शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

बोंड अळीग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 22:08 IST

२०१७ च्या खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीच्या आक्रमणामुळे खूप मोठी आर्थिक हानी सहन करावी लागली आहे.

ठळक मुद्दे२० हजार ९० शेतकऱ्यांची कपाशी बाधित : १७६ हजार हेक्टरमध्ये नुकसान

आॅनलाईन लोकमतचांदूरबाजार : २०१७ च्या खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीच्या आक्रमणामुळे खूप मोठी आर्थिक हानी सहन करावी लागली आहे. ही स्थिती राज्यभर सर्वदूर सारखीच असल्याने शासनाने कापूस पिकाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्वेक्षण पूर्ण करून त्याप्रमाणे अहवालही शासनास सादर करण्यात आला तसेच शासकीय नियमानुसार मदतीसाठी लागणाऱ्यां अनुदानाच्या रकमेचेही मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. परंतु, अद्यापही शासनाकडून मदतीचा हात शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल आहेत. या बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांना अजूनही मदतीची प्रतीक्षाच करावी लागत आहे.गुलाबी बोंडअळीचा फटका तालुक्यातील २० हजार ९० शेतकऱ्यांना बसला आहे. यामध्ये कोरडवाह क्षेत्रातील ९ हजार १७० शेतकऱ्यांचा, तर बागायती क्षेत्रातील १० हजार ९२० शेतकऱ्यांचा समावेश आहे. याबाबतचा रीतसर अहवाल स्थानिक तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी संयुक्तिकरीत्या शासनास सादर केला आहे. अहवालानुसार कोरडवाहूच्या ८ हजार २६६ हेक्टर क्षेत्रापैकी ६ हजार ९९ हेक्टर इतके क्षेत्र बोंडअळीने ३३ टक्क्यांच्या वर बाधित झाले आहे, तर बागायती क्षेत्रातील १० हजार ५४२ कपाशी पेऱ्यापैकी ८ हजार ३०८ हेक्टर क्षेत्र ३३ टक्क्यांच्या वर नुकसानग्रस्त झाले आहे. या सर्वांना शासकीय नियमानुसार मदतीची मागणी शासनाकडे अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.अहवालात प्रचलित शासकीय मदत धोरणानुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टर ६ हजार ८०० रुपयांची, तर बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर मदतीची मागणी करण्यात आली आहे.१५ कोटी ३४ लाखांची मागणीगुलाबी बोंडअळीने बाधित झालेल्या क्षेत्रासाठी अहवालात १५ कोटी ३४ लाख ७१ हजार ७११ रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. कोरडवाहू क्षेत्रासाठी ४ कोटी १० लाख ६ हजार ८५६ रुपये, तर बागायतीसाठी ११ कोटी २४ लाख ६४ हजार ८५५ रुपये इतक्या रकमेचा समावेश आहे. हिवाळी अधिवेशनात सरकारने जाहीर केलेल्या हेक्टरी मदतीचा या अहवालात समावेश नाही.बागायती क्षेत्रातील नुकसान ८ हजार हेक्टरमध्येतालुक्यात एकूण १८ हजार हेक्टरच्या वर कपाशीचा पेरा आहे. सर्वेक्षण अहवालानुसार यापैकी १४ हजार ४०७ हेक्टर कपाशीचे क्षेत्र ३३ टक्के च्या आत बोंडअळीने नुकसानग्रस्त झाले आहे. यात ६ हजार १०० हेक्टर क्षेत्र कोरडवाहू, तर ८ हजार ३०८ हेक्टर बागायती कपाशीचे क्षेत्र गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसानग्रस्त झाले आहे.