शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
3
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
4
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
5
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
8
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
9
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
10
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
11
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
12
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
13
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
14
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
15
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
16
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
17
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
18
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
19
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
20
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   

जैविक खतांवर बहरली भाजी, फळांची बाग

By admin | Updated: October 29, 2015 00:31 IST

अलीकडे शेतीमध्ये रासायनिक खते, कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. सुरूवातीला यामुळे उत्पादनात वाढ झाली. मात्र, कालांतराने रासायनिक खतांचे दुष्परिणाम दिसू लागले.

लोणीच्या शेतकऱ्याची यशोगाथा : नैसर्गिक शेतीचा यशस्वी प्रयोगत्रिनयन मालपे लोणीअलीकडे शेतीमध्ये रासायनिक खते, कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. सुरूवातीला यामुळे उत्पादनात वाढ झाली. मात्र, कालांतराने रासायनिक खतांचे दुष्परिणाम दिसू लागले. जमिनी नापीक झाल्यात. शेतकरी कर्जबाजारी झाला. त्यामुळेच रासायनिक खतांच्या आहारी न जाता वरूड तालुक्यातील लोणी येथील नीलेश केशवराव आकोटकर या शेतकऱ्याने नैसर्गिक शेतीचा मार्ग अवलंबिला आणि विषमुक्त भाजीपाला व फळे पिकविण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांच्या अर्ध्या एकर शेतीत अद्रकाची लागवड त्यांनी केली. या प्रयोगात खर्च वजा जाता त्यांना एक लाख रूपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. कृषितज्ज्ञ सुभाष पाळेकर यांच्याद्वारे लिहिलेली पुस्तके वाचून त्यातून टिप्स घेऊन नीलेश यांनी हा प्रयोग यशस्वी केला. यंदाच्या हंगामात नीलेश आकोटकर यांनी १०० टक्के नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लोणी ते हिवरखेड मार्गावरील आठ एकर शेतीमध्ये त्यांनी हा प्रयोग केला. त्यासाठी त्यांनी केवळ देशी गार्इंचे गोमूत्र, गायीचे शेण यापासून तयार झालेले जैविक खत वापरले. त्यातून सव्वा एकरात आलं, एका एकरात वांगी, एका एकरात मिरची, दीड एकर शेतीमध्ये केळी आणि उर्वरित जमिनीत संत्राबाग फुलविली. सर्व पिकांना ते गोमूत्र आणि पाणी एकत्र करून ड्रीपद्वारे फवारणी करतात. १० किलो शेण, १० लिटर गोमूत्र, एक किलो डाळीचे पीठ, एक किलो गूळ आणि शेताच्या बांधावरील मूठभर माती यांचे मिश्रण करून २०० लिटर पाण्यात हे मिश्रम ४८ तास आंबवतात. त्यानंतर हे द्रावण थोडे-थोडे करून झाडाच्या बुंध्याजवळ टाकतात किंवा ड्रीपद्वारे पिकांना देतात. या जिवामृतामुळे जमिनीला अन्न घटकांचा पुरवठा तर होतोच शिवाय त्यातील डाळीच्या पिठामुळे हवेतील नायट्रोजन जमिनीत स्थिरावण्यास मदत होते. शेणामुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणुंची संख्या वाढून जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते. त्यामुळे मुळांना आॅक्सिजन मिळते, असे आकोटकरांचे म्हणणे आहे. किडींचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून त्यांनी शेतात प्रत्येक सरीवर झेंडूची १०० झाडे लावली आहेत. पिकांवर येणारी कीड झेंडूच्या फुलांकडे आकृष्ट होतात. त्यांचा हा नैसर्गिक शेतीचा प्रयोग शतप्रतिशत यशस्वी ठरला आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे हैराण होऊन आत्महत्येचा मार्ग अवलंबिणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घ्यायला हवा.