शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
2
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
3
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
4
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
6
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
7
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
8
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
9
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
10
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!
11
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
12
ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...
13
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
14
AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम
15
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
16
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
17
VIDEO: महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
18
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
19
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
20
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?

बोंड अळीग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 22:08 IST

२०१७ च्या खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीच्या आक्रमणामुळे खूप मोठी आर्थिक हानी सहन करावी लागली आहे.

ठळक मुद्दे२० हजार ९० शेतकऱ्यांची कपाशी बाधित : १७६ हजार हेक्टरमध्ये नुकसान

आॅनलाईन लोकमतचांदूरबाजार : २०१७ च्या खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीच्या आक्रमणामुळे खूप मोठी आर्थिक हानी सहन करावी लागली आहे. ही स्थिती राज्यभर सर्वदूर सारखीच असल्याने शासनाने कापूस पिकाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्वेक्षण पूर्ण करून त्याप्रमाणे अहवालही शासनास सादर करण्यात आला तसेच शासकीय नियमानुसार मदतीसाठी लागणाऱ्यां अनुदानाच्या रकमेचेही मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. परंतु, अद्यापही शासनाकडून मदतीचा हात शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल आहेत. या बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांना अजूनही मदतीची प्रतीक्षाच करावी लागत आहे.गुलाबी बोंडअळीचा फटका तालुक्यातील २० हजार ९० शेतकऱ्यांना बसला आहे. यामध्ये कोरडवाह क्षेत्रातील ९ हजार १७० शेतकऱ्यांचा, तर बागायती क्षेत्रातील १० हजार ९२० शेतकऱ्यांचा समावेश आहे. याबाबतचा रीतसर अहवाल स्थानिक तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी संयुक्तिकरीत्या शासनास सादर केला आहे. अहवालानुसार कोरडवाहूच्या ८ हजार २६६ हेक्टर क्षेत्रापैकी ६ हजार ९९ हेक्टर इतके क्षेत्र बोंडअळीने ३३ टक्क्यांच्या वर बाधित झाले आहे, तर बागायती क्षेत्रातील १० हजार ५४२ कपाशी पेऱ्यापैकी ८ हजार ३०८ हेक्टर क्षेत्र ३३ टक्क्यांच्या वर नुकसानग्रस्त झाले आहे. या सर्वांना शासकीय नियमानुसार मदतीची मागणी शासनाकडे अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.अहवालात प्रचलित शासकीय मदत धोरणानुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टर ६ हजार ८०० रुपयांची, तर बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर मदतीची मागणी करण्यात आली आहे.१५ कोटी ३४ लाखांची मागणीगुलाबी बोंडअळीने बाधित झालेल्या क्षेत्रासाठी अहवालात १५ कोटी ३४ लाख ७१ हजार ७११ रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. कोरडवाहू क्षेत्रासाठी ४ कोटी १० लाख ६ हजार ८५६ रुपये, तर बागायतीसाठी ११ कोटी २४ लाख ६४ हजार ८५५ रुपये इतक्या रकमेचा समावेश आहे. हिवाळी अधिवेशनात सरकारने जाहीर केलेल्या हेक्टरी मदतीचा या अहवालात समावेश नाही.बागायती क्षेत्रातील नुकसान ८ हजार हेक्टरमध्येतालुक्यात एकूण १८ हजार हेक्टरच्या वर कपाशीचा पेरा आहे. सर्वेक्षण अहवालानुसार यापैकी १४ हजार ४०७ हेक्टर कपाशीचे क्षेत्र ३३ टक्के च्या आत बोंडअळीने नुकसानग्रस्त झाले आहे. यात ६ हजार १०० हेक्टर क्षेत्र कोरडवाहू, तर ८ हजार ३०८ हेक्टर बागायती कपाशीचे क्षेत्र गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसानग्रस्त झाले आहे.