शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

वन संवर्धनात नागरिकांचा पुढाकार आवश्यक

By admin | Updated: January 8, 2017 00:09 IST

शहरालगतच्या समृद्ध जंगलात वाघाचे अस्तित्व सिद्ध झाले. असून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी वनविभाग आहे.

नागरिकांचीही जबाबदारी : वनविभागाचा सक्रिय सहभाग वैभव बाबरेकर अमरावतीशहरालगतच्या समृद्ध जंगलात वाघाचे अस्तित्व सिद्ध झाले. असून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी वनविभाग आहे. परंतु जंगल संरक्षणाची जबाबदारी ही केवळ वनविभागाची नसून त्यात नागरिकांचेही सहकार्य महत्त्वाचे आहे. वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातील जंगलाच्या संरक्षणाची जबाबदारी वनविभाग, वन्यप्रेमी, नागरिक तसेच निसर्ग संवर्धनाच्या कार्याला दिशा व गती देणाऱ्या राजकीय क्षेत्राचीसुध्दा आहे. जंगलाशेजारी जीवन जगणारे व जंगलावरच त्यांचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या ग्रामस्थांनी जंगल वाचविण्यात सक्रिय सहभाग नोंदविल्यास जिल्ह्यातील जंगल समृध्द होण्यास मोठी मदत मिळू शकेल. त्याकरिता ग्रामस्थांनी पुढाकार घेणे आता अत्यावश्यक झाले असल्याची माहिती वन्यजीव अभ्यासक स्वप्निल सोनोने यांनी दिली. पोहरा, चिरोडी जंगलात आढळून आलेल्या वाघांमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.जंगल क्षेत्राला लागूनच गावकऱ्यांचे रहिवासी ठिकाणे आहेत. त्यामुळे जंगलाशेजारील गावांतील नागरिकांच्या संपर्कात वन्यप्राणी येणे साहजिकच आहे. अशावेली वन्यप्राणी व मानवी संघर्ष उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांना मानवी अस्तित्वाची जाणीव व्हावी, या दृष्टीने गावकऱ्यांनी आता पाऊल उचलणे गरजेचे आहे. ही जबाबदारी केवळ वनविभागाचीच नसून नागरिकांचे सहकार्य मिळणे गरजेचे झाले आहे.तेव्हाच जंगलाचे संवर्धन होऊ शकेल. (प्रतिनिधी)चराईमुळे जंगलासह गावकऱ्यांचेही नुकसानजंगलात जनावरांची केलेल्या चराईमुळे जंगलासह गावकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागता. ही बाब शास्त्रिय दृष्टीही सिध्द झाली आहे. गुरांनी खालेले गवताची वाढ खुंटते व ते नष्ट होते. त्यामुळे त्याठिकाणी रानतुळस किंवा तरोट्यासारख्या वनस्पती उगवितात. या प्रकारामुळे जंगलातील तृणभक्षी हरीण, निलगाय व काळविटसारखे वन्यप्राणी गावकऱ्यांच्या शेतात धाव घेतात. ही बाब नुकसान देय ठरते. ग्रामस्थ काय करु शकतातसकाळी व सायंकाळी जंगलात जाणे टाळावेगुरांना जंगलात सोडण्याऐवजी गवत कापून आणून त्यांना द्यावे. (यामुळे जनावरांचे श्रम कमी होते आणि चांगला चारा मिळाल्यास दुधाचे उत्पादनात वाढ)गवत कापून आणण्यासाठी स्थानिक जेएफएम समितीची परवानगी घ्यावी. जेणे करून ठराविक भागातील गवत कापल्यास वर्षभर गवत उपलब्ध होईलइंधनाऐवजी शासकीय योजनेतून मिळणारे एलपीजी गॅस वापरावे, तशी मागणी जेएफएम समितीकडे संस्थांमार्फत करावी. गावलगत उघड्यावर कचरा फेकू नये, त्यामुळे गावठी डुकर व कुत्र्यांची संख्या वाढून बिबट व अन्य मासंभक्षी प्राणी आकृष्ट होणार नाही.रात्रीच्या वेळेस जंगलात पायी चालणे टाळावे, लाईट सुरु ठेऊन हार्न वाजवित जाणेउन्हाळ्यात जंगलात लागणाऱ्या वणव्यांवर लक्ष ठेवणे. वणवा लागल्यास वनविभागाला माहिती कळवून सहकार्य करावे.जंगल संवर्धनाची जबाबदारी ही वनविभागासह ग्रामस्थ, वन्यप्रेमी संस्था व राजकीय क्षेत्रातील इच्छा शक्तीची आहे. यामध्ये सर्वात मोठा सहभाग हा ग्रामस्थाचा आहे. कारण ते जंगलाशेजारी राहतात. त्यामुळे त्यांनी जंगल संवर्धनाविषयी पाऊल उचलणे गरजेचे आहे. - स्वप्निल सोनोने, वन्यजीव अभ्यासक