शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
2
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
3
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
4
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
5
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
6
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
7
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
8
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
9
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
10
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
11
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
12
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
13
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
14
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
15
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
16
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
17
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
18
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
19
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
20
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!

जलसिंचन योजना ठरली शेतकऱ्यांसाठी वरदान

By admin | Updated: December 8, 2015 00:16 IST

जरूड-वरूड परिसर १९९० च्या काळात पाण्याच्या दुर्भीक्ष्यामुळे वाळवंट होण्याच्या मार्गावर होता.

शेतकरी सुखावला : तीन हजार एकर जमीन ओलिताखालीप्रशांत काळबेंडे वरूडजरूड-वरूड परिसर १९९० च्या काळात पाण्याच्या दुर्भीक्ष्यामुळे वाळवंट होण्याच्या मार्गावर होता. शरद उपसा जलसिंचन नावाचा दूरदर्शी प्रकल्प येथे निर्माण झाला. या प्रकल्पाने शेतकऱ्यांना नवसंजीवनी दिली. तर, संपुर्ण परिसरात हरितक्रांती केली. शरद उपसा जलस्ािंचन योजनेमुळे बागायदार शेतकऱ्यांना उभारी मिळाल्याने शेतकरी सुखावला आहे. सुमारे तीन हजार एकर जमीन या योजनेमुळे ओलिताखाली आली आहे.सन १९९०-९५ या काळात जरूड परीसरात अती वापरामुळे पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. सुमारे १२०० ते १५०० फूट खोल बोअर करून शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हते. जमिनीला चाळणी करूनही पाण्याचा थेंबही शेतकऱ्यांच्या हाती लागत नव्हता. त्यांची आर्थिक स्थिती खालावत होती. संगोपन केलेल्या संत्रा बागा डोळ्यादेखत उध्वस्त होत असतांना अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या सुध्दा केल्यात.त्यावर शरद उपसा योजना रामबाण ठरली.शरद उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून पाण्याची पातळी वाढली. वाळलेल्या संत्रा झाडांना नवसंंजीवनी देवून आज आंबिया बहाराच्या माध्यमातून जरुड परिसरात कोट्यवधी रूपयांची उलाढाल होते. जिल्ह्यात संत्र्याच्या आंबिया बहाराला टिकवून ठेवण्याचे काम शरद उपस्याचे पाणी व जरूडचे शेतकरी करतात. एकेकाळी आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांनीही संत्र्याच्या आंबिया बहाराने नवी उभारी दिली आहे. दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होऊन परिसरातील आंबिया बहाराचा संत्रा विदेशात पोहोचला. यासाठी देशातील अनेक व्यापारी परिसरात तळ ठोकून बसतात. शेतकऱ्यांनी शेततळ्यांसाठी आपल्या शेती गहान ठेवून निर्माण केलेली ७५ मीटर उंची आणि १३ किलोमीटर लांबीची शेतीला पाणी देणारी विदर्भातील एकमेव शरद उपसा जलसिंचन योजना आज सुस्थितीत आहे. त्या काळचे विरोधकही तत्कालीन कृषीमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या या दुरदर्शी योजनेला धन्यवाद देतात. वरुड तालुक्यात संपूर्ण मतदारसंघात ‘‘पाणी अडवा पाणी जिरवा’’ या मोहिमेअंतर्गत नाला खोलीकरण, सिमेंट, शेततळे, कोल्हापुरी शेतबंधाऱ्याच्या कामांची मोहीम राबवून पाण्याची पातळी उंचावण्याचे काम केले. या मोहिमेला काही प्रमाणात यश देखील प्राप्त झाले.ड्रायझोनमध्ये गेलेला परिसर काढण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणे सुरू आहे. दूरदर्शी निर्णय घेऊन सुरू केलेल्या ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ मोहिमेचे फलित पाहून राज्यातील काही आमदार देशमुख यांच्या कामाची प्रेरणा घेऊन ती कामे सामोरे नेत आहेत.शरद उपसा सिंचन प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत असल्याने त्यांच्या शेतात उत्पादन देखील चांगले होत आहेत. त्यामुळे त्यांना शेती व्यवसायातून उभारी मिळाली आहे. अशाच प्रकारचे प्रकल्प आता ठिकठिकाणी निर्माण करणे गरजेचे आहे. निसर्गावर अवलंबून राहणे आता शक्य नसल्याने तलावांची मोठ्या प्रमाणात निर्माणकार्य हाती घेणे अनिवार्य झाले आहे. तेव्हाच जगाचा पोशिंदा ताठ मानेने जगेल , असा आशावाद तालुक्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्यास निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना मदतच मिळेल.