शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

बोंड अळीग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 22:08 IST

२०१७ च्या खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीच्या आक्रमणामुळे खूप मोठी आर्थिक हानी सहन करावी लागली आहे.

ठळक मुद्दे२० हजार ९० शेतकऱ्यांची कपाशी बाधित : १७६ हजार हेक्टरमध्ये नुकसान

आॅनलाईन लोकमतचांदूरबाजार : २०१७ च्या खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीच्या आक्रमणामुळे खूप मोठी आर्थिक हानी सहन करावी लागली आहे. ही स्थिती राज्यभर सर्वदूर सारखीच असल्याने शासनाने कापूस पिकाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्वेक्षण पूर्ण करून त्याप्रमाणे अहवालही शासनास सादर करण्यात आला तसेच शासकीय नियमानुसार मदतीसाठी लागणाऱ्यां अनुदानाच्या रकमेचेही मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. परंतु, अद्यापही शासनाकडून मदतीचा हात शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल आहेत. या बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांना अजूनही मदतीची प्रतीक्षाच करावी लागत आहे.गुलाबी बोंडअळीचा फटका तालुक्यातील २० हजार ९० शेतकऱ्यांना बसला आहे. यामध्ये कोरडवाह क्षेत्रातील ९ हजार १७० शेतकऱ्यांचा, तर बागायती क्षेत्रातील १० हजार ९२० शेतकऱ्यांचा समावेश आहे. याबाबतचा रीतसर अहवाल स्थानिक तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी संयुक्तिकरीत्या शासनास सादर केला आहे. अहवालानुसार कोरडवाहूच्या ८ हजार २६६ हेक्टर क्षेत्रापैकी ६ हजार ९९ हेक्टर इतके क्षेत्र बोंडअळीने ३३ टक्क्यांच्या वर बाधित झाले आहे, तर बागायती क्षेत्रातील १० हजार ५४२ कपाशी पेऱ्यापैकी ८ हजार ३०८ हेक्टर क्षेत्र ३३ टक्क्यांच्या वर नुकसानग्रस्त झाले आहे. या सर्वांना शासकीय नियमानुसार मदतीची मागणी शासनाकडे अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.अहवालात प्रचलित शासकीय मदत धोरणानुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टर ६ हजार ८०० रुपयांची, तर बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर मदतीची मागणी करण्यात आली आहे.१५ कोटी ३४ लाखांची मागणीगुलाबी बोंडअळीने बाधित झालेल्या क्षेत्रासाठी अहवालात १५ कोटी ३४ लाख ७१ हजार ७११ रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. कोरडवाहू क्षेत्रासाठी ४ कोटी १० लाख ६ हजार ८५६ रुपये, तर बागायतीसाठी ११ कोटी २४ लाख ६४ हजार ८५५ रुपये इतक्या रकमेचा समावेश आहे. हिवाळी अधिवेशनात सरकारने जाहीर केलेल्या हेक्टरी मदतीचा या अहवालात समावेश नाही.बागायती क्षेत्रातील नुकसान ८ हजार हेक्टरमध्येतालुक्यात एकूण १८ हजार हेक्टरच्या वर कपाशीचा पेरा आहे. सर्वेक्षण अहवालानुसार यापैकी १४ हजार ४०७ हेक्टर कपाशीचे क्षेत्र ३३ टक्के च्या आत बोंडअळीने नुकसानग्रस्त झाले आहे. यात ६ हजार १०० हेक्टर क्षेत्र कोरडवाहू, तर ८ हजार ३०८ हेक्टर बागायती कपाशीचे क्षेत्र गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसानग्रस्त झाले आहे.