अमरावती : शासनाच्या संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेची प्रकरणे मंजूर करण्यासाठी वर्षभरापासून बैठक झाली नसल्याने निराधार या योजनेपासून वंचित आहेत.७१९प्रकरणे वर्षभरापासून प्रलंबित असल्याने निराधारांचा आधार हरविल्याचे चित्र आहे.निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करून त्यांना लाभ मिळावा या मागणीसाठी गुरुवारी शिवसेनेने एसडीओ कार्यालयावर धडक दिली.युवा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण हरमकर यांच्या नेतृत्वात पदाधिकार्यांनी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठून निराधार योजनेच्या प्रलंबित प्रकरणां चा जाब विचारला.श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय अर्थसहाय्य यापैकी कोणत्याही योजनेची वर्षभरापासून बैठक नाही.समितीच्या अध्यक्षांना निराधार व्यक्तींच्याबद्दल कळवळा नाही तर दुसरीकडे लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात येरझार्या माराव्या लागतात. हा प्रकार लवकर थांबवून निराधार योजनेतील लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करून या प्रकरणाचा निकाल लावावा, अशी मागणी करण्यात आली.निवेदन सादर करताना गोविंद दायमा, निखिल गाले, आनंद राठी, प्रमोद वानखडे, श्रीकांत शर्मा, संदीप मानेकर, प्रणय मेहरे, मुन्ना देशमुख, गोपाल आसोपा आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
निराधार योजनेचा 'आधार' हरविला
By admin | Updated: May 9, 2014 01:03 IST