शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

- तर उपशिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार करणार

By admin | Updated: August 28, 2014 23:28 IST

स्थानिक विलासनगर येथील विकास विद्यालयाच्या महात्मा फुले वसतिगृहात विद्यार्थ्यांचे बोगस प्रवेश दाखविल्याची उपशिक्षणाधिकारी मिलिंद राजगुरे यांनी पोलिसात दाखल केलेली तक्रार खोटी

अमरावती : स्थानिक विलासनगर येथील विकास विद्यालयाच्या महात्मा फुले वसतिगृहात विद्यार्थ्यांचे बोगस प्रवेश दाखविल्याची उपशिक्षणाधिकारी मिलिंद राजगुरे यांनी पोलिसात दाखल केलेली तक्रार खोटी असून विद्यार्थ्यांचा बोगस प्रवेश उपशिक्षणआधिकाऱ्यांनी सिद्ध करावा अन्यथा संस्थेकडून त्यांच्याविरूध्द पोलिसात तक्रार दाखल करण्यात येईल, असे विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय अडसोड यांनी सांगितले. गुरुवारी येथे आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी ही माहिती दिली. शाळेतील निर्धारित पटसंख्येचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी विकास विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी संगनमत करुन बनावट कागदपत्रांच्या आधारे शाळेत १३ विद्यार्थांचा बोगस प्रवेश दाखविल्याचा आरोप उपशिक्षणाधिकारी मिलिंद राजगुरे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रारीत केला. याप्रकरणी पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नसल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली. याप्रकरणाचा खुलासा करण्यासाठी मुख्याध्यापक अडसोड यांनी पत्रपरिषद घेतली. यावेळी त्यांनी उपशिक्षणाधिकाऱ्यांचे आरोप फेटाळून लावले. विकास विद्यालयाची स्थापना १९६९ साली झाली आहे. या विद्यालयातून अनेक चांगले विद्यार्थी घडले आहेत. सध्या शिक्षणक्षेत्रात स्पर्धा सुरु आहे. शाळांना विद्यार्थी मिळत नाहीत. महापालिकेअंतर्गत ८० शाळांची आवश्यकता असताना येथे ११० शाळा आहेत. यामध्येही विकास विद्यालयाची गुणवत्ता चांगली आहे. त्यामुळे शाळेचा चांगला निकाल पाहून इतर काही शाळांकडून विकास विद्यालयाला बदनाम करण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोेपही अडसोड यांनी केला. या शाळेत सन २०१० ते २०११ मध्ये विद्यार्थ्यांचे मूळ दाखले पाहून शासन नियमानुसार शाळेत प्रवेश देण्यात आला होता. बनावट दाखल्यांच्या आधारावर विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश देण्यात आलेला नाही. विकास विद्यालयातील डमी विद्यार्थ्यांची चौकशी करावी, अशी तक्रार रामराव शेंडे यांनी लोकशाही दिनात दाखल केली. चौकशी उपशिक्षणाधिकारी मिलिंद राजगुरे याच्याकडे होती. तीन वेळा चौकशी झाल्यानंतर विकास विद्यालयाविरोधात दाखल तक्रारीचे समाधान झाल्यामुळे शेंडे यांनी ही तक्रार मागे घेतली. हे प्रकरण नस्तीबंद करण्यात आल्यानंतरही राजगुरे यांच्याकडून मानसिक त्रास देणे सुरुच आहे, असेही त्यांनी सांगितले.