शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

उशिरा सुरु होणार मिरची बाजार

By admin | Updated: August 30, 2014 01:08 IST

तालुक्यात मिरचीवर बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सतीश बहुरुपी राजुराबाजारतालुक्यात मिरचीवर बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरवर्षी १५ आॅगस्टपासून सुरु होणारी मिरचीची बाजारपेठ यावर्षी एक महिना उशिरा सुरु होणार असल्याचे संकेत असल्याने मिरची उत्पादकांसह व्यापारी, मापारी आणि मजुरांनासुध्दा याचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. शेकडो हातांना काम देणारी ही बाजारपेठ असल्याने मजुरांनासुध्दा सुगीचे दिवस येतात. मात्र, यंदा निसर्गाच्या लहरीपणामळे मिरची उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तालुक्यात संत्र्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जातात. परंंतु गत काही वर्षांपासून या भागात संत्र्याच्या उत्पादनात घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आता मिरचीचे पीक घेणे सुरु केले होते. शेकडो क्विंटल मिरची राजुरा बाजारच्या मिरची बाजारात विक्रीसाठी येत होती. मिरची कच्चा माल असल्याने परत नेणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे मिळेल त्या भावात विकून मोकळे व्हावे लागते. रात्रीतून मिरची देवाण-घेवाण करणारी राजुराबाजारची बाजारपेठ ही विदर्भात मिरचीसाठी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे. येथून कलकत्ता, मुंबई, दिल्ली, जबलपूर, नागपूर, हैद्रबादसह राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश छत्तिसगड, पंजाब, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालसह देशाच्या कानाकोपऱ्यात येथून मिरची पाठविली जाते. एवढेच नव्हे, तर पाकिस्तान, बांग्लादेश, दुबई, सौदी अरब राष्ट्रांसह आदी देशात येथील मिरचीला अधिक मागणी असल्याने निर्यात केली जाते.कृषी उत्पन्न बाजर समितीचा उपबाजार असलेल्या राजुराबाजार मिरची बाजारात परवानाधारक १८९ व्यापारी, ५६ अडते, दोन मापारी, ९३ हमाल आणि एक वखारीवाला आहे. तर ५०० ते ६०० मजुरांच्या हाताला काम मिळते. तर बाजार समितीला सुध्दा सुरुवातीच्या काळात तीन ते ेचार हजार रुपये 'सेस' मिळतो. हंगामात हा सेस २० ते २५ हजार रुपयापर्यत उत्पन्न मिळवून देत असल्याचे सांगण्यात येते. तर वाहतूकदारांनासुध्दा चांगली संधी मिळते. येथून परप्रांतात मिरची पाठविताना मंडीमध्ये पोहचण्याचे वेळेचे बंधन असल्याने व्यापाऱ्यांकडून तीन ते चार हजार रुपये वाहन चालकाला बक्षिसापोटी दिले जाते. दरवर्षी राजुऱ्याचा मिरची बाजार १५ आॅगष्टपासून सुरु होतो. परंतु यंदा पावसाने दडी मारल्याने उमेदीच्या काळात मिरची सुकण्याच्या मार्गावर होती. आता आलेल्या पावसाने मिरचीला थोडी नवसंजीवनी मिळाली आहे. मात्र बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव प्रकर्षाने जाणवू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.