शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

जैविक खतांवर बहरली भाजी, फळांची बाग

By admin | Updated: October 29, 2015 00:31 IST

अलीकडे शेतीमध्ये रासायनिक खते, कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. सुरूवातीला यामुळे उत्पादनात वाढ झाली. मात्र, कालांतराने रासायनिक खतांचे दुष्परिणाम दिसू लागले.

लोणीच्या शेतकऱ्याची यशोगाथा : नैसर्गिक शेतीचा यशस्वी प्रयोगत्रिनयन मालपे लोणीअलीकडे शेतीमध्ये रासायनिक खते, कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. सुरूवातीला यामुळे उत्पादनात वाढ झाली. मात्र, कालांतराने रासायनिक खतांचे दुष्परिणाम दिसू लागले. जमिनी नापीक झाल्यात. शेतकरी कर्जबाजारी झाला. त्यामुळेच रासायनिक खतांच्या आहारी न जाता वरूड तालुक्यातील लोणी येथील नीलेश केशवराव आकोटकर या शेतकऱ्याने नैसर्गिक शेतीचा मार्ग अवलंबिला आणि विषमुक्त भाजीपाला व फळे पिकविण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांच्या अर्ध्या एकर शेतीत अद्रकाची लागवड त्यांनी केली. या प्रयोगात खर्च वजा जाता त्यांना एक लाख रूपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. कृषितज्ज्ञ सुभाष पाळेकर यांच्याद्वारे लिहिलेली पुस्तके वाचून त्यातून टिप्स घेऊन नीलेश यांनी हा प्रयोग यशस्वी केला. यंदाच्या हंगामात नीलेश आकोटकर यांनी १०० टक्के नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लोणी ते हिवरखेड मार्गावरील आठ एकर शेतीमध्ये त्यांनी हा प्रयोग केला. त्यासाठी त्यांनी केवळ देशी गार्इंचे गोमूत्र, गायीचे शेण यापासून तयार झालेले जैविक खत वापरले. त्यातून सव्वा एकरात आलं, एका एकरात वांगी, एका एकरात मिरची, दीड एकर शेतीमध्ये केळी आणि उर्वरित जमिनीत संत्राबाग फुलविली. सर्व पिकांना ते गोमूत्र आणि पाणी एकत्र करून ड्रीपद्वारे फवारणी करतात. १० किलो शेण, १० लिटर गोमूत्र, एक किलो डाळीचे पीठ, एक किलो गूळ आणि शेताच्या बांधावरील मूठभर माती यांचे मिश्रण करून २०० लिटर पाण्यात हे मिश्रम ४८ तास आंबवतात. त्यानंतर हे द्रावण थोडे-थोडे करून झाडाच्या बुंध्याजवळ टाकतात किंवा ड्रीपद्वारे पिकांना देतात. या जिवामृतामुळे जमिनीला अन्न घटकांचा पुरवठा तर होतोच शिवाय त्यातील डाळीच्या पिठामुळे हवेतील नायट्रोजन जमिनीत स्थिरावण्यास मदत होते. शेणामुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणुंची संख्या वाढून जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते. त्यामुळे मुळांना आॅक्सिजन मिळते, असे आकोटकरांचे म्हणणे आहे. किडींचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून त्यांनी शेतात प्रत्येक सरीवर झेंडूची १०० झाडे लावली आहेत. पिकांवर येणारी कीड झेंडूच्या फुलांकडे आकृष्ट होतात. त्यांचा हा नैसर्गिक शेतीचा प्रयोग शतप्रतिशत यशस्वी ठरला आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे हैराण होऊन आत्महत्येचा मार्ग अवलंबिणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घ्यायला हवा.