शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

जिल्ह्यात पावसाने ओलांडली सरासरी

By admin | Updated: July 1, 2016 00:11 IST

जिल्ह्यात २० जून रोजी पावसाचे आगमन झाल्यानंतर पावसाने ८ दिवस खंड दिला. पुन्हा २८ जूनपासून पाऊस सुरु झाला.

अमरावती : जिल्ह्यात २० जून रोजी पावसाचे आगमन झाल्यानंतर पावसाने ८ दिवस खंड दिला. पुन्हा २८ जूनपासून पाऊस सुरु झाला. यंदा खरिपाच्या पेरणीसाठी किमान ९० मि.मी.पाऊस आवश्यक आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १५१.३ मि.मी. व १०३.६ टक्के पाऊस पडला. हा पेरणीयोग्य पाऊस असल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.जिल्ह्यात १ ते ३० जून दरम्यान १४६ मि.मी पावसाची सरासरी अपेक्षित आहे. प्रत्यक्षात गुरूवारपर्यंत १५१.३ मि.मी पाऊस पडला. यामध्ये चांदूररेल्वे, धामणगाव, तिवसा, अचलपूर, चांदूरबाजार, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व धारणी तालुक्यात पावसाने अपेक्षित सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे या तालुक्यात पेरणीचा जोर वाढला आहे.अद्याप अमरावती, भातकुली, नांदगाव, मोर्शी, वरूड व चिखलदरा तालुक्यात पावसाची टक्केवारी कमी असली तरी चिखलदरा वगळता या तालुक्यांत ८० ते ९० मि.मी. पाऊस पडला आहे. त्यामुळे तेथे खरिपाची पेरणी करण्यास हरकत नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुडे यांनी सांगितले.यंदाच्या खरिपासाठी जिल्ह्यात कृषी विभागाने ७ लाख २८ हजार ११२ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यापैकी २४ हजार १०८ हेक्टर क्षेत्रात सद्यस्थितीत पेरणी झाली आहे. परेणीची ही टक्केवारी ३३.५ इतकी आहे. जिल्ह्यात यंदा धानासाठी ४ हजार ३६५ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना ३ हजार ७४५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. ज्वारीसाठी ३८ हजार ६७६ हेक्टर पेरणीक्षेत्र असताना ९ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. मका ५७९ हेक्टर, तूर ४५ हजार हेक्टर, मूग ८ हजार १९२ हेक्टर, उडिद ६ हजार २९० हेक्टर, सोयाबीन ९० हजार हेक्टर तर कपाशीची ८० हजार १८९ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. खरिपाच्या पेरणीचा वेग वाढला असून जुलैपर्यंत पेरण्या पूर्ण होतील, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. गुरुवारी तालुका मुख्यालयी १८.६ मिमी तर ग्रामीण भागात २५ मिमी पाऊस पडला. अमरावती शहरात १२.८ मिमी इतका पाऊस झाला. (प्रतिनिधी)

कपाशी ४१ टक्के तर सोयाबिनची २८ टक्के पेरणीजिल्ह्यात यंदाच्या हंगामात कपाशीसाठी १ लाख ९३ हजार २६१ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना ८० हजार १८९ हेक्टर क्षेत्रात ३० जूनपर्यंत पेरणी झाली आहे. ही ४१.४९ टक्केवारी आहे. सोयाबिनसाठी ३ लाख २३ हजर ३०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना ९० हजार ४६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. पेरणीक्षेत्राची ही टक्केवारी २७.८५ इतकी आहे.पाऊस-पेरणीत अमरावती, भातकुली माघारलेजिल्ह्यात ३० जूनपर्यंत १४६ मि.मी. पाऊस आवश्यक असताना सरासरी १५१.३ मि.मी. पाऊस पडला. परंतु अमरावती तालुक्यात ७२ टक्के व भातकुली तालुक्यात ७१ टक्के पाऊस पडला. जिल्ह्यात ३३.५ टक्के पेरणी झाली असताना भातकुलीमध्ये ३.५५ टक्के व अमरावतीमध्ये ५.६१ टक्के इतकी म्हणजे सर्वात कमी पेरणी झाली आहे. हे दोन्ही तालुके पाऊस व पेरणीमध्ये माघारले आहेत.यंदा खरिपाच्या पेरणीसाठी सरासरी ९० मि.मी. पावसाची आवश्यकता आहे. सर्वच तालुक्यांत पुरेसा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी करण्यास हरकत नाही- दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीधामणगाव आघाडीवरजिल्ह्यात सार्वत्रिक ३३.५ टक्के पेरणी झाली असली तरी सर्वाधिक ५९ टक्के पेरणी धामणगाव तालुक्यात झालेली आहे. अंजनगाव ५७.३, अचलपूर ३३.४, चांदूरबाजार ३५.२, चांदूररेल्वे ३३.७, तिवसा ४५.१, मोर्शी २३, वरुड ३१.८, धारणी ३०.९, चिखलदरा २६.३, अमरावती ५.६१, भातकुली ३.५५ टक्के पेरणी झाली आहे. पावसाच्या समाधानकारक हजेरीमुळे शेतकरी सुखावला आहे. तिवसा तालुका चिंबयंदा १ ते ३० जून दरम्यान जिल्ह्यात १५१.३ मि.मी. पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक २३५.८ मि.मी. पाऊस तिवसा तालुक्यात पडला. अमरावती ९७.६, भातकुली १०५.४, नांदगाव १३४.४, चांदूररेल्वे १९२.५, धामणगाव १५५, मोर्शी ११५.१, वरुड १२७.९, अचलपूर १४२.१, चांदूर बाजार १३९.९, दर्यापूर २११.१, वरुड, अंजनगाव १७४.८, धारणी १७३.६ व चिखलदरा तालुक्यात ११२.२ मि.मी.पाऊस पडला आहे.