शहरं
Join us  
Trending Stories
1
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
2
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
3
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
4
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
5
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
6
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
7
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
8
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
9
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
11
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
12
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
13
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
14
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
15
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
16
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
17
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
18
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
19
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?

उशिरा सुरु होणार मिरची बाजार

By admin | Updated: August 30, 2014 01:08 IST

तालुक्यात मिरचीवर बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सतीश बहुरुपी राजुराबाजारतालुक्यात मिरचीवर बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरवर्षी १५ आॅगस्टपासून सुरु होणारी मिरचीची बाजारपेठ यावर्षी एक महिना उशिरा सुरु होणार असल्याचे संकेत असल्याने मिरची उत्पादकांसह व्यापारी, मापारी आणि मजुरांनासुध्दा याचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. शेकडो हातांना काम देणारी ही बाजारपेठ असल्याने मजुरांनासुध्दा सुगीचे दिवस येतात. मात्र, यंदा निसर्गाच्या लहरीपणामळे मिरची उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तालुक्यात संत्र्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जातात. परंंतु गत काही वर्षांपासून या भागात संत्र्याच्या उत्पादनात घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आता मिरचीचे पीक घेणे सुरु केले होते. शेकडो क्विंटल मिरची राजुरा बाजारच्या मिरची बाजारात विक्रीसाठी येत होती. मिरची कच्चा माल असल्याने परत नेणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे मिळेल त्या भावात विकून मोकळे व्हावे लागते. रात्रीतून मिरची देवाण-घेवाण करणारी राजुराबाजारची बाजारपेठ ही विदर्भात मिरचीसाठी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे. येथून कलकत्ता, मुंबई, दिल्ली, जबलपूर, नागपूर, हैद्रबादसह राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश छत्तिसगड, पंजाब, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालसह देशाच्या कानाकोपऱ्यात येथून मिरची पाठविली जाते. एवढेच नव्हे, तर पाकिस्तान, बांग्लादेश, दुबई, सौदी अरब राष्ट्रांसह आदी देशात येथील मिरचीला अधिक मागणी असल्याने निर्यात केली जाते.कृषी उत्पन्न बाजर समितीचा उपबाजार असलेल्या राजुराबाजार मिरची बाजारात परवानाधारक १८९ व्यापारी, ५६ अडते, दोन मापारी, ९३ हमाल आणि एक वखारीवाला आहे. तर ५०० ते ६०० मजुरांच्या हाताला काम मिळते. तर बाजार समितीला सुध्दा सुरुवातीच्या काळात तीन ते ेचार हजार रुपये 'सेस' मिळतो. हंगामात हा सेस २० ते २५ हजार रुपयापर्यत उत्पन्न मिळवून देत असल्याचे सांगण्यात येते. तर वाहतूकदारांनासुध्दा चांगली संधी मिळते. येथून परप्रांतात मिरची पाठविताना मंडीमध्ये पोहचण्याचे वेळेचे बंधन असल्याने व्यापाऱ्यांकडून तीन ते चार हजार रुपये वाहन चालकाला बक्षिसापोटी दिले जाते. दरवर्षी राजुऱ्याचा मिरची बाजार १५ आॅगष्टपासून सुरु होतो. परंतु यंदा पावसाने दडी मारल्याने उमेदीच्या काळात मिरची सुकण्याच्या मार्गावर होती. आता आलेल्या पावसाने मिरचीला थोडी नवसंजीवनी मिळाली आहे. मात्र बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव प्रकर्षाने जाणवू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.