकाला धोका आहे. पानातील प्रोटोप्लॉझ्माचे क्रिस्टलायझेशन होत असल्याने पिकाला याचा धोका उत्पन्न होतो व पीक जागीच वाळायला सुरूवात होते. यापूर्वी सन २०११ मध्ये तापमान पाच अंशावर गेल्यामुळे शीतलहरेचा धोका निर्माण झाला होता. अनेक शेतामधील टोमॅटो, केळी, मिरची, कांदा व तुरीचे पीक जाग्यावरच सुकले होते. नदी-नाल्याकाठच्या शेतात शेकोटी पेटवाव्यात, मल्चींग आदी उपाययोजना कराव्यात. ज्या शेतात धुºयावर झाडे नाहीत त्या शेतात मात्र, काही प्रमाणात नुकसान होऊ शकते.