शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

पालकमंत्र्यांच्या पत्राच्या आधारावर फसवणूक

By admin | Updated: September 12, 2015 00:17 IST

तालुक्यातील लोकांची फसवेगिरी करणाऱ्या तीन आरोपींपैकी स्वत:ला पत्रकार म्हणवून घेणाऱ्याने जिल्हा पालकमंत्र्यांच्या विशेष कार्य ...

मोर्शी तालुक्यात गोरखधंदा : म्हणतात, जिल्हा उद्योग केंद्रातून कर्ज देतोलोकमत विशेषरोहितप्रसाद तिवारी ल्ल मोर्शीतालुक्यातील लोकांची फसवेगिरी करणाऱ्या तीन आरोपींपैकी स्वत:ला पत्रकार म्हणवून घेणाऱ्याने जिल्हा पालकमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांचे पत्र घेऊन जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांवर दडपण आणले. या पत्राच्या आधारावर आरोपी आणखी लोकांची फसवणूक करणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.मोर्शी तालुक्यातील लोकांना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कर्ज मिळवून देण्याच्या, शासकीय जमिनी प्राप्त करून देण्यांच्या आणि इतर शासकीय लाभ प्राप्त करून देण्याच्या नावावर लोकांकडून हजारो रुपये उकळून फसवेगिरी करण्याचा प्रकार कथितरीत्या स्वत:ची ओळख पत्रकार म्हणून करवून देणाऱ्या वाघमारे, जिप शिक्षिका शीला धांडे आणि सारिका पेठे या तीन आरोपींनी केली. या प्रकरणी या तिघांवर मोर्शी पोलिसांनी गुन्हे नोंदविले असून तपास सुरू आहे. याप्रकरणी 'मोर्शीत तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल' या मथळ्याखाली ८ सप्टेंबर रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले आहे. या त्रिकुटांनी लोकांची फसवणूक करताना जिल्हा उद्योग केंद्राचे कर्ज मागणी अर्ज लोकांकडून भरुन घेतले. लाभ प्राप्त करून देण्याच्या नावाखाली लोकांकडून मोठी रक्कम वसूल केली. जिल्हा उद्योग केंद्राकडे आरोपींपैकी वाघमारे याने एकूण ६५ लोकांचे कर्ज मागणी अर्ज सादर करण्याचा प्रयत्न केला. तथापि जिल्हा उद्योग केंद्राच्या कर्जाची प्रकरणे विहीत कार्यपध्दतीने येतात. त्यात कर्ज मागणीदाराकडे संबंधित अधिकारी भेटी देतात. तपासणी करतात आणि त्यांच्या शिफारशीनंतरच कर्ज मागणी अर्ज जिल्हा उद्योग केंद्रात सादर होत असते. त्यामुळे आरोपी वाघमारे याच्याकडून जिल्हा उद्योग केंद्राने ६५ अर्ज स्वीकृत केले नव्हते आणि त्याला परत पाठविले होते.वाघमारे याने थेट जिल्हा पालक मंत्र्याचे कार्यालय गाठले आणि विशेष कार्य अधिकारी यांच्याकडून 'महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग महामंडळ’ या नावाने १ मार्च २०१५ रोजी पत्र प्राप्त करवून घेतले. त्यात ‘निवेदन आवश्यक कार्यवाहीकरिता आपले कार्यालयास पाठविण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. थेट जिल्हा पालकमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांचे पत्र पाहून शेवटी जिल्हा उद्योग केंद्राने दडपणाखाली येऊन ६५ लोकांचे कर्ज मागणी अर्ज वाघमारे यांच्याकडून स्वीकृत करवून घेतले आहे. मागील सहा महिन लोटून गेल्यावरही कर्जाची प्रकरणे मंजूर झाली नाहीत, हे पाहता फसवणूक झालेल्यांनी पैसे परत मागण्याचा तगादा लावला असता आरोपी त्यांना जिल्हा पालक मंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी यांचे १ मार्च चे पत्र दाखवून कर्ज आज ना उद्या मिळणार असल्याची बतावणी करीत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान याच पत्राच्या आधारे आरोपी मंडळी इतरांचीही फसवणूक करणार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.