शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती आगार बनले समस्यांचे माहेरघर !

By admin | Updated: March 9, 2017 00:21 IST

मध्यवर्ती आगारात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे विविध आजाराला उपस्थित प्रवाशांना सामोरे जावे लागू शकते.

कचरा व घाणीचे सम्राज्य : स्वच्छता केव्हा? अमरावती : मध्यवर्ती आगारात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे विविध आजाराला उपस्थित प्रवाशांना सामोरे जावे लागू शकते. नागरिक आगाराच्या भिंतीवरच उघड्यावरच लघुशंका करीत असल्यामुळे येथे घाण वास येतो. त्यामुळे नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागतो, या ठिकाणी स्वच्छतेचे धिंडोळे निघाले आहे. केव्हा करणार परिसराची स्वच्छता, असा सवाल प्रवासी विचारत आहे. अमरावती आगारात एकूण ८० पेक्षा जास्त बसेस आहेत. इतर आगाराच्याही शेकडो फेऱ्या येथून रोज ये-जा करतात. त्यामुळे येथे हजारो प्रवाश्यांची रोजच वर्दळ असते. अनेक प्रवासी काही खालल्यानंतर येथे लावण्यात आलेल्या कचरापेट्यांमध्ये फळ व इतर वेस्टेज मटेरीयल न टाकता सार्वजनिक ठिकाणी परिसरात कुठेही ते फेकून देतात. त्यामुळे येथे अनेक ठिकाणी सर्वत्र कचरा पडलेला आढळते. आगाराच्यावतीने येथे काही सफाई कामगार नेमले आहे. परिसर नियमित स्वच्छतेची जबाबदारी त्यांच्याकडे असते. परंतु नियमित स्वच्छता करण्यात येत नसल्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य निर्माण होतात. येथे मध्यवर्ती आगार वर्कशॉपच्या मधात एक भिंत आहे. त्या भिंतीवर सायंकाळी व भरदिवसा सुध्दा नागरिक सर्व नियम धाब्यावर बसवून उघड्यावर लघुशंका करताना आढळते. पण येथे उपस्थित आगाराचे कर्मचारी नागरिकांना हटकण्याचे तसदी घेत नाही. त्यामुळे येथे लघुशंका करू नये, असे फलक लावण्यात यावे व जर नागरिक येथील अधिकृत प्रसाधनगृहाचा वापर करीत नसतील तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी काही प्रतिष्ठित प्रवाशांनी केली आहे. याकडे परिवहन विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे्.आजार होण्याची शक्यता ?आगार परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे प्रवाशांना विषाणुजन्य आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. घाण व अस्वच्छ जागेवर नागरिक लघुशंका करतात, तेथे पाणी टाकण्याची कुठलीही व्यवस्था नसते. त्यामुळे परिसरात उभ्या राहणाऱ्या प्रवाशांना विविध प्रकारचे आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. उघड्यावरच टाकतात फळांची टरफलं नागरिक खाललेले फळ उघड्यावर फेकून परिसरात घाण करतात. नागरिकांनीसुद्धा आगारात अस्वच्छता करू नये, स्वच्छतेची जबाबदारी ही प्रत्येक प्रवाशांची आहे. परिसरात लावण्यात आलेल्या कचरापेटीतच कचरा व इतर वेस्टेज पदार्थ टाकावेत व आगारातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन अमरावती आगार व्यवस्थापकांनी केले आहे.